शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

शिवसेना-राष्ट्रवादी ‘आमनेसामने’; सत्तेतील दोन पक्षांच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे जनता त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 01:46 IST

ठाणे जिल्ह्यात सेनेचा सर्व बंद करण्याकडे कल । राष्ट्रवादी काँग्रेसचे अनलॉकचे आदेश

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील बहुतांश महापालिकांमध्ये शिवसेनेची सत्ता असल्याने कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्याकरिता वेगवेगळ्या भागांत बंद करण्याकडे सेनेचा कल आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडील खात्यांनी घरकाम कामगारांना घरी येऊ देण्याचे, वृत्तपत्र वितरणास विरोध करणाऱ्या सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत. एकाच महाविकास आघाडी सरकारमधील दोन पक्षांची ही परस्परविरोधी भूमिका नागरिक, व्यापारी, उद्योजक यांना खटकत आहे.

ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ वगैरे परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांनी कंटेनमेंट झोनमध्ये निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. या भागातील अलीकडेच सुरू झालेली दुकाने बंद केली आहेत. शिवाय, ज्या इमारतींमध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत, त्या इमारतीमधील रहिवाशांना घराबाहेर पडण्यास बंदी केली आहे.

कंटेनमेंट झोनमध्ये रस्त्यावर फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. कोरोनाला अटकाव करण्यात अपयश आले, रुग्ण प्रचंड वाढले व मोठ्या संख्येने मृत्यू झाले तर त्याचा परिणाम येणाऱ्या महापालिका निवडणुकांत भोगायला लागेल, याची भीती वाटत असल्याने शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांची बैठक घेऊन व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेतला.

त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे अनलॉककरिता आग्रही आहेत. गेले तीन महिने बंद असलेली सलून उद्या रविवारपासून सुरू करण्याचा निर्णय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावापोटी सरकारने घेतला. मात्र, ठाणे जिल्ह्यात उद्यापासून सलून सुरू होणार किंवा कसे, याबाबत साशंकता आहे. राष्ट्रवादीकडील सहकार खात्याने शुक्रवारीच आदेश काढून घरकाम कामगारांना कामावर येण्यापासून रोखल्यास कारवाई करण्याचा इशारा देणारे आदेश जारी केले. ठाणे जिल्ह्यातील ज्या सोसायट्या वृत्तपत्र वितरकांना प्रवेश देत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशही राष्ट्रवादीच्या पुढाकाराने दोन दिवसांपूर्वी निघाले आहेत. त्यामुळे आता यापैकी कायकाय ठाणे जिल्ह्यातील महापालिकांच्या हद्दीत सुरू होणार, असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.ठाण्यात आरोग्य व्यवस्था बरीच कमकुवतमुंबईच्या तुलनेत ठाणे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बरीच कमकुवत असल्याने कोरोनाचे गांभीर्य कमालीचे वाढले आहे. वर्षानुवर्षे ठाणे जिल्ह्यात सत्ता करूनही शिवसेनेने आरोग्य व्यवस्था भक्कम करण्याकरिता काडीमात्र प्रयत्न केले नसल्याचे परिणाम आता नागरिकांना भोगावे लागत आहेत. मात्र, सत्ताधाºयांना त्याच्या राजकीय परिणामांची भीती सतावत असल्याचे राष्ट्रवादीचे नेते खासगीत बोलू लागले आहेत.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcorona virusकोरोना वायरस बातम्याNCPराष्ट्रवादी काँग्रेस