शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 तारखेला देशाला एप्रिल फूल बनविणार; मेगा इव्हेंट करणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 23:04 IST

जर एकाच वेळी सगळ्यांनी विजेचे दिवे व पंखे बंद केले तर ग्रीड हाय फ्रिक्वेन्सीवर ट्रिप होऊन देशातील सर्व वीज निर्मिती केंद्रे बंद पडून अतिशय मोठे नुकसान होईल.

मुंबईः घरांमधील सर्व लाईट नऊ मिनिटे बंद करून त्याऐवजी मेणबत्ती किंवा दिवे, टॉर्च लावण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन म्हणजे शुद्ध बालिशपणा आहे. "साठी बुद्धी नाठी" झाल्याचे हे लक्षण आहे, अशी टीका ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे. 5 एप्रिलला रात्री नऊ वाजता कोणीही घरातील लाईट्स बंद करू नयेत, असे आवाहन डॉ. राऊत यांनी केले आहे.

जर एकाच वेळी सगळ्यांनी विजेचे दिवे व पंखे बंद केले, तर ग्रीड हाय फ्रिक्वेन्सीवर ट्रिप होऊन देशातील सर्व वीज निर्मिती केंद्रे बंद पडून अतिशय मोठे नुकसान होईल. वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी कित्येक तास लागतील. यामुळे रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असलेले रुग्ण तडफडून मरतील याची मोदिना चिंता नसून ते पुन्हा एखादा मोठी इव्हेंट करण्यासाठी देशाची सुरक्षा धोक्यात घालून आपले मोठेपण सिद्ध करण्याच्या मागे लागले आहेत.

सध्या लॉकडाऊनमुळे वीजेच्या मागणीत घट झाल्याने ग्रीडमध्ये हाय व्होल्टेज असल्याने जर मागणीत पुन्हा घट निर्माण झाली तर देशाचे ग्रीड फेल होण्याचा धोका निर्माण होईल. यामुळे कोरोना सोबत अजून वेगळे संकट या देशात निर्माण होईल अशी भीती डॉ राऊत यांनी व्यक्त केली आहे. डॉ. राऊत म्हणाले की पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीची ही बाळबोध गोष्ट ऐकून निराशा झाली आहे. आज देशामध्ये कोरोनाचे संकट गंभीर स्वरूप धारण करीत असताना ठोस उपायोजना करण्याचे सोडून पंतप्रधान टाळ्या वाजवा,थाळीनाद करा,लाईट बंद करा, दिवे लावा अशा घोषणा देत सुटले आहेत. यामागे जनतेची दिशाभूल करून कोरोनाच्या धोक्यापासून पळवाट काढण्याचा प्रयत्न करीत आहे, असा घणाघात डॉ राऊत यांनी केला आहे.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकार काय करत आहे? हे जाणून घेण्याचा भारतीय नागरिकांचा हक्क आहे. मात्र देशाला एप्रिल फुल करण्यासाठी मोदींनी जनतेला विजेचे दिवे व पंखे बंद करून 5 एप्रिलला मेणबत्त्या लावायला सांगीतल्या आहे. रोजगार गेल्याने उपाशी मरत असलेल्या जनतेला कँडल लाइट डिनरचे स्वप्न तर मोदी दाखवत नाही ना! असा नागरिकांचा समज होत असल्याचे उपरोधिक वक्तव्य डॉ राऊत यांनी केले.

पंतप्रधान देशातील नागरिकांशी संवाद साधत असताना कोरोनामुळे उपाशीपोटी असलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी काहीतरी बोलतील असे वाटले होते.  पण त्यांनी कोरोनाच्या संकटात इव्हेंट चालविला आहे, असा आरोप डॉ राऊत यांनी केला आहे. मोदी हे देशाचा प्रागतिक व पुरोगामी वारसा मागे नेत आहेत. आज देशाला कधी नव्हे इतकी वैज्ञानिक भूमिकेची गरज असताना "दिवे लावा" यासारखी कामे करण्यास सांगणे म्हणजे प्रतिगामी बनणे असून ही दुर्दैवाची बाब आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे. 5 एप्रिलला कुणीही आपल्या घरातील दिवे बंद करू नयेत, तसेच या काळात जागरुक राहून कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे /सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन डॉ. राऊत यांनी केले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNitin Rautनितीन राऊत