शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कोरोनाचा आलेख चढाच! राज्यात १५ हजार नवीन रुग्ण; ४८ जणांचा मृत्यू, काही ठिकाणी नाइट कर्फ्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 22:41 IST

coronavirus updates maharashtra : राज्यात दिवसभरात १५ हजार ५१ नव्या रुग्णांची भर पडली असून, ४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

ठळक मुद्देराज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढराज्याचा कोरोना रिकव्हरी रेट ९२.०७ टक्केउस्मानाबाद आणि लातूरमध्ये नाइट कर्फ्यू

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना (coronavirus updates) रुग्णांच्या संख्येत सलग वाढ होताना पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले आहेत. राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि सिनेमागृहांमध्ये केवळ क्षमतेच्या ५० टक्केच लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. तर राज्यात कोणत्याही राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्यात आज दिवसभरात १५ हजार ५१ नव्या रुग्णांची भर पडली असून, ४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. (coronavirus updates maharashtra reports 15051 new corona cases and 48 deaths in the last 24 hours)

आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात आज (सोमवार) दिवसभरात १० हजार ६७१ रुग्ण कोरोनातून बरे झाले. तर, राज्यात १५ हजार ५१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे आज ४८ जणांचा मृत्यू झाला असून, राज्यात एकूण ५२ हजार ९०९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 

राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट ९२.०७ टक्के एवढा झाला असून, एकूण २१ लाख ४४ हजार ७४३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आताच्या घडीला राज्यात एकूण १,३०,५४७ ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १,७६,०९,२४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,२९,४६४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ६,२३,१२१ व्यक्ती गृहविलगीकरणामध्ये आहेत, तर ६ हजार ११४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

Maharashtra Lockdown: 'या' जिल्ह्यात १७ मार्च ते ४ एप्रिल हॉटेल्समधील डायनिंग बंद; 'पार्सल' सुरू राहणार

उस्मानाबाद आणि लातूरमध्ये नाइट कर्फ्यू

राज्यातील उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात नाइट कर्फ्यू लावण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. स्थानिक प्रशासनाने मास्क लावल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे तसेच कोरोनाचे सर्व नियम, निर्बंध पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नाइट कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांनी सांगितले. दररोज नाइट कर्फ्यू आणि रविवारी जनता कर्फ्यूची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, राज्यात विवाह सोहळ्यांना गर्दी होत असल्याचं निदर्शनास आल्यानं पुन्हा एकदा उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. राज्यात आता विवाह सोहळ्यास फक्त ५० जणांना उपस्थित राहता येणार आहे. तर अंत्यसंस्कारासाठी केवळ २० जणांना उपस्थित राहता येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता राज्यातील इतर सर्व कंपन्यांमध्ये क्षमतेच्या ५० टक्केच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची परवानगी असणार आहे. याशिवाय राज्यातील धार्मिक स्थळांवर भाविकांची मर्यादा व्यवस्थापनाला पाळावी लागणार आहे. यासाठी दर तासाभरात मर्यादित भाविकांना परवानगी देण्याची व्यवस्था धार्मिक स्थळांनी करावी आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन होईल याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOsmanabadउस्मानाबादlaturलातूर