शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा आलेख चढाच! राज्यात १५ हजार नवीन रुग्ण; ४८ जणांचा मृत्यू, काही ठिकाणी नाइट कर्फ्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 22:41 IST

coronavirus updates maharashtra : राज्यात दिवसभरात १५ हजार ५१ नव्या रुग्णांची भर पडली असून, ४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

ठळक मुद्देराज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढराज्याचा कोरोना रिकव्हरी रेट ९२.०७ टक्केउस्मानाबाद आणि लातूरमध्ये नाइट कर्फ्यू

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना (coronavirus updates) रुग्णांच्या संख्येत सलग वाढ होताना पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले आहेत. राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि सिनेमागृहांमध्ये केवळ क्षमतेच्या ५० टक्केच लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. तर राज्यात कोणत्याही राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्यात आज दिवसभरात १५ हजार ५१ नव्या रुग्णांची भर पडली असून, ४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. (coronavirus updates maharashtra reports 15051 new corona cases and 48 deaths in the last 24 hours)

आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात आज (सोमवार) दिवसभरात १० हजार ६७१ रुग्ण कोरोनातून बरे झाले. तर, राज्यात १५ हजार ५१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे आज ४८ जणांचा मृत्यू झाला असून, राज्यात एकूण ५२ हजार ९०९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 

राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट ९२.०७ टक्के एवढा झाला असून, एकूण २१ लाख ४४ हजार ७४३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आताच्या घडीला राज्यात एकूण १,३०,५४७ ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १,७६,०९,२४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,२९,४६४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ६,२३,१२१ व्यक्ती गृहविलगीकरणामध्ये आहेत, तर ६ हजार ११४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

Maharashtra Lockdown: 'या' जिल्ह्यात १७ मार्च ते ४ एप्रिल हॉटेल्समधील डायनिंग बंद; 'पार्सल' सुरू राहणार

उस्मानाबाद आणि लातूरमध्ये नाइट कर्फ्यू

राज्यातील उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात नाइट कर्फ्यू लावण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. स्थानिक प्रशासनाने मास्क लावल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे तसेच कोरोनाचे सर्व नियम, निर्बंध पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नाइट कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांनी सांगितले. दररोज नाइट कर्फ्यू आणि रविवारी जनता कर्फ्यूची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, राज्यात विवाह सोहळ्यांना गर्दी होत असल्याचं निदर्शनास आल्यानं पुन्हा एकदा उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. राज्यात आता विवाह सोहळ्यास फक्त ५० जणांना उपस्थित राहता येणार आहे. तर अंत्यसंस्कारासाठी केवळ २० जणांना उपस्थित राहता येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता राज्यातील इतर सर्व कंपन्यांमध्ये क्षमतेच्या ५० टक्केच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची परवानगी असणार आहे. याशिवाय राज्यातील धार्मिक स्थळांवर भाविकांची मर्यादा व्यवस्थापनाला पाळावी लागणार आहे. यासाठी दर तासाभरात मर्यादित भाविकांना परवानगी देण्याची व्यवस्था धार्मिक स्थळांनी करावी आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन होईल याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOsmanabadउस्मानाबादlaturलातूर