शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
3
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
4
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
5
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
6
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
7
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
8
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
9
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
10
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
11
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
12
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
13
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
14
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
15
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
16
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
17
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
18
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
19
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
20
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे

coronavirus: निमलष्करी दल पाठवा; राज्याची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 6:42 AM

निमलष्करी दलामध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांतर्गतचे केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), केंद्रीय औद्योगिक पोलीस दल (सीआयएसएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स आणि दिल्ली पोलीस यांचा समावेश असतो.

मुंबई : राज्यात कोरोनामुळे पोलीस दलावर आलेला कामाचा भार पाहता कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने निमलष्करी दलाच्या २० तुकड्या पाठविण्याची मागणी राज्य शासनाने केंद्रीय गृहमंत्रालयाकडे केली आहे.निमलष्करी दलामध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांतर्गतचे केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), केंद्रीय औद्योगिक पोलीस दल (सीआयएसएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स आणि दिल्ली पोलीस यांचा समावेश असतो.राज्याने मागणी केल्यानंतर या पाचपैकी कोणत्याही एका दलाचे जवान पाठवायचे की, वेगवेगळ्या दलांचे जवान पाठवायचे, याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालय करीत असते. एका तुकडीमध्ये २०० जवान असतात.आपण २० तुकड्या मागितल्या आहेत, याचा अर्थ दोन हजार जवानांची मागणी आपण केलेली आहे. निमलष्करी दल हे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या, तर लष्कर हे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येते. आम्हाला लष्कराची गरज नाही.राज्यातील प्रत्येक नागरिकच सैनिक बनून कोरोनाचा मुकाबला करील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच म्हटले आहे.पोलिसांचे मनोबल अजिबात खचलेले नाही : देशमुखराज्यातील दोन लाखांवर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आज कोरोनाच्या संकटाचा प्राणपणाने मुकाबला करीत आहेत. त्यांचे मनोबल तसूभरही कमी झालेले नाही. ते अत्यंत सक्षम आहेत; पण त्यांना विश्रांतीची कुठे ना कुठे गरज आहे.पोलीस दलातील काही अधिकारी, कर्मचारी यांनादेखील कोरोनाची बाधा झालेली आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था परिस्थिती या पार्श्वभूमीवरकेंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची मागणी केली आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. ते म्हणाले की, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांचा उपयोग मुख्यत्वे कंटेनमेंट झोन तसेच कायदा व सुव्यवस्थेची स्थिती उत्पन्न झाल्यास त्या ठिकाणी केला जाईल.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार