शहरं
Join us  
Trending Stories
1
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
3
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
4
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
5
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
6
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
7
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
8
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
9
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
10
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
11
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

CoronaVirus News: "फडणवीस, एका ट्रेनसाठी ५० लाखांचा खर्च कसा आणि कुठून येतो?; जरा आम्हालाही सांगा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 18:49 IST

फडणवीस यांच्या आकडेवारीला आणि आरोपांना महाविकास आघाडीकडून जोरदार प्रत्युत्तर

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेऊन केलेल्या दाव्यांना आज महाविकास आघाडी सरकारनं प्रत्युत्तर दिलं. केंद्राकडून राज्याला भरीव मदत मिळाली. मात्र तरीही राज्य सरकार अपयशी ठरलं, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यांनी दिलेल्या आकडेवारीचा राज्य सरकारच्या मंत्र्यांनी समाचार घेतला. शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस यांना जोरदार प्रतुत्तर दिलं.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल आभासी पत्रकार परिषद घेतली. आम्ही प्रत्यक्ष उत्तर देतोय. आम्ही आभास निर्माण करत नाही. प्रत्यक्ष उत्तर देतो. केंद्र सरकार महाराष्ट्राला मदत करतंय. तरी राज्य सरकार अपयशी ठरतंय, असा फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेचा मतितार्थ होता. मात्र ते आकडेवारीतून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा शब्दांत शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी जोरदार पलटवार केला.'केंद्राकडून राज्याला गहू, तांदूळ आणि डाळ मिळाल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. केंद्रानं संपूर्ण देशाला अन्नधान्य दिलं. एकट्या राज्याला नाही. त्यातही १७५० कोटी रुपयांचा गहू राज्याला मिळालेला नाही. १२२ कोटींचं अन्नधान्य स्थलांतरित मजुरांना दिल्याचं फडणवीस सांगतात. त्याचे आदेश चार दिवसांपूर्वी निघाले आहेत आणि बहुतांश मजूर त्यांच्या गावी परतले आहेत. पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून १७२६ कोटींचा निधी दिल्याचं फडणवीस म्हणाले. पण ही योजना आजची नाही. आधीपासूनची आहे. कोरोना काळात केंद्रानं कोणतीही वेगळी मदत राज्याला केलेली नाही. यापेक्षा वेगळी मदत फडणवीस यांनी केंद्राकडून आणली असती, तर आम्ही त्यांचं अभिनंदनच केलं असतं, असा टोला परब यांनी लगावला.देवेंद्र फडणवीस केवळ फुगवून आकडे सांगतात, असा दावा करत अनिल परब यांनी विधवा, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना केंद्राकडून देण्यात आलेल्या ११६ कोटी रुपयांचा संदर्भ दिला. विधवा, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या मदतीचा केवळ २० टक्केच हिस्सा केंद्र देतं. बाकीचा ८० टक्के हिस्सा राज्य सरकार देतं. केंद्र ११६ कोटी देत असताना राज्यानं १ हजार २१० कोटी दिले, हे फडणवीस यांनी सांगायला हवं होतं, असं परब म्हणाले.सध्या केंद्र आणि राज्य सरकारमध्ये मजुरांसाठी सोडल्या जाणाऱ्या श्रमिक विशेष गाड्यांवरून वाद सुरू आहे. त्यावरूनही परब यांनी फडणवीस यांना लक्ष्य केलं. महाराष्ट्रातून ६०० गाड्या सुटल्या. प्रत्येक गाडीवर ५० लाख खर्च केले, असं फडणवीस सांगतात. एका ट्रेनला ५० लाखांचा खर्च कसा आणि कुठून येतो, याचं उत्तर फडणवीस यांनी द्यावं, असं परब यांनी म्हटलं.राज्य सरकारनं ८० ट्रेन मागितल्या. पण रेल्वे मंत्रालयानं त्या दिल्या नाहीत, याचा पियूष गोयल यांना इतका राग आला की त्यांनी १५२ गाड्या एकाच दिवसात दिल्या. बंगालसाठी आम्हाला महिन्याभरात ४८ गाड्या सोडायच्या आहेत. दिवसाला दोन गाड्याच पाठवा, अशी विनंती बंगाल सरकारनं वादळाच्या पार्श्वभूमीवर केली आहे. मात्र तरीही एकाच दिवशी ४३ गाड्या पाठवून गर्दी निर्माण केली आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप परब यांनी केला.फडणवीस, तुम्हाला मोदींवर भरवसा नाय का? जयंत पाटलांचा माजी मुख्यमंत्र्यांना चिमटाविरोधकांकडून सरकारला बदनाम करायचं काम; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल"काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्येही राहुल गांधींचं ऐकत नाही"

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAnil Parabअनिल परबBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातJayant Patilजयंत पाटील