शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: अटी घालून आषाढीला परवानगी देण्याची वारकऱ्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 05:46 IST

हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, वारकऱ्यांची आर्त साद 

- बाळासाहेब बोचरे मुंबई : हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, वारी चुकू न दे हरी, अशी आस मनी बाळगून असलेल्या वारकऱ्यांना नियमांच्या अधीन राहून आषाढीचा सुखसोहळा मोठ्या प्रमाणात नसला तरी प्रातिनिधिक स्वरूपात करून संत आणि देव यांच्या भेटीची परंपरा कायम राखावी, अशी भावनिक साद वैष्णवजणांमध्ये ऐकायला मिळत आहे.शासन आणि प्रशासन यंत्रणेला झेपेल तेवढ्या प्रमाणातच वारीला परवानगी द्यावी, शेकडो वर्षांच्या सोहळ््यात खंड पडू नये, अशीच भावना अनेकांनी लोकमतकडे व्यक्त केली. आषाढी एकादशीपर्यंत कोरोना आटोक्यात येईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. पण सरकार अद्याप वारकºयांशी कसलीच चर्चा करत नाही, किंवा निर्णयही देत नसल्याने वारकºयांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहेपंढरपूरला आषाढी वारीसाठी सात संतांच्या मानाच्या पालख्या असतात. मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथून निघणारी संत मुक्ताबाई यांच्या पालखीचे नियोजित प्रस्थान २७ मे रोजी आहे. तर १७ मे रोजी संत मुक्ताईचा समाधी सोहळा असल्याने त्याच दिवशी प्रस्थानाचीही तयारी केली जाते. त्यानंतर संत निवृत्तीनाथ महाराज (६ जून), संत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराजांची पालखी (१२ जून) व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी (१३ जून), संत सोपान काका (१८ जून) व संत नामदेव महाराजांची पालखी पंढरपूर येथूनच दशमीला प्रस्थान ठेवते.वारीमध्ये बहुतांश वारकरी हे वयोवृद्ध असतात. महामारीच्या या संकटात त्यांची जबाबदारी कोण घेणार? त्यापेक्षा शासनजसे सांगेल ते ऐकण्याशिवाय पर्याय नाही. प्रतीकात्मक पद्धतीने केवळ निवडक लोकांसमवेत पादुका घेऊन गेले तरी वारी पूर्ण होऊ शकते.- बाळासाहेब पवार- आरफळकर, मालक, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाप्रशासनही तणावात आहे. वारीची परंपरा खंडित होणार नाही या पद्धतीने शासनाने नियोजन करावे.- ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, अध्यक्ष, समस्त वारकरी फडकरी- दिंडी संघटनाअगदी रझाकारांच्या काळातही पालखीवर संकटे आली. पण वारकºयांनी त्यावर मात केली. गेल्या ४२१ वर्षांत आमच्या सोहळ्यावर असे संकट आले नव्हते. नियमावली करून परवानगी दिली तर आम्ही शिस्तीने आणि जबाबदारीने सोहळा पार पाडू.- रघुनाथ बुवा गोसावी पालखीवाले, सोहळा प्रमुख,संत एकनाथ महाराज पालखी सोहळासुमारे सातशे वर्षांची परंपरा असलेला संत तुकाराम महाराजांचा पंढरपूर पालखी सोहळा कधी बंद पडला नाही. सरकारने परवानगी दिली तरी कमीत कमी लोकांमध्ये हा सोहळा पार पाडायचा. जास्त गर्दी होऊ द्यायची नाही, यावर आमचे एकमत झाले आहे.- बाळासाहेब मोरे, माजी सोहळाप्रमुख, संत तुकाराम पालखी सोहळापालखी सोहळ्यावर पूवीर्ही संकटे आली होती. परंतु पालखी सोहळा कधीच खंडित झालेला नाही. प्रशासनाच्या विरोधातही आम्हाला भूमिका घ्यायची नाही.- रविंद्र महाराज हरणे, सोहळा प्रमुख,संत मुक्ताबाई पालखी सोहळापोलीस प्रशासनाचे सहकार्य घेऊन संतमेळा घडला पाहिजे. प्रशासनानेही त्याचा अंदाज घ्यावा आणि परवानगी द्यावी.- मोहन महाराज बेलापूरकर,संत निवृत्तीनाथ पालखी सोहळा

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा