शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Coronavirus : संसर्गाच्या भीतीने हरिनाम सप्ताहांची परंपरा खंडित, कीर्तन-प्रवचनकार घरीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 06:04 IST

Coronavirus : यंदा मात्र कोरोनाच्या जीवघेण्या साथरोगामुळे ३१ मार्चपर्यंत जमावबंदी आहे आणि आता तर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. गर्दी टाळण्यासाठी कीर्तनकारांनींही कुठेही कीर्तन न करण्याचा निर्णय घेतला आहे.

- प्रकाश महालेराजूर (जि. अहमदनगर) : वारकरी संप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेत राज्यातील गावागावांमध्ये सुरू असलेली हरिनाम सप्ताहांची अनेक वर्षांची परंपरा यंदा कोरोनाच्या संकटामुळे खंडित झाली आहे. कीर्तन-प्रवचनकार घरीच असून त्यांनी स्वत:ला शेती व घरकामात गुंतवून घेतले आहे. अनेक कीर्तनकार-प्रवचनकार सोशल मीडियाद्वारे आपली कीर्तन-प्रवचन सेवा देत आहेत. अनेकांची प्रवचने फेसबुकवरही लाइव्ह सुरू आहेत.फाल्गुन तसेच चैत्र महिन्यांमध्ये हरिनाम सप्ताह, जत्रा-यात्रा, मेळावे, उत्सव मोठ्या प्रमाणात असतात. या काळात गावोगावी हरिनाम सप्ताहांची संख्याही मोठी असते. कीर्तनकार-प्रवचनकारही व्यग्र राहतात.यंदा मात्र कोरोनाच्या जीवघेण्या साथरोगामुळे ३१ मार्चपर्यंत जमावबंदी आहे आणि आता तर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. गर्दी टाळण्यासाठी कीर्तनकारांनींही कुठेही कीर्तन न करण्याचा निर्णय घेतला आहे.अकोले तालुक्यात निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्यासह शंभर कीर्तनकार आहेत. वेगवेगळ््या तारखांना असलेल्या हरिनाम सप्ताहात काकड आरती, गाथा पारायण व भजन, प्रवचन, कीर्तन, गाव पंक्ती असे दिनक्रम असतात. अख्खे गावच या काळात भक्तिरसात न्हाऊन निघते. तालुक्यातील कीर्तनकार बाहेर जातात आणि दूरवरचे कीर्तनकार सेवेसाठी गावी येतात. काही कीर्तनकार सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या धोक्याबाबत स्थानिकांचे प्रबोधन करीत आहेत. हरिनाम सप्ताहांची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी काही गावांमध्ये सप्ताह कालावधीत केवळ एकच विणेकरी मंदिरात उभा राहून अखंडनाम घेणार आहे. इतर कार्यक्रम रद्द केले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रत्येक आदेशाचे आपण पालन करीत असल्याचे सर्वच कीर्तनकार सांगत आहेत.इंदोरीकरांचे आवाहनइंदोरीकर महाराज यांनीही राज्याच्या विविध भागातील नियोजित सर्व कीर्तन ३१ मार्चपर्यंत रद्द केले आहेत. असाच निर्णय राज्यातील इतर कीर्तनकारांनीही घेतला आहे. कोरोनाचे संकट हद्दपार होईपर्यंत घरीच आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी माझे कीर्तनही काही दिवस बंद ठेवले आहे. नागरिकांनीही कामाशिवाय बाहेर पडू नये. घरीच बसून कोरोनाविरोधात लढा द्यावा, असे आवाहन इंदोरीकर यांनी केले आहे.आम्ही सरकारसोबत : सरकारच्या सोबत आम्ही सर्व वारकरी आहोत. सर्व नागरिकांनी आपले आरोग्य सांभाळावे. कोरोनाचे संकट लवकर दूर कर असे साकडे आम्ही पांडुरंगाकडे घालत आहोत. सध्या आम्ही बहुतांश कीर्तनकारांनी स्वत:ला शेतात आणि कुटुंबात अडकून घेतले आहे.- विश्वनाथ शेटे, वारकरी संघटनेचे अध्यक्ष

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्र