शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

coronavirus: सत्ताधारी घरात बसल्याने आम्ही फिरणार, देवेंद्र फडणवीस यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 06:30 IST

जनतेच्या समस्या, अडचणी जाणून घेण्यासाठी कितीही गंभीर परिस्थिती असली तरी आम्ही त्यांच्यापर्यंत जाणारच आणि त्यांना दिलासा देणार, असा निर्धार व्यक्त करीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

जळगाव : कोरोनासारख्या गंभीर प्रसंगात जनतेला मदत करणे सोडून राज्यातील सत्ताधारी घरात बसले आहेत. त्यांना सर्वसामान्यांची चिंता नसली तरी आम्हाला आहे. जनतेच्या समस्या, अडचणी जाणून घेण्यासाठी कितीही गंभीर परिस्थिती असली तरी आम्ही त्यांच्यापर्यंत जाणारच आणि त्यांना दिलासा देणार, असा निर्धार व्यक्त करीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिले.फडणवीस यांनी सुरुवातीला कोविड रुग्णालयात पाहणी केली. सोबत आमदार गिरीश महाजन यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे खासदार, आमदार तसेच पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडून उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जळगाव जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यूदर चिंताजनक आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात तपासण्या (टेस्टिंग) वाढविण्याची गरज आहे. सध्या आयसीएमआरच्या निर्देशानुसार ज्या प्रमाणात टेस्टिंग व्हायला पाहिजे, टेस्टिंगचे अहवाल तीन-चार दिवस येत नसल्याने संसर्ग वाढून रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. त्यामुळे २४ तासांत अहवाल येणे आवश्यक आहे, अस त्यांनी सांगितले.सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाकोरोना रुग्णालयाची पाहणी करीत असताना भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अधिकाºयांची मोठी गर्दी उसळली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पत्रकारांशी संवाद साधतानाही फडणवीस यांच्या आजूबाजूला पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचीही मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.महाविद्यालयीन परीक्षेचा पोरखेळ होऊ नयेऔरंगाबाद : राज्यातील महाविद्यालये व विद्यापीठांतील परीक्षेविषयी पोरखेळ सुरू आहे. युवासेनेच्या आग्रहाखातर विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ न करता समन्वयातून परीक्षेचा प्रश्न सोडविण्यात यावा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालयातील अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यावर राज्य शासनाने परीक्षा घेणार नसल्याची भूमिका जाहीर केली आहे. यावर ते म्हणाले, देशातील इतर राज्यांत परीक्षा घेण्यात आल्यास आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या पदव्यांची किंमत राहणार नाही. युजीसीने परीक्षा तात्काळ घेण्याच्या सूचना केलेल्या नाहीत. कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर सोशल डिस्टन्स पाळून परीक्षा घेता येतील. मात्र, पॉलिटिकल इगोसाठी प्रकरण ताणले जात आहे. यात नुकसान विद्यार्थ्यांचे होणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस