शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

एका पावसाने राज्यातील सत्ता उलथवली; शरद पवारांचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 05:44 IST

शरद पवार; भाजपकडून सुधारणांची शक्यता कमी

सांगली : देशाची अर्थव्यवस्था सध्या चिंताजनक स्थितीत असून, आगामी काळात अनेक क्षेत्रांना त्याचा मोठा फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपकडून ही परिस्थिती सुधारण्याची कोणतीही शक्यता वाटत नाही, असे मत राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

पवार म्हणाले, निर्यात क्षेत्रासह देशांतर्गत उद्योग, व्यवसायांना बिघडलेल्या अर्थव्यवस्थेचा मोठा फटका बसला आहे. विकासदर कमी होत आहे. अर्थव्यवस्थेसंदर्भात प्रसिद्ध होणारे आकडे चांगले नाहीत.आर्थिक परिस्थितीबाबत देशातील अनेक अर्थतज्ज्ञांनी भीती व्यक्त केली असतानाही त्यावर उपाययोजना केल्या नाहीत. भारतीय रिझर्व्ह बॅँकेच्या पदावरून लोक राजीनामा देऊन दूर होत आहेत. यावरूनच देशाच्या अर्थव्यवस्थेचे गंभीर चित्र स्पष्ट होते. भाजप जोपर्यंत सत्तेत आहे, तोपर्यंत त्यांच्याकडून कोणत्याही सुधारणांची शक्यता नाही. भाजपमधील खासदारही पक्षाच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. दोन नेत्यांच्या हातीच पक्षाची सूत्रे असल्यामुळे नाराजी वाढत आहे. यापूर्वी पक्षात असे चित्र नव्हते, असेही पवार यांनी सांगितले.

एका पावसाने राज्यातील सत्ता उलथवलीसांगली : राजकारणात कोणत्याही स्थितीची काळजी करीत बसायचे नाही. दिवस जसे येतात तसे ते दिवस जातात आणि बदल व्हायचे तसे होतात. एका पावसाने राज्यातील सत्ता उलथवली, हेही लक्षात ठेवावे, अशी टिप्पणीही शरद पवार यांनी केली.

सदाशिवराव पाटील यांचा राष्टÑवादीत प्रवेशखानापूर-आटपाडीचे काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्यासह विट्याच्या नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्यासह २३ नगरसेवक, २५ हून अधिक सरपंच, उपसरपंच यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्टÑवादीत प्रवेश केला.जातीयवाद घातकनागरिकत्व कायद्याबद्दल पवार म्हणाले, कायद्यातील तरतुदी करताना एका ठरावीक समाजघटकाला बाजूला ठेवून काही नियम बनविले जात असतील, तर ते देशाच्या एकसंधतेसाठी चांगले नाही.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी