शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Updates: ७१ हजारांहून अधिक नागरिक कोरोनामुक्त; महाराष्ट्राला आधार देणारा आकडा, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 21:14 IST

Coronavirus In Maharashtra : गेल्या काही दिवसांच्या तुलनेत रुग्णवाढीत झाली मोठी घट. महाराष्ट्रातून दिलासा देणारी बातमी आली समोर

ठळक मुद्देमहाराष्ट्रातून दिलासा देणारी बातमी आली समोरगेल्या काही दिवसांच्या तुलनेत रुग्णवाढीत झाली मोठी घट.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात आणि देशात कोरोनाबाधितांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. परंतु आता राज्यातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या चोवीस तासांत कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये ७१,७३६ जणांनी कोरोनावर मात केली. तर ४८,७०० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर दुसरीकडे चोवीस तासांत ५२४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या चोवीस तासांत राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनामुक्त नागरिकांची नोंद झाली आहे. मुंबईतही मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ४३,४३,७२७ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत एकूण ३६,०१७९६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या ६,७४७७० जणांवर उपचार सुरू आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर आता ८२.९२ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईतही कोरोनामुक्त अधिकमुंबईत गेल्या चोवीस तासांमध्ये तब्बल ९,१५० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनाबाधितांच्या संख्येतही घट झाली असून गेल्या चोवीस तासांत ३,८७६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. मुंबईत सध्या ७०,३७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर मुंबईतील रुग्णवाढीचा दर ६२ दिवसांवर पोहोचला असून रुग्ण बरे होण्याचा दर ८७ टक्क्यांवर पोहोचला आहे. 

सहा दिवसांत ४ लाख ४२ हजार रुग्ण कोरोनामुक्त  कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा दिवसात राज्यभरात ४ लाख ४२ हजार ४६६ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. गेल्या चोवीस तासांत ७१ हजार ७३६ रुग्णांना घरी सोडण्यात आलं. त्यात सर्वाधिक १३ हजार ६७४ रुग्ण पुणे येथील आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात गेल्या दोन महिन्यापासून दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होत आहे. दररोज किमान ६० हजारांच्या आसपास नविन रुग्णांची नोंद होत आहे. आठवडाभरापूर्वी १८ एप्रिलला आतापर्यंतची सर्वाधिक ६८ हजार ६३१ इतके रुग्ण एकाच दिवशी आढळून आले होते. आठवडाभरानंतर मात्र रुग्णसंख्येत जास्तीची वाढ झालेली आढळून आली नाही. मात्र दैनंदिन रुग्णसंख्या स्थिर आहे. त्याप्रमाणात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे, ही दिलासा देणारी बाब ठरली आहे. आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्स यांच्या प्रयत्नांमुळे रुग्णांना कोरोनामुक्त होण्यासाठी बळ मिळत आहे. दैनंदिन नविन रुग्णांच्या संख्येइतकेच बरे होणाऱ्यांची संख्या असल्यानं नागरिकांच्या मनावरील ताण काहीसा कमी होताना दिसून येत आहे. गेल्या सहा दिवसातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या पाहिल्यास त्याची प्रचिती येते, असंही त्यांनी नमूद केलं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईRajesh Topeराजेश टोपेMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका