शहरं
Join us  
Trending Stories
1
ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
2
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
3
"महाराष्ट्रातील घडामोडींवर माझं लक्ष, तुमचा…’’, तक्रार घेऊन आलेल्या एकनाथ  शिंदेनां अमित शाहांचं मोठं आश्वासन
4
राज्यपालांवर वेळेची मर्यादा घालता येणार नाही; राष्ट्रपतींच्या 'त्या' प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
5
अल फलाह युनिव्हर्सिटीचे चेअरमन जावेद सिद्दीकी यांच्या अडचणी वाढल्या; आता घरावर चालणार बुलडोझर 
6
“डिसेंबर अखेरपर्यंत महामेट्रो मीरा-भाईंदरकरांच्या सेवेत येणार”: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
7
एक 'अशी' शूटर बनली नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री; जिनं भारताबाहेर कायम ठेवलाय दबदबा
8
फातिमा सना शेखने फेमिनझमवर केलं भाष्य; म्हणाली, "पुरुषांना कमी दाखवणं म्हणजे..."
9
भारतीय लष्कराला बूस्ट! अमेरिकेने जेव्हलिन क्षेपणास्त्र विक्रीला दिली मंजुरी
10
प्रवाशांसाठी गुड न्यूज! कोकण रेल्वेवरील ‘या’ एक्स्प्रेसचा वेग वाढला; ४० मिनिटे लवकर पोहोचेल
11
Kandivali: कांदिवलीत भरदिवसा तिघांचा दुचाकीने येत इस्टेट एजंटवर गोळीबार!
12
सांगलीकर काळजी घ्या! ऊसाच्या शेतामध्ये बिबट्याची चार पिल्लं सापडली, एकच खळबळ
13
१७० खोल्या, क्रिकेट ग्राऊंड, गोल्फ कोर्स... बकिंघम पॅलेसपेक्षाही चार पट मोठं आहे भारतातील हे घर
14
"तुम्हाला भाजप आवडत आहे, तर तुम्ही काँग्रेसमध्ये कशाला थांबलात?"; माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने शशी थरूर यांना सुनावले
15
ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
16
"ठाकरेंवर आरोप करणारी भाजपा २० वर्ष BMC मध्ये उपमहापौरपदी होती हे सोयीस्करपणे विसरते"
17
खंडोबा नवरात्र २०२५: खंडोबाचे षडरात्रोत्सव हा केवळ उत्सव नाही तर कुळाचार; पाहा पूजा साहित्य आणि व्रतविधी
18
Sonam Kapoor : सोनम कपूर दुसऱ्यांदा होणार आई, बेबी बंप फ्लॉन्ट करत केलं फोटोशूट; नवऱ्याची मजेशीर कमेंट
19
कूनोतून आली गुडन्यूज; भारतात जन्मलेल्या पहिल्या मादी चित्ता ‘मुखी’ने दिला 5 शावकांना जन्म
20
नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत हाॅकफोर्सचे पोलीस उपनिरिक्षक आशिष शर्मा यांना वीरमरण, जानेवारीत होणार होतं लग्न
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: कोरोनाच्या अग्निपरीक्षेतून बाहेर पडल्याशिवाय अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा घ्यायच्या? शिवसेनेचा राज्यपालांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 08:24 IST

परवा शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत.

ठळक मुद्देकोरोनामुळे २०२० हे वर्षच जीवनातून नष्ट झाले आहे. इतका वाईट काळ कधी आला नव्हता. सर्वच वाया गेले तिथे शैक्षणिक वर्ष तरी कसे वाचेलमहाराष्ट्राच्या राज्यपालांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याच, असा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरला आहेमहाराष्ट्रात विद्यार्थी संख्या १० लाखांच्या घरात आहे. त्यामुळे सर्व नियमांचे पालन करून  परीक्षा घेणे अवघड होईल.

मुंबई - पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांवरून राज्यपाल आणि राज्य सरकार आमने-सामने आले आहेत. परवा शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. या लुडबुडीच अर्थ काय? असा सवालही या अग्रलेखामधून उपस्थित करण्यात आला आहे.

सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हटले आहे की, कोरोनामुळे २०२० हे वर्षच जीवनातून नष्ट झाले आहे. इतका वाईट काळ कधी आला नव्हता. सर्वच वाया गेले तिथे शैक्षणिक वर्ष तरी कसे वाचेल. तेही वाया जाताना दिसत आहे. त्यात महाराष्ट्राच्या राज्यपालांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याच, असा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरला आहे. हा वाद उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे झाला आहे. मुळात हा वाद नाही. सामंत यांनी आपले मत व्यक्त केलेय.

महाराष्ट्रात विद्यार्थी संख्या १० लाखांच्या घरात आहे. त्यामुळे सर्व नियमांचे पालन करून  परीक्षा घेणे अवघड होईल. सध्या देशात जशी आरोग्य आणीबाणी आहे तशीच शैक्षणिक आणीबाणीसुद्धा आहे. त्या पार्श्वभूमीवर सामंत यांनी सरळसोट भूमिका घेतली आहे. त्यासंदर्भात त्यांनी यूजीसीला पत्र लिहिले आहे.  त्यावरून राजभवनास अंधारात ठेवले, असे राज्यपालांचे मत आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ती त्यांची तळमळ आहे. पण तिला व्यावहारिक रूप कसे द्यायचे, असा सवालही सामनामधून राज्यपालांसमोर  उपस्थित करण्यात आला आहे.

राज्यातील शाळा, कॉलेज, विद्यापीठे बंद आहेत. हे चित्र देशभर किंवा जगभर आहे. मुंबई विद्यापीठांतर्गत ठाणे, कोकणसह मोठा भाग येतो, तेथील परिस्थिती राजभवनास अवगत नसावी? कोरोनासमोर सगळ्यांनीच हात टेकले. तिथे विद्यापीठे काय करणार? 10 लाख विद्यार्थी  परीक्षा केंद्रांवर येणार कसे? त्यांची व्यवस्था कशी करायची? कर्मचारी, प्राध्यापक, शिक्षक पोहोचणार कसे? परीक्षांच्या माध्यमातून कोरोनाचे संक्रमण वाढले तर कसे करायचे? अशी विचारणा या अग्रलेखामधून करण्यात आली आहे.

सध्या अनेक शैक्षणिक संस्था राज्य सरकारने ताब्यात घेतल्या आहे. अशा परिस्थितीत परीक्षा केंद्रे कुठे निर्माण करायची?  संघप्रणित एबीव्हीपीनेही परीक्षांना विरोध केलाय. गुजरात गोव्यामध्ये भाजपाप्रणित विद्यार्थी संघटनांनी आधीच भूमिका जाहीर केली आहे.महाराष्ट्रात भाजपाविरोधी पक्ष सत्तेत आहे, म्हणून विरुद्ध भूमिका घेतली जात आहे का? असा सवालही शिवसेनेने विचारला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या  

उद्धव ठाकरे आणि राज्यपालांमधील संबंधांबाबत संजय राऊत यांचे भाष्य, म्हणाले... 

कोरोनामुळे निर्माण झालेल्या तणावादरम्यान अमेरिकेचा चीनला तगडा धक्का, केली मोठी कारवाई 

लॉकडाऊन आणि मंदीचे सावट असतानाही ही कंपनी करणार ५० हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती 

रामजन्मभूमीचे सपाटीकरण करताना सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष 

पदव्यांशिवाय परीक्षा ही कल्पना महाराष्ट्राच्या शैक्षणिक परंपरेस परवडणारी नाही. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. सध्या राज्यपालांना महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेची चिंता लागून राहिली आहे. त्यामुळे त्यांनीच यामधून मार्ग काढायला हवा. पण कोरोनाच्या अग्निपरीक्षेतून बाहेर पडल्याशिवाय विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा घ्यायच्या? अशी विचारणा अग्रलेखातून करण्यात आली आहे. तसेच राज्याच्या उच्च शिक्षणमंत्र्यांनी राज्यपालांशी चर्चा करून याबाबत आंतिम निर्णय घ्यावा. महाराष्ट्र आज कोरोनाशी लढत आहे. त्या लढ्यात दहा लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे म्हणजे नव्या संकटाची चाहूल ठरू नये, असा सल्लाही सामनामधून देण्यात आला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEducation Sectorशिक्षण क्षेत्रexamपरीक्षाGovernmentसरकारShiv Senaशिवसेना