शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना-राष्ट्रवादी ‘आमनेसामने’; सत्तेतील दोन पक्षांच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे जनता त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 01:46 IST

ठाणे जिल्ह्यात सेनेचा सर्व बंद करण्याकडे कल । राष्ट्रवादी काँग्रेसचे अनलॉकचे आदेश

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील बहुतांश महापालिकांमध्ये शिवसेनेची सत्ता असल्याने कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्याकरिता वेगवेगळ्या भागांत बंद करण्याकडे सेनेचा कल आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडील खात्यांनी घरकाम कामगारांना घरी येऊ देण्याचे, वृत्तपत्र वितरणास विरोध करणाऱ्या सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत. एकाच महाविकास आघाडी सरकारमधील दोन पक्षांची ही परस्परविरोधी भूमिका नागरिक, व्यापारी, उद्योजक यांना खटकत आहे.

ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ वगैरे परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांनी कंटेनमेंट झोनमध्ये निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. या भागातील अलीकडेच सुरू झालेली दुकाने बंद केली आहेत. शिवाय, ज्या इमारतींमध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत, त्या इमारतीमधील रहिवाशांना घराबाहेर पडण्यास बंदी केली आहे.

कंटेनमेंट झोनमध्ये रस्त्यावर फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. कोरोनाला अटकाव करण्यात अपयश आले, रुग्ण प्रचंड वाढले व मोठ्या संख्येने मृत्यू झाले तर त्याचा परिणाम येणाऱ्या महापालिका निवडणुकांत भोगायला लागेल, याची भीती वाटत असल्याने शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांची बैठक घेऊन व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेतला.

त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे अनलॉककरिता आग्रही आहेत. गेले तीन महिने बंद असलेली सलून उद्या रविवारपासून सुरू करण्याचा निर्णय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावापोटी सरकारने घेतला. मात्र, ठाणे जिल्ह्यात उद्यापासून सलून सुरू होणार किंवा कसे, याबाबत साशंकता आहे. राष्ट्रवादीकडील सहकार खात्याने शुक्रवारीच आदेश काढून घरकाम कामगारांना कामावर येण्यापासून रोखल्यास कारवाई करण्याचा इशारा देणारे आदेश जारी केले. ठाणे जिल्ह्यातील ज्या सोसायट्या वृत्तपत्र वितरकांना प्रवेश देत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशही राष्ट्रवादीच्या पुढाकाराने दोन दिवसांपूर्वी निघाले आहेत. त्यामुळे आता यापैकी कायकाय ठाणे जिल्ह्यातील महापालिकांच्या हद्दीत सुरू होणार, असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.ठाण्यात आरोग्य व्यवस्था बरीच कमकुवतमुंबईच्या तुलनेत ठाणे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बरीच कमकुवत असल्याने कोरोनाचे गांभीर्य कमालीचे वाढले आहे. वर्षानुवर्षे ठाणे जिल्ह्यात सत्ता करूनही शिवसेनेने आरोग्य व्यवस्था भक्कम करण्याकरिता काडीमात्र प्रयत्न केले नसल्याचे परिणाम आता नागरिकांना भोगावे लागत आहेत. मात्र, सत्ताधाºयांना त्याच्या राजकीय परिणामांची भीती सतावत असल्याचे राष्ट्रवादीचे नेते खासगीत बोलू लागले आहेत.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcorona virusकोरोना वायरस बातम्याNCPराष्ट्रवादी काँग्रेस