शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

Coronavirus Updates: ७१ हजारांहून अधिक नागरिक कोरोनामुक्त; महाराष्ट्राला आधार देणारा आकडा, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 21:14 IST

Coronavirus In Maharashtra : गेल्या काही दिवसांच्या तुलनेत रुग्णवाढीत झाली मोठी घट. महाराष्ट्रातून दिलासा देणारी बातमी आली समोर

ठळक मुद्देमहाराष्ट्रातून दिलासा देणारी बातमी आली समोरगेल्या काही दिवसांच्या तुलनेत रुग्णवाढीत झाली मोठी घट.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात आणि देशात कोरोनाबाधितांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. परंतु आता राज्यातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या चोवीस तासांत कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये ७१,७३६ जणांनी कोरोनावर मात केली. तर ४८,७०० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर दुसरीकडे चोवीस तासांत ५२४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या चोवीस तासांत राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनामुक्त नागरिकांची नोंद झाली आहे. मुंबईतही मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ४३,४३,७२७ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत एकूण ३६,०१७९६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या ६,७४७७० जणांवर उपचार सुरू आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर आता ८२.९२ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईतही कोरोनामुक्त अधिकमुंबईत गेल्या चोवीस तासांमध्ये तब्बल ९,१५० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनाबाधितांच्या संख्येतही घट झाली असून गेल्या चोवीस तासांत ३,८७६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. मुंबईत सध्या ७०,३७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर मुंबईतील रुग्णवाढीचा दर ६२ दिवसांवर पोहोचला असून रुग्ण बरे होण्याचा दर ८७ टक्क्यांवर पोहोचला आहे. 

सहा दिवसांत ४ लाख ४२ हजार रुग्ण कोरोनामुक्त  कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा दिवसात राज्यभरात ४ लाख ४२ हजार ४६६ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. गेल्या चोवीस तासांत ७१ हजार ७३६ रुग्णांना घरी सोडण्यात आलं. त्यात सर्वाधिक १३ हजार ६७४ रुग्ण पुणे येथील आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात गेल्या दोन महिन्यापासून दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होत आहे. दररोज किमान ६० हजारांच्या आसपास नविन रुग्णांची नोंद होत आहे. आठवडाभरापूर्वी १८ एप्रिलला आतापर्यंतची सर्वाधिक ६८ हजार ६३१ इतके रुग्ण एकाच दिवशी आढळून आले होते. आठवडाभरानंतर मात्र रुग्णसंख्येत जास्तीची वाढ झालेली आढळून आली नाही. मात्र दैनंदिन रुग्णसंख्या स्थिर आहे. त्याप्रमाणात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे, ही दिलासा देणारी बाब ठरली आहे. आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्स यांच्या प्रयत्नांमुळे रुग्णांना कोरोनामुक्त होण्यासाठी बळ मिळत आहे. दैनंदिन नविन रुग्णांच्या संख्येइतकेच बरे होणाऱ्यांची संख्या असल्यानं नागरिकांच्या मनावरील ताण काहीसा कमी होताना दिसून येत आहे. गेल्या सहा दिवसातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या पाहिल्यास त्याची प्रचिती येते, असंही त्यांनी नमूद केलं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईRajesh Topeराजेश टोपेMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका