शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 तारखेला देशाला एप्रिल फूल बनविणार; मेगा इव्हेंट करणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 23:04 IST

जर एकाच वेळी सगळ्यांनी विजेचे दिवे व पंखे बंद केले तर ग्रीड हाय फ्रिक्वेन्सीवर ट्रिप होऊन देशातील सर्व वीज निर्मिती केंद्रे बंद पडून अतिशय मोठे नुकसान होईल.

मुंबईः घरांमधील सर्व लाईट नऊ मिनिटे बंद करून त्याऐवजी मेणबत्ती किंवा दिवे, टॉर्च लावण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन म्हणजे शुद्ध बालिशपणा आहे. "साठी बुद्धी नाठी" झाल्याचे हे लक्षण आहे, अशी टीका ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे. 5 एप्रिलला रात्री नऊ वाजता कोणीही घरातील लाईट्स बंद करू नयेत, असे आवाहन डॉ. राऊत यांनी केले आहे.

जर एकाच वेळी सगळ्यांनी विजेचे दिवे व पंखे बंद केले, तर ग्रीड हाय फ्रिक्वेन्सीवर ट्रिप होऊन देशातील सर्व वीज निर्मिती केंद्रे बंद पडून अतिशय मोठे नुकसान होईल. वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी कित्येक तास लागतील. यामुळे रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असलेले रुग्ण तडफडून मरतील याची मोदिना चिंता नसून ते पुन्हा एखादा मोठी इव्हेंट करण्यासाठी देशाची सुरक्षा धोक्यात घालून आपले मोठेपण सिद्ध करण्याच्या मागे लागले आहेत.

सध्या लॉकडाऊनमुळे वीजेच्या मागणीत घट झाल्याने ग्रीडमध्ये हाय व्होल्टेज असल्याने जर मागणीत पुन्हा घट निर्माण झाली तर देशाचे ग्रीड फेल होण्याचा धोका निर्माण होईल. यामुळे कोरोना सोबत अजून वेगळे संकट या देशात निर्माण होईल अशी भीती डॉ राऊत यांनी व्यक्त केली आहे. डॉ. राऊत म्हणाले की पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीची ही बाळबोध गोष्ट ऐकून निराशा झाली आहे. आज देशामध्ये कोरोनाचे संकट गंभीर स्वरूप धारण करीत असताना ठोस उपायोजना करण्याचे सोडून पंतप्रधान टाळ्या वाजवा,थाळीनाद करा,लाईट बंद करा, दिवे लावा अशा घोषणा देत सुटले आहेत. यामागे जनतेची दिशाभूल करून कोरोनाच्या धोक्यापासून पळवाट काढण्याचा प्रयत्न करीत आहे, असा घणाघात डॉ राऊत यांनी केला आहे.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकार काय करत आहे? हे जाणून घेण्याचा भारतीय नागरिकांचा हक्क आहे. मात्र देशाला एप्रिल फुल करण्यासाठी मोदींनी जनतेला विजेचे दिवे व पंखे बंद करून 5 एप्रिलला मेणबत्त्या लावायला सांगीतल्या आहे. रोजगार गेल्याने उपाशी मरत असलेल्या जनतेला कँडल लाइट डिनरचे स्वप्न तर मोदी दाखवत नाही ना! असा नागरिकांचा समज होत असल्याचे उपरोधिक वक्तव्य डॉ राऊत यांनी केले.

पंतप्रधान देशातील नागरिकांशी संवाद साधत असताना कोरोनामुळे उपाशीपोटी असलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी काहीतरी बोलतील असे वाटले होते.  पण त्यांनी कोरोनाच्या संकटात इव्हेंट चालविला आहे, असा आरोप डॉ राऊत यांनी केला आहे. मोदी हे देशाचा प्रागतिक व पुरोगामी वारसा मागे नेत आहेत. आज देशाला कधी नव्हे इतकी वैज्ञानिक भूमिकेची गरज असताना "दिवे लावा" यासारखी कामे करण्यास सांगणे म्हणजे प्रतिगामी बनणे असून ही दुर्दैवाची बाब आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे. 5 एप्रिलला कुणीही आपल्या घरातील दिवे बंद करू नयेत, तसेच या काळात जागरुक राहून कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे /सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन डॉ. राऊत यांनी केले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNitin Rautनितीन राऊत