शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या लोकसंख्या धोरणावर पुनर्विचार व्हावा, सरसंघचालक Mohan Bhagwat यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 07:20 IST

Mohan Bhagwat News: परदेशातून होणारी घुसखोरी व इतर कारणांमुळे लोकसंख्येचे धर्माधारित असंतुलन निर्माण होत आहे. हे असंतुलन देशासाठी घातक ठरू शकते व अनेक संकटे निर्माण होऊ शकतात.

नागपूर : परदेशातून होणारी घुसखोरी व इतर कारणांमुळे लोकसंख्येचे धर्माधारित असंतुलन निर्माण होत आहे. हे असंतुलन देशासाठी घातक ठरू शकते व अनेक संकटे निर्माण होऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन लोकसंख्या धोरणावर पुनर्विचार करण्याची गरज आहे, असे परखड मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. पुढील ५० वर्षांचा विचार करून लोकसंख्या धोरण तयार झाले पाहिजे व ते सर्वांसाठीच लागू करायला हवे, असेही डॉ. मोहन भागवत यांनी बोलून दाखविले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शस्त्रपूजन व विजयादशमी समारंभात ते शुक्रवारी बोलत होते.रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात मर्यादित उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. आज देशाच्या सीमांवर जास्त संकट आहे. चीन व पाकिस्तानच्या सीमा सुरक्षेवर आणखी भर देण्याची गरज आहे. शिवाय समुद्री सीमादेखील बळकट व्हायला हव्यात, असे सरसंघचालक डॉ. भागवत यांनी नमूद केले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सायबर सुरक्षेसाठी प्रयत्न झाले पाहिजेत. देशांतर्गत उपद्रवी लोकांवरदेखील नियंत्रण आणले पाहिजे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशत प्रस्थापित करण्यासाठी दहशतवादी हिंदू समाजाला लक्ष्य करत आहेत. त्यांच्या कारवायांचा बंदोबस्त झालाच पाहिजे, असे प्रतिपादन भागवत यांनी केले.मंदिर व्यवस्थापन हिंदूंकडे द्याहिंदुंच्या मंदिरांची स्थिती फारशी चांगली नाही. दक्षिणेतील मोठी मंदिरे तेथील राज्य सरकारांच्या अखत्यारित आहेत. या व्यवस्थेतून अक्षरश: लूट सुरू आहे. मंदिराचे मालक देव असून पुजारी व्यवस्थापक आहेत, असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयदेखील आहे. त्यामुळे मंदिरांचे व्यवस्थापन परत हिंदुंकडे द्यावे, असे आग्रही प्रतिपादन डॉ. मोहन भागवत यांनी  केले. 

सरसंघचालकांच्या भाषणातील ठळक मुद्दे- ओटीटीमुळे नवीन पिढीवर वाईट संस्कार होत आहे. त्यावर नियंत्रण हवे.- समाजातील भेद वाढविण्याची भाषा वापरायला नको. संवाद कायमस्वरुपी सकारात्मकच असायला हवा.- मंदिर, पाणी, स्मशान सर्वांसाठी एकच असायला हवे.- देशात सर्वांपर्यंत सुलभ पध्दतीने वैद्यकीय उपचार पोहोचले पाहिजे, अशी सर्वांची इच्छा आहे.- कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आता सर्वांचे हित साधणारी अर्थव्यवस्था हवी.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ