शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
2
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
3
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
4
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
5
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
7
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
8
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
9
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
10
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
11
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
12
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
13
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
14
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
15
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
16
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
18
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
19
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
20
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!

Coronavirus : दहावीचा शेवटचा पेपर होणार की नाही? विद्यार्थी, पालकांची धाकधूक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 03:42 IST

coronavirus : सुरुवातीला नववी व अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर घेण्यात येतील आणि भूगोल पेपरचा निर्णय ३१ मार्चनंतर घेण्यात येईल, असे शिक्षणमंत्र्यांकडून घोषित करण्यात आले होते.

मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दहावीच्या परीक्षेतील शेवटचा भूगोलाचा पेपर शालेय शिक्षण विभागाकडून ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. ३१ मार्चनंतर याबाबतीत निर्णय घेतला जाणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले असले तरी सोमवारी देशात २१ दिवसांच्या लॉकडाउनच्या घोषणेनंतर या पेपरवर अनिश्चिततेचे सावट पसरल्याने दहावीचे विद्यार्थी व पालकांची धाकधूक वाढली आहे.सुरुवातीला नववी व अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर घेण्यात येतील आणि भूगोल पेपरचा निर्णय ३१ मार्चनंतर घेण्यात येईल, असे शिक्षणमंत्र्यांकडून घोषित करण्यात आले होते. मात्र देशभरातील लॉकडाउनच्या घोषणेनंतर या परीक्षा होतील की नाही किंवा घ्याव्यात की नाहीत, असा प्रश्न पालक, विद्यार्थी, शिक्षकांपुढे उभा राहिला आहे. लॉकडाउनच्या घोषणेनंतर सीईटी सेलकडून होणारी १३ ते २३ एप्रिल दरम्यानची परीक्षाही पुढे ढकलण्यात आली. यामुळे दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपर होईल की नाही, असा गोंधळ पालकांमध्ये उडाला.पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या मूल्यांकनाच्या सरासरी गुणांवर पुढील वर्गात प्रवेश द्यावा, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. असाच निर्णय दहावीच्या भूगोलाच्या पेपरच्या बाबतीत घेता येईल का, याची चाचपणी शिक्षण विभागाने करावी, असा सूर पालकांमधून येत आहे. शिक्षण विभागाच्या बेजबाबदारपणामुळे आधीच पालक विद्यार्थ्यांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता हा उरलेला पेपर घ्यायचाच हा हट्ट करण्यात अर्थ नाहीच. याऐवजी योग्य निर्णय घेऊन वेळीच पालक, विद्यार्थ्यांना दिलासा कसा देता येईल याकडे शिक्षण विभागाने लक्ष द्यावे, अशी प्रतिक्रिया हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलचे शिक्षक उदय नरे यांनी दिली आहे.‘विद्यार्थ्यांना वेठीस धरु नये’राज्य शिक्षण मंडळाने ज्या विषयांची परीक्षा झाली आहे, त्याच विषयांचे गुण ग्राह्य धरीत निकाल लावावा, ४० गुणांसाठी पुन्हा विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये, असे मत सह्याद्री, कांदिवली येथे राहणारे पालक मंगेश कळंबे यांनी व्यक्त केले. तर पेपर होईल की नाही याबाबत आम्हाला शंकाच आहे, मात्र आम्ही एका विषयाचाच अभ्यास किती दिवस करत राहायचा, असा सवाल दहावीच्या सुमेध रहाटे याने उपस्थित केला.

टॅग्स :examपरीक्षाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस