शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: सत्ताधारी घरात बसल्याने आम्ही फिरणार, देवेंद्र फडणवीस यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 06:30 IST

जनतेच्या समस्या, अडचणी जाणून घेण्यासाठी कितीही गंभीर परिस्थिती असली तरी आम्ही त्यांच्यापर्यंत जाणारच आणि त्यांना दिलासा देणार, असा निर्धार व्यक्त करीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

जळगाव : कोरोनासारख्या गंभीर प्रसंगात जनतेला मदत करणे सोडून राज्यातील सत्ताधारी घरात बसले आहेत. त्यांना सर्वसामान्यांची चिंता नसली तरी आम्हाला आहे. जनतेच्या समस्या, अडचणी जाणून घेण्यासाठी कितीही गंभीर परिस्थिती असली तरी आम्ही त्यांच्यापर्यंत जाणारच आणि त्यांना दिलासा देणार, असा निर्धार व्यक्त करीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिले.फडणवीस यांनी सुरुवातीला कोविड रुग्णालयात पाहणी केली. सोबत आमदार गिरीश महाजन यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे खासदार, आमदार तसेच पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडून उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जळगाव जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यूदर चिंताजनक आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात तपासण्या (टेस्टिंग) वाढविण्याची गरज आहे. सध्या आयसीएमआरच्या निर्देशानुसार ज्या प्रमाणात टेस्टिंग व्हायला पाहिजे, टेस्टिंगचे अहवाल तीन-चार दिवस येत नसल्याने संसर्ग वाढून रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. त्यामुळे २४ तासांत अहवाल येणे आवश्यक आहे, अस त्यांनी सांगितले.सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाकोरोना रुग्णालयाची पाहणी करीत असताना भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अधिकाºयांची मोठी गर्दी उसळली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पत्रकारांशी संवाद साधतानाही फडणवीस यांच्या आजूबाजूला पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचीही मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.महाविद्यालयीन परीक्षेचा पोरखेळ होऊ नयेऔरंगाबाद : राज्यातील महाविद्यालये व विद्यापीठांतील परीक्षेविषयी पोरखेळ सुरू आहे. युवासेनेच्या आग्रहाखातर विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ न करता समन्वयातून परीक्षेचा प्रश्न सोडविण्यात यावा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालयातील अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यावर राज्य शासनाने परीक्षा घेणार नसल्याची भूमिका जाहीर केली आहे. यावर ते म्हणाले, देशातील इतर राज्यांत परीक्षा घेण्यात आल्यास आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या पदव्यांची किंमत राहणार नाही. युजीसीने परीक्षा तात्काळ घेण्याच्या सूचना केलेल्या नाहीत. कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर सोशल डिस्टन्स पाळून परीक्षा घेता येतील. मात्र, पॉलिटिकल इगोसाठी प्रकरण ताणले जात आहे. यात नुकसान विद्यार्थ्यांचे होणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस