शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
5
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
6
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
7
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
8
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
9
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
10
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

कापूस उत्पादकांचे पाच हजार कोटी बोंडअळीने खाल्ले

By अतुल कुलकर्णी | Published: December 08, 2017 3:48 AM

गुलाबी बोंडअळीने कापसाचे पीक फस्त केल्याने बीटी कॉटन बियाणे आणि कीटकनाशकांवर कापूस उत्पादक शेतकºयांनी खर्च केलेले सुमारे पाच हजार कोटी रुपये पाण्यात गेले आहेत.

मुंबई : गुलाबी बोंडअळीने कापसाचे पीक फस्त केल्याने बीटी कॉटन बियाणे आणि कीटकनाशकांवर कापूस उत्पादक शेतकºयांनी खर्च केलेले सुमारे पाच हजार कोटी रुपये पाण्यात गेले आहेत.यंदा ४२.०६ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. पैकी ९५ टक्के क्षेत्र बीटी कापसाच्या पिकाखाली आहे. यासाठी १ कोटी ६५ लाख बीटी कापसाच्या बियाणांची पाकिटे वापरली गेली. एका पाकिटाची किंमत ७५० रुपये लक्षात घेता फक्त बियाणांवर शेतकºयांचे १२३७ कोटी ३० लाख रुपये खर्च झाले. तर सुमारे साडेतीन हजार कोटी रुपये रासायनिक औषधे व खतांवर खर्च केले गेले आहेत.सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ कॉटन रिसर्च या केंद्रीय संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. के.आर. क्रांथी यांच्या समितीने डिसेंबर २०१५ मध्येच विविध राज्यांतल्या कापसाच्या पिकाचा अभ्यास करून बीटी कॉटनचे बियाणे बोंडअळीला बळी पडू नये यासाठी काही उपाय सुचवले होते. मात्र त्यावर केंद्र सरकारने ठोस पावले उचलली नाहीत.विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही ६ जुलै रोजी राज्य सरकारला पत्र लिहून वेळीच उपाय करा, असे कळवले. मात्र सरकारने दखल घेतली नाही. परिणामी ९५ टक्के कापसाचे पीक बोंडअळीच्या तडाख्यात सापडले.बोंडअळी दाद देत नाही हे पाहून शेतकºयांनी दोन-तीन रासायनिक औषधांचे मिश्रण करून फवारणी केली. त्यात काही शेतकºयांचे जीवही गेले. मात्र हजारो कोटींचा व्यवहार करणाºया कंपन्यांचे मिंधे झालेल्या अधिकाºयांनी आणि प्रशासनाने कोणतीही प्रभावी जनजागृती केली नाही, असा गंभीर आरोप मुंडे यांनी केला आहे.केंद्र शासनाने बीटी तंत्रज्ञानाचे व्यापारीकरण करण्यासाठी बियाणे उत्पादकांना बी.जी. २ तंत्रज्ञानावर आधारित बियाणे उत्पादनाची परवानगी दिली असून यात ‘ट्रान्सजेनिक जिन्स’ असल्याने बोंडअळीला प्रतिकार करणारे आहे, असा खुलासा कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार यांनी केला आहे. मात्र या बियाणांची प्रतिकारशक्ती कशी कमी झाली, हे त्यांनी सांगितले नाही.तुम्ही सरसकट पद्धतीने २० रोपे निवडा, त्यात अळी दिसली तर फवारणी करा, असे अत्यंत बारीक अक्षरात बी.टी. बियाणे कंपन्यांनी माहिती पत्रकात छापलेले असते. मात्र हे कोणी शेतकºयांना सांगत नाही. ही सगळी कंपन्यांची आणि अधिकाºयांची बदमाशी आहे. तंत्रज्ञानात शेतकºयांचा अभिमन्यू करून त्याला आणखी गाळात घातले जात आहे. - विजय जावंधिया, शेतीतज्ज्ञ