शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

Coronavirus Update : महाराष्ट्रात १०,८९१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; १६ हजारांपेक्षा अधिक रुग्ण करोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 20:47 IST

Coronavirus Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होतोय कमी. रुग्ण बरे होण्याचा दरही वाढला.

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होतोय कमी. रुग्ण बरे होण्याचा दरही वाढला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला होता. त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रालाही बसला होता. परंतु आता परिस्थिती नियंत्रणात येताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात १६,५७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये १०,८९१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर १६,५७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या चोवीस तासांत २९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दरही आता ९५.३५ टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात सध्या १,६७,९२७ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

मुंबईत ६७३ नव्या रुग्णांची नोंदमुंबईतही आता कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत मुंबईत ६७३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर ७५१ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर आता ९५ टक्क्यांवर आला आहे. मुंबईत सध्या १५,७०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी आता ५४३ दिवसांवर आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका