शहरं
Join us  
Trending Stories
1
School Bus Accident: भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
2
'मराठी मोर्चा' रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला
3
चार मुलांची आई कुवेतला जाऊन प्रियकराला घेऊन आली; आपल्याच घरात राहतायत हे पतीला कळताच...
4
डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देणं मस्क यांना महागात? आधी टेस्ला गडगडली, आता संपत्तीला खिंडार!
5
व्यावसायिक गोपाल खेमका हत्या प्रकरण: मुख्य आरोपी एन्काउंटरमध्ये ठार, झाला मोठा खुलासा
6
 F&O नं दिलाय जोरदार झटका, आर्थिक वर्षात गुंतवणूकदारांचे ₹१.०६ लाख कोटी बुडाले; SEBI नं काय म्हटलं?
7
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
8
Stock Market Today: ५५ अंकांच्या घसरणीसह उघडला सेन्सेक्स; या दोन क्षेत्रांवर दबाव, बाजारात तेजी का दिसून येत नाहीये?
9
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
10
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
11
Viral Video: देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून पतललेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक!
12
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
13
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
14
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
15
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
16
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
17
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
18
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
19
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
20
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."

परदेशी झाडांच्या जागी आता देशी वृक्ष

By admin | Updated: June 27, 2016 00:59 IST

जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी वन विभागाने सुरुवातीच्या काळात परदेशी झाडे लावली होती़

पुणे : शहरातील उजाड झालेल्या टेकड्यांवरील जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी वन विभागाने सुरुवातीच्या काळात परदेशी झाडे लावली होती़ या झाडांमुळे तेथील जमिनीची सुपिकता वाढली असल्याने आता त्यांच्या जागी देशी वृक्ष लावण्यात येणार आहेत, त्याला शासनाने मान्यता दिली आहे़ पर्वती पाचगाव, भांबुर्डा येथील वन विभागाच्या जागेवर दोन दशकांपूर्वी परदेशी झाडे लावली होती़ या झाडांमुळे जमीन संवर्धनाचे काम झाले असून, या झाडांची मुळे खोलवर जातात़ त्यामुळे ही झाडे गिरीपुष्प किंवा उंदीरमार या नावानेही ओळखली जातात़ टेकड्यांवरील जमीन हिरवीगार व्हावी व तेथील जमिनीचे संवर्धन व्हावे, यासाठी सुरुवातीच्या काळात ही परदेशी झाडे लावली होती़ त्यांच्यामुळे जमिनीचे संवर्धन झाले असले, तरी त्यांच्या आसपास देशी वृक्ष तग धरू शकत नाही; तसेच पावसाळा संपताच ही झाडे उजाड होतात़ ही झाडे झुडपांच्या स्वरूपात असल्याने पावसाळ्यानंतर ती निष्पर्ण दिसू लागतात़ पुढील ८ महिने त्यांच्या केवळ फांद्या दिसतात़ त्यामुळे आता त्यांच्या जागी नवीन देशी वृक्ष लावण्याची वन विभागाची योजना आहे़ याबाबतचा प्रस्ताव वन विभागाने शासनाकडे पाठविला होता़ त्याला शासनाने मान्यता दिली असून, दर वर्षी १ हेक्टर जागेवरील परदेशी झाडे काढून, त्या जागी देशी वृक्ष लावण्यास शासनाने मान्यता दिली आहे़ याबाबत वन विभागाचे उपवनसंरक्षक सत्यजित गुजर यांनी सांगितले की, शहराभोवतालच्या टेकड्या वर्षभर हिरव्यागार दिसाव्यात, यासाठी वन विभागाचा प्रयत्न आहे़ लोकसहभागातून ते शक्य असल्याचे वारजे येथे राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पातून दिसून आले आहे़ भांबुर्डा, पाचगाव पर्वती येथील परदेशी झाडांमुळे जमिनींचे संर्वधन झाले आहे़ त्याचा सर्व्हे करण्यात आला असून, त्याठिकाणी आता वड, पिंपळ, आवळा, कडुलिंब असे देशी वृक्ष लावण्यात येणार आहेत. आपल्याकडे कोणतेही झाड तोडले की, लगेच त्यावरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतो़ त्यामुळे ही झाडे काढण्याअगोदर जनजागृती करून त्यामागची कारणे सर्वांना सांगण्यात येणार आहेत. वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण होऊ नये, यासाठी संरक्षक भिंतीचे काम हाती घेण्यात आले असून, आतापर्यंत १५ किमी भिंतीचे काम झाले आहे. यंदा ८ ते १० किमीच्या सरंक्षक भिंतीचे काम हाती घेण्यात येणार आहे़ एकदा जमिनीचे संरक्षण झाले की, निसर्गच पक्ष्यांमार्फत वनीकरणाचे काम करीत असतो़