शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
6
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
7
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
8
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
9
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
10
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
11
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
12
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
13
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
14
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
15
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
16
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
17
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
18
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
19
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
20
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा

CoronaVirus: अजित पवारांच्या 'त्या' निर्णयानं सरकारी कर्मचाऱ्यांना सुखद धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 06:57 IST

१७ लाख राज्य सरकारी कर्मचारी आणि ६ लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार/निवृत्तीवेतन एकमुस्त देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला.

- यदु जोशीमुंबई : मंदी आणि लॉकडाउन यापायी ४० हजार कोटी रुपयांचा महसुली फटका राज्य शासनाला बसलेला असताना आणि नजीकच्या काळात आर्थिक घडी विस्कटलेली राहणार अशी स्थिती असताना १७ लाख राज्य सरकारी कर्मचारी आणि ६ लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार/निवृत्तीवेतन एकमुस्त देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. राज्याची आर्थिक पत आणि कर्मचारी हिताचा मेळ त्यांनी साधला.राज्य शासन मार्चप्रमाणे एप्रिल, मेचा पगारदेखील दोन टप्प्यात देईल असे अधिकारी-कर्मचारी संघटनांना वाटत होते. अधिकारी महासंघाचे नेते ग. दि. कुलथे यांनी तसे सूतोवाचही केले होते. या पार्श्वभूमीवर एप्रिलचा पूर्ण पगार एकाचवेळी देण्याचा निर्णय घेऊन अजित पवार यांनी कर्मचारी अधिकाऱ्यांना सुखद धक्का दिला.एप्रिलचा पगार पूर्ण पगार देताना शासनाची आर्थिक कसरत नक्कीच होणार आहे कारण त्यासाठी १२ हजार कोटी रुपये लागतील. तरीही शासनाने हा निर्णय का घेतला याची वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत. शासनाकडे एक महिनाच नव्हे तर दुसºया महिन्यातही पूर्ण पगार द्यायला पैसा नाही, असे चित्र त्यातून निर्माण झाले असते. अशावेळी वित्तीय संस्थांनी राज्याला कर्ज देण्याबाबत मागेपुढे पाहिले असते. वित्तीय संस्थांच्या दृष्टीने राज्याचे रेटिंग कमी झाले असते.त्यातून राज्याला कर्ज मिळण्याबाबत अडचणी निर्माण झाल्या असत्या वा व्याजदर जादा मोजावा लागला असता. या अडचणी उद्भवू नयेत म्हणून एकमुस्त पगाराचा निर्णय झाला.राज्यासमोर बिकट आर्थिक संकट असले तरी त्याची झळ कर्मचाºयांच्या पगारास लागोपाठ दुसºया महिन्यातदेखील बसणे योग्य वाटले नाही. राज्याकडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी पैसे नाहीत असा संदेश जाणेदेखील चुकीचे आहे. म्हणूनही एकमुस्त पगार देण्याचा निर्णय घेतला.- अजित पवार, उपमुख्यमंत्री

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMantralayaमंत्रालयAjit Pawarअजित पवार