शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Coronavirus : दहावीचा शेवटचा पेपर होणार की नाही? विद्यार्थी, पालकांची धाकधूक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 03:42 IST

coronavirus : सुरुवातीला नववी व अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर घेण्यात येतील आणि भूगोल पेपरचा निर्णय ३१ मार्चनंतर घेण्यात येईल, असे शिक्षणमंत्र्यांकडून घोषित करण्यात आले होते.

मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दहावीच्या परीक्षेतील शेवटचा भूगोलाचा पेपर शालेय शिक्षण विभागाकडून ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. ३१ मार्चनंतर याबाबतीत निर्णय घेतला जाणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले असले तरी सोमवारी देशात २१ दिवसांच्या लॉकडाउनच्या घोषणेनंतर या पेपरवर अनिश्चिततेचे सावट पसरल्याने दहावीचे विद्यार्थी व पालकांची धाकधूक वाढली आहे.सुरुवातीला नववी व अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर घेण्यात येतील आणि भूगोल पेपरचा निर्णय ३१ मार्चनंतर घेण्यात येईल, असे शिक्षणमंत्र्यांकडून घोषित करण्यात आले होते. मात्र देशभरातील लॉकडाउनच्या घोषणेनंतर या परीक्षा होतील की नाही किंवा घ्याव्यात की नाहीत, असा प्रश्न पालक, विद्यार्थी, शिक्षकांपुढे उभा राहिला आहे. लॉकडाउनच्या घोषणेनंतर सीईटी सेलकडून होणारी १३ ते २३ एप्रिल दरम्यानची परीक्षाही पुढे ढकलण्यात आली. यामुळे दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपर होईल की नाही, असा गोंधळ पालकांमध्ये उडाला.पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या मूल्यांकनाच्या सरासरी गुणांवर पुढील वर्गात प्रवेश द्यावा, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. असाच निर्णय दहावीच्या भूगोलाच्या पेपरच्या बाबतीत घेता येईल का, याची चाचपणी शिक्षण विभागाने करावी, असा सूर पालकांमधून येत आहे. शिक्षण विभागाच्या बेजबाबदारपणामुळे आधीच पालक विद्यार्थ्यांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता हा उरलेला पेपर घ्यायचाच हा हट्ट करण्यात अर्थ नाहीच. याऐवजी योग्य निर्णय घेऊन वेळीच पालक, विद्यार्थ्यांना दिलासा कसा देता येईल याकडे शिक्षण विभागाने लक्ष द्यावे, अशी प्रतिक्रिया हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलचे शिक्षक उदय नरे यांनी दिली आहे.‘विद्यार्थ्यांना वेठीस धरु नये’राज्य शिक्षण मंडळाने ज्या विषयांची परीक्षा झाली आहे, त्याच विषयांचे गुण ग्राह्य धरीत निकाल लावावा, ४० गुणांसाठी पुन्हा विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये, असे मत सह्याद्री, कांदिवली येथे राहणारे पालक मंगेश कळंबे यांनी व्यक्त केले. तर पेपर होईल की नाही याबाबत आम्हाला शंकाच आहे, मात्र आम्ही एका विषयाचाच अभ्यास किती दिवस करत राहायचा, असा सवाल दहावीच्या सुमेध रहाटे याने उपस्थित केला.

टॅग्स :examपरीक्षाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस