शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
2
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
3
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
4
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
5
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
6
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
7
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
8
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
9
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
10
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
11
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!
12
पहलगामनंतर आता दिल्ली..; 7 महिन्यात 41 भारतीयांचा मृत्यू, काँग्रेसचा मोदी-शाहांवर निशाणा
13
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
14
Groww IPO Allotment and GMP: ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
15
वाहतूककोंडीचा त्रास संपवण्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत टोल नाक्याचा प्रस्ताव
16
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
17
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
18
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...
19
दिल्ली लाल किल्ला कार स्फोट: फरिदाबादमधून अटक केलेल्या डॉ. शाहीन शाहिदचा पहिला फोटो समोर
20
रंगावरुन प्रणित मोरेला हिणवायचे लोक, 'बिग बॉस'च्या घरात कॉमेडियनचा खुलासा, म्हणाला- "शाळेत आणि कॉलेजमध्ये..."

परदेशी झाडांच्या जागी आता देशी वृक्ष

By admin | Updated: June 27, 2016 00:59 IST

जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी वन विभागाने सुरुवातीच्या काळात परदेशी झाडे लावली होती़

पुणे : शहरातील उजाड झालेल्या टेकड्यांवरील जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी वन विभागाने सुरुवातीच्या काळात परदेशी झाडे लावली होती़ या झाडांमुळे तेथील जमिनीची सुपिकता वाढली असल्याने आता त्यांच्या जागी देशी वृक्ष लावण्यात येणार आहेत, त्याला शासनाने मान्यता दिली आहे़ पर्वती पाचगाव, भांबुर्डा येथील वन विभागाच्या जागेवर दोन दशकांपूर्वी परदेशी झाडे लावली होती़ या झाडांमुळे जमीन संवर्धनाचे काम झाले असून, या झाडांची मुळे खोलवर जातात़ त्यामुळे ही झाडे गिरीपुष्प किंवा उंदीरमार या नावानेही ओळखली जातात़ टेकड्यांवरील जमीन हिरवीगार व्हावी व तेथील जमिनीचे संवर्धन व्हावे, यासाठी सुरुवातीच्या काळात ही परदेशी झाडे लावली होती़ त्यांच्यामुळे जमिनीचे संवर्धन झाले असले, तरी त्यांच्या आसपास देशी वृक्ष तग धरू शकत नाही; तसेच पावसाळा संपताच ही झाडे उजाड होतात़ ही झाडे झुडपांच्या स्वरूपात असल्याने पावसाळ्यानंतर ती निष्पर्ण दिसू लागतात़ पुढील ८ महिने त्यांच्या केवळ फांद्या दिसतात़ त्यामुळे आता त्यांच्या जागी नवीन देशी वृक्ष लावण्याची वन विभागाची योजना आहे़ याबाबतचा प्रस्ताव वन विभागाने शासनाकडे पाठविला होता़ त्याला शासनाने मान्यता दिली असून, दर वर्षी १ हेक्टर जागेवरील परदेशी झाडे काढून, त्या जागी देशी वृक्ष लावण्यास शासनाने मान्यता दिली आहे़ याबाबत वन विभागाचे उपवनसंरक्षक सत्यजित गुजर यांनी सांगितले की, शहराभोवतालच्या टेकड्या वर्षभर हिरव्यागार दिसाव्यात, यासाठी वन विभागाचा प्रयत्न आहे़ लोकसहभागातून ते शक्य असल्याचे वारजे येथे राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पातून दिसून आले आहे़ भांबुर्डा, पाचगाव पर्वती येथील परदेशी झाडांमुळे जमिनींचे संर्वधन झाले आहे़ त्याचा सर्व्हे करण्यात आला असून, त्याठिकाणी आता वड, पिंपळ, आवळा, कडुलिंब असे देशी वृक्ष लावण्यात येणार आहेत. आपल्याकडे कोणतेही झाड तोडले की, लगेच त्यावरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतो़ त्यामुळे ही झाडे काढण्याअगोदर जनजागृती करून त्यामागची कारणे सर्वांना सांगण्यात येणार आहेत. वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण होऊ नये, यासाठी संरक्षक भिंतीचे काम हाती घेण्यात आले असून, आतापर्यंत १५ किमी भिंतीचे काम झाले आहे. यंदा ८ ते १० किमीच्या सरंक्षक भिंतीचे काम हाती घेण्यात येणार आहे़ एकदा जमिनीचे संरक्षण झाले की, निसर्गच पक्ष्यांमार्फत वनीकरणाचे काम करीत असतो़