शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

कोरोनाचा आलेख चढाच! राज्यात १५ हजार नवीन रुग्ण; ४८ जणांचा मृत्यू, काही ठिकाणी नाइट कर्फ्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 22:41 IST

coronavirus updates maharashtra : राज्यात दिवसभरात १५ हजार ५१ नव्या रुग्णांची भर पडली असून, ४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

ठळक मुद्देराज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढराज्याचा कोरोना रिकव्हरी रेट ९२.०७ टक्केउस्मानाबाद आणि लातूरमध्ये नाइट कर्फ्यू

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना (coronavirus updates) रुग्णांच्या संख्येत सलग वाढ होताना पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले आहेत. राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि सिनेमागृहांमध्ये केवळ क्षमतेच्या ५० टक्केच लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. तर राज्यात कोणत्याही राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्यात आज दिवसभरात १५ हजार ५१ नव्या रुग्णांची भर पडली असून, ४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. (coronavirus updates maharashtra reports 15051 new corona cases and 48 deaths in the last 24 hours)

आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात आज (सोमवार) दिवसभरात १० हजार ६७१ रुग्ण कोरोनातून बरे झाले. तर, राज्यात १५ हजार ५१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे आज ४८ जणांचा मृत्यू झाला असून, राज्यात एकूण ५२ हजार ९०९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 

राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट ९२.०७ टक्के एवढा झाला असून, एकूण २१ लाख ४४ हजार ७४३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आताच्या घडीला राज्यात एकूण १,३०,५४७ ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १,७६,०९,२४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,२९,४६४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ६,२३,१२१ व्यक्ती गृहविलगीकरणामध्ये आहेत, तर ६ हजार ११४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

Maharashtra Lockdown: 'या' जिल्ह्यात १७ मार्च ते ४ एप्रिल हॉटेल्समधील डायनिंग बंद; 'पार्सल' सुरू राहणार

उस्मानाबाद आणि लातूरमध्ये नाइट कर्फ्यू

राज्यातील उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात नाइट कर्फ्यू लावण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. स्थानिक प्रशासनाने मास्क लावल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे तसेच कोरोनाचे सर्व नियम, निर्बंध पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नाइट कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांनी सांगितले. दररोज नाइट कर्फ्यू आणि रविवारी जनता कर्फ्यूची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, राज्यात विवाह सोहळ्यांना गर्दी होत असल्याचं निदर्शनास आल्यानं पुन्हा एकदा उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. राज्यात आता विवाह सोहळ्यास फक्त ५० जणांना उपस्थित राहता येणार आहे. तर अंत्यसंस्कारासाठी केवळ २० जणांना उपस्थित राहता येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता राज्यातील इतर सर्व कंपन्यांमध्ये क्षमतेच्या ५० टक्केच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची परवानगी असणार आहे. याशिवाय राज्यातील धार्मिक स्थळांवर भाविकांची मर्यादा व्यवस्थापनाला पाळावी लागणार आहे. यासाठी दर तासाभरात मर्यादित भाविकांना परवानगी देण्याची व्यवस्था धार्मिक स्थळांनी करावी आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन होईल याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOsmanabadउस्मानाबादlaturलातूर