शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

Coronavirus: महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढण्याचा टास्क फोर्सचा अंदाज, आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केलं नियम पाळण्याचं आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 18:27 IST

Coronavirus in Maharashtra : महाराष्ट्रामध्ये फेब्रुवारी महिन्यात Omicron Variantचे रुग्ण वाढतील, अशी शक्यता टास्क फोर्सने वर्तवल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री Rajesh Tope यांनी दिली आहे. 

मुंबई - गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्यानंतर सध्या देशातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र आता देशातील विविध भागात परसलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गामुळे कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये फेब्रुवारी महिन्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढतील, अशी शक्यता टास्क फोर्सने वर्तवल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 

टास्क फोर्सने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये फेब्रुवारी महिन्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. दरम्यान, ओमायक्रॉनचा संसर्ग वाढल्याने त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोरोनाबाबतचे नियम पाळणं गरजेचं आहे, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे. यासंदर्भातील वृत्त टीव्ही ९ मराठीने दिलं आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये कोरोनाची तिसरी लाट आलीच तर ती ओमायक्रॉन व्हेरिएंटचीच असेल. पण त्याबाबत फार घाबरण्याची गरज नाही कारण ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये हॉस्पिटलाईज होण्याचे प्रमाण फार कमी आहे. पण असं असलं तरी नाताळ आणि नववर्ष साजरं करताना काळजी घ्यावी, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं होतं. 

देशात ओमायक्रॉनचा धोका वाढत असून, आतापर्यंत देशातील १२ राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे २०० हून अधिक रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण सर्वाधिक आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत ७७ रुग्ण बरे झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOmicron Variantओमायक्रॉन