शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
4
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
5
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
6
"पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
7
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
8
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
9
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
10
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
11
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
12
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
13
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
14
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
15
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
16
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
17
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
18
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
19
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
20
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जीवाची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: "फडणवीस, एका ट्रेनसाठी ५० लाखांचा खर्च कसा आणि कुठून येतो?; जरा आम्हालाही सांगा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 18:49 IST

फडणवीस यांच्या आकडेवारीला आणि आरोपांना महाविकास आघाडीकडून जोरदार प्रत्युत्तर

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेऊन केलेल्या दाव्यांना आज महाविकास आघाडी सरकारनं प्रत्युत्तर दिलं. केंद्राकडून राज्याला भरीव मदत मिळाली. मात्र तरीही राज्य सरकार अपयशी ठरलं, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यांनी दिलेल्या आकडेवारीचा राज्य सरकारच्या मंत्र्यांनी समाचार घेतला. शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस यांना जोरदार प्रतुत्तर दिलं.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल आभासी पत्रकार परिषद घेतली. आम्ही प्रत्यक्ष उत्तर देतोय. आम्ही आभास निर्माण करत नाही. प्रत्यक्ष उत्तर देतो. केंद्र सरकार महाराष्ट्राला मदत करतंय. तरी राज्य सरकार अपयशी ठरतंय, असा फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेचा मतितार्थ होता. मात्र ते आकडेवारीतून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा शब्दांत शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी जोरदार पलटवार केला.'केंद्राकडून राज्याला गहू, तांदूळ आणि डाळ मिळाल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. केंद्रानं संपूर्ण देशाला अन्नधान्य दिलं. एकट्या राज्याला नाही. त्यातही १७५० कोटी रुपयांचा गहू राज्याला मिळालेला नाही. १२२ कोटींचं अन्नधान्य स्थलांतरित मजुरांना दिल्याचं फडणवीस सांगतात. त्याचे आदेश चार दिवसांपूर्वी निघाले आहेत आणि बहुतांश मजूर त्यांच्या गावी परतले आहेत. पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून १७२६ कोटींचा निधी दिल्याचं फडणवीस म्हणाले. पण ही योजना आजची नाही. आधीपासूनची आहे. कोरोना काळात केंद्रानं कोणतीही वेगळी मदत राज्याला केलेली नाही. यापेक्षा वेगळी मदत फडणवीस यांनी केंद्राकडून आणली असती, तर आम्ही त्यांचं अभिनंदनच केलं असतं, असा टोला परब यांनी लगावला.देवेंद्र फडणवीस केवळ फुगवून आकडे सांगतात, असा दावा करत अनिल परब यांनी विधवा, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना केंद्राकडून देण्यात आलेल्या ११६ कोटी रुपयांचा संदर्भ दिला. विधवा, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या मदतीचा केवळ २० टक्केच हिस्सा केंद्र देतं. बाकीचा ८० टक्के हिस्सा राज्य सरकार देतं. केंद्र ११६ कोटी देत असताना राज्यानं १ हजार २१० कोटी दिले, हे फडणवीस यांनी सांगायला हवं होतं, असं परब म्हणाले.सध्या केंद्र आणि राज्य सरकारमध्ये मजुरांसाठी सोडल्या जाणाऱ्या श्रमिक विशेष गाड्यांवरून वाद सुरू आहे. त्यावरूनही परब यांनी फडणवीस यांना लक्ष्य केलं. महाराष्ट्रातून ६०० गाड्या सुटल्या. प्रत्येक गाडीवर ५० लाख खर्च केले, असं फडणवीस सांगतात. एका ट्रेनला ५० लाखांचा खर्च कसा आणि कुठून येतो, याचं उत्तर फडणवीस यांनी द्यावं, असं परब यांनी म्हटलं.राज्य सरकारनं ८० ट्रेन मागितल्या. पण रेल्वे मंत्रालयानं त्या दिल्या नाहीत, याचा पियूष गोयल यांना इतका राग आला की त्यांनी १५२ गाड्या एकाच दिवसात दिल्या. बंगालसाठी आम्हाला महिन्याभरात ४८ गाड्या सोडायच्या आहेत. दिवसाला दोन गाड्याच पाठवा, अशी विनंती बंगाल सरकारनं वादळाच्या पार्श्वभूमीवर केली आहे. मात्र तरीही एकाच दिवशी ४३ गाड्या पाठवून गर्दी निर्माण केली आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप परब यांनी केला.फडणवीस, तुम्हाला मोदींवर भरवसा नाय का? जयंत पाटलांचा माजी मुख्यमंत्र्यांना चिमटाविरोधकांकडून सरकारला बदनाम करायचं काम; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल"काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्येही राहुल गांधींचं ऐकत नाही"

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAnil Parabअनिल परबBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातJayant Patilजयंत पाटील