शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
4
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
5
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
6
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
7
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
8
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
9
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
10
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
11
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
12
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
13
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
14
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
15
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
16
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
17
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
18
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
19
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
20
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका

Coronavirus : दहावीचा शेवटचा पेपर होणार की नाही? विद्यार्थी, पालकांची धाकधूक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 03:42 IST

coronavirus : सुरुवातीला नववी व अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर घेण्यात येतील आणि भूगोल पेपरचा निर्णय ३१ मार्चनंतर घेण्यात येईल, असे शिक्षणमंत्र्यांकडून घोषित करण्यात आले होते.

मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दहावीच्या परीक्षेतील शेवटचा भूगोलाचा पेपर शालेय शिक्षण विभागाकडून ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. ३१ मार्चनंतर याबाबतीत निर्णय घेतला जाणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले असले तरी सोमवारी देशात २१ दिवसांच्या लॉकडाउनच्या घोषणेनंतर या पेपरवर अनिश्चिततेचे सावट पसरल्याने दहावीचे विद्यार्थी व पालकांची धाकधूक वाढली आहे.सुरुवातीला नववी व अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर घेण्यात येतील आणि भूगोल पेपरचा निर्णय ३१ मार्चनंतर घेण्यात येईल, असे शिक्षणमंत्र्यांकडून घोषित करण्यात आले होते. मात्र देशभरातील लॉकडाउनच्या घोषणेनंतर या परीक्षा होतील की नाही किंवा घ्याव्यात की नाहीत, असा प्रश्न पालक, विद्यार्थी, शिक्षकांपुढे उभा राहिला आहे. लॉकडाउनच्या घोषणेनंतर सीईटी सेलकडून होणारी १३ ते २३ एप्रिल दरम्यानची परीक्षाही पुढे ढकलण्यात आली. यामुळे दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपर होईल की नाही, असा गोंधळ पालकांमध्ये उडाला.पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या मूल्यांकनाच्या सरासरी गुणांवर पुढील वर्गात प्रवेश द्यावा, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. असाच निर्णय दहावीच्या भूगोलाच्या पेपरच्या बाबतीत घेता येईल का, याची चाचपणी शिक्षण विभागाने करावी, असा सूर पालकांमधून येत आहे. शिक्षण विभागाच्या बेजबाबदारपणामुळे आधीच पालक विद्यार्थ्यांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता हा उरलेला पेपर घ्यायचाच हा हट्ट करण्यात अर्थ नाहीच. याऐवजी योग्य निर्णय घेऊन वेळीच पालक, विद्यार्थ्यांना दिलासा कसा देता येईल याकडे शिक्षण विभागाने लक्ष द्यावे, अशी प्रतिक्रिया हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलचे शिक्षक उदय नरे यांनी दिली आहे.‘विद्यार्थ्यांना वेठीस धरु नये’राज्य शिक्षण मंडळाने ज्या विषयांची परीक्षा झाली आहे, त्याच विषयांचे गुण ग्राह्य धरीत निकाल लावावा, ४० गुणांसाठी पुन्हा विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये, असे मत सह्याद्री, कांदिवली येथे राहणारे पालक मंगेश कळंबे यांनी व्यक्त केले. तर पेपर होईल की नाही याबाबत आम्हाला शंकाच आहे, मात्र आम्ही एका विषयाचाच अभ्यास किती दिवस करत राहायचा, असा सवाल दहावीच्या सुमेध रहाटे याने उपस्थित केला.

टॅग्स :examपरीक्षाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस