शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

Coronavirus: उत्तर प्रदेशातील मजुरांची वाट बिकटच! आधी कोरोना टेस्ट करा मगच पाठवा, योगींची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 06:56 IST

सर्वांची कोरोना तपासणी अशक्य

मुंबई : उत्तर प्रदेशातील लाखो मजूर लॉकडाउनमुळे महाराष्ट्रात अडकले असून त्यांच्या आरोग्य तपासणीची अट योगी आदित्यनाथ सरकारने घातल्याने या मजुरांच्या स्थलांतराचा प्रश्न बिकट बनला आहे.

सुरुवातीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या लोकांना घेण्याची तयारी दर्शवली होती; मात्र देशभरातून उत्तर प्रदेशात येणाऱ्यांची संख्या किमान एक कोटीच्या घरात आहे. एवढ्या लोकांच्या क्वारंटाइन आणि आयसोलेशनची यंत्रणा उत्तर प्रदेश सरकारकडे आज उपलब्ध नाही. त्यामुळे आता उत्तर प्रदेश सरकारने या लोकांना आपल्या राज्यात घेण्यासाठी वेगवेगळी कारणे पुढे करणे सुरू केले आहे.

उत्तर प्रदेश व महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंंगवर मीटिंंग झाली. त्यात आमच्याकडे पाठवणाऱ्यांची कोरोना टेस्ट करा, निगेटिव्ह रिपोर्ट असतील तरच त्यांना पाठवा. यादीसोबत त्यांचे रिपोर्टही जोडा, अशा अटी उत्तर प्रदेश सरकारने घातल्या. गेले ४० दिवस हे मजूर राज्यात सरकारने तयार केलेल्या निवास व्यवस्थेत आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाली असती तर त्या वेळीच ते लक्षात आले असते. त्यांची तपासणी करून त्यांना पाठविणे अशक्य आहे, अशी महाराष्ट्राची भूमिका एका अधिकाऱ्याने स्पष्ट केली.

राज्यात किमान २५ लाख लोक आहेत. एवढ्यांची कोरोना तपासणी करणे अशक्य आहे, असे मत मंत्री  नवाब मलिक यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मुंबईत ४० दिवसांत ७० ते ८० हजार तपासण्या होऊ शकल्या. पंचवीस लाख लोकांच्या तपासण्या महाराष्ट्रात करायचे झाले तर त्यासाठी जो वेळ लागेल, तेवढा वेळ थांबण्यासाठी हे लोक तयार नाहीत, असेही मलिक यांनी स्पष्ट केले. मुंबईत १५ ते २० हजार टॅक्सीचालक आहेत जे स्वत:ची टॅक्सी घेऊन उत्तर प्रदेशला जाण्यासाठी तयार आहेत. अशा लोकांना घेण्यासही उत्तर प्रदेश सरकारने तूर्त सहमती दर्शवली नाही, असे मंत्रालयातील अधिकाºयांनी स्पष्ट केले.कर्नाटक सरकारनेदेखील हीच भूमिका घेतली आहे. कर्नाटकमधील काही लोक महाराष्ट्रात अडकले आहेत. त्यांचीदेखील तपासणी केल्याशिवाय त्यांना पाठवू नका, असे त्यांनी सांगितले.‘आत्ताच लोकांना पाठवू नका’ : आंध्र प्रदेशमधून एक ट्रेन उत्तर प्रदेशमध्ये पोहोचल्यानंतर त्या लोकांना क्वारंटाइन करण्यासाठी ज्या ठिकाणी नेण्यात आले तेथे मोठा गोंधळ उडाला. परिणामी, तिथली सगळी व्यवस्था कोलमडून गेली. म्हणून महाराष्ट्रातून आत्ताच लोकांना पाठवू नका, असे पत्र उत्तर प्रदेश सरकारने महाराष्ट्राला पाठविले. त्यामुळे महाराष्ट्रातून जाणाºया रेल्वेवर आता मोठे प्रश्नचिन्ह तयार झाले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस