शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus रुग्णांची संख्या वाढतेय; ... तर लॉकडाउनचा कालावधी वाढवावा लागेल - टोपे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 06:11 IST

राज्यात ३८ हजार ३९८ जण होम क्वारंटाइन

- अतुल कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात कोरोनाच्या शक्यतेमुळे होम क्वारंटाइन करण्यात आलेल्यांची संख्या आता ३८,३९८ वर गेली आहे, तर विविध दवाखान्यांमध्ये देखील ३०७२ लोक क्वारंटाइन केले गेले आहेत, असे सांगून आरोग्य मंत्री राजेश टोपे लोकमतशी बोलताना म्हणाले, बाधित किंवा संशयीय दोन्ही रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. वारंवार सांगूनही लोक ऐकण्याच्या मानसिकतेत नाहीत, विनाकारण फिरण्यात त्यांना कसला मोठेपणा वाटतो माहिती नाही, पण असेच चालू राहिले तर नाईलाजाने काही शहरांमध्ये लॉकडाऊनचा कालावधी वाढवावा लागेल.

त्यांच्याशी झालेली ही बातचित :दिल्लीच्या मर्काझमधून राज्यात रुग्णांची संख्या वाढली, असे सांगितले जाते. ते खरे काय आहे?आपल्याला केंद्र सरकारकडून १,२२५ जणांची यादी आली. त्यापैकी १,०३३ लोकांना आपण शोधून काढले, त्यांच्या तपासण्या केल्या. त्यापैकी ७३८ लोकांना आपण क्वारंटाईनमध्ये ठेवले आहे. त्यापैकी ५ जण पॉझिटिव्ह निघाले आहेत.राज्यात मास्क आणि पीपीई किटची सतत मागणी होत आहे. डॉक्टर्स, नर्सेस यांना मास्क मिळत नाहीत, असे सांगितले जात आहे. त्यावर सरकार काय करत आहे?आपल्याकडे सध्या २१ लाख ७० हजार तीन पदरी मास्क आहेत. ते राज्यभर पाठवण्यातही आले आहेत. ज्या ठिकाणी थेट कोरोनाचे बाधित रुग्ण ठेवले आहेत तेथेच एन ९५ मास्कची गरज पडते. एकट्या आरोग्य विभागाकडे एन-९५ मास्क आणि २५,६०० पीपीई किट देखील आहेत. आणखी आॅर्डर दिलेल्या आहेत. त्याची फार गरज पडत नसल्याने या गोष्टी कोणी फार तयार करत नव्हते, पण आता आपण त्याच्या उत्पादनाची सोय राज्यातच केली आहे.

व्हेंटिलेटर आपल्याकडे पुरेशे नाहीत असे बोलले जात आहे. त्याविषयी काय सांगाल?हा विषय नीट समजून घेण्याचा आहे. आपण ११,५९२ आयसोलेशन बेड फक्त कोरोना रुग्णांसाठी तयार ठेवले आहेत. त्यापैकी फक्त ५३७ बेड वापरात आहेत. आयसीयूचे २,४१५ बेड राज्यात आहेत. त्यापैकी फक्त चार ते पाच बेड वापरात आहेत. आपल्याकडे एकट्या आरोग्य विभागाचे २,८०० व्हेंटिलेटर आहेत. एकही रुग्ण आज व्हेंटिलेटरवर नाही. शिवाय महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत राज्यात जवळपास १,००० हॉस्पिटलची नोंदणी झालेली आहे, त्यांच्याकडे सुमारे २००० व्हेंटिलेटर्स आहेत, ज्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही. त्यामुळे वस्तूस्थिती समजून न घेता भीती निर्माण करण्याचे काम कोणी करू नये.

मुंबई व पुण्यात रुग्ण कमी होताना दिसत नाही, त्याचे काय?मुंबईत शुक्रवारी ६७ रुग्ण आढळले, आज ती संख्या ५० पर्यंत आहे. म्हणजे कमी आहे. आपण ज्या भागात ३ पेक्षा जास्त कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत, ते भाग सील केले आहेत. असे २१० विभाग एकट्या मुंबईत आहेत. त्यावर कठोर नजर ठेवली जात आहे. संख्या वाढू द्यायची नसेल तर जनतेने ही सहकार्य केले पाहिजे, ते मिळणार नसेल तर लॉक डाऊन वाढवणे व तो आणखी कठोर करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.समूह तपासणीची वाढ करण्याची गरज आहे पण काही भागात डॉक्टरांना जाऊ दिले जात नाही, अशा तक्रारींवर काय करणार?आपण २,४५५ पथके क्लस्टर कन्टेन्मेंटसाठी तयार केली आहेत. आत्तापर्यंत ९.२५ लाख लोकांची तपासणी पूर्ण झाली आहे. मात्र जर लोक सहकार्य करणार नसतील तर महामारीच्या कायद्यानुसार नाईलाजाने लोकांवर कठोर कारवाई करावी लागेल.

आजीबाईचा बटवा आठवा - टोपेमी आरोग्य मंत्री म्हणून जबाबदारीने काही गोष्टी सांगतो. त्यात आपण रोज कोमट पाणी प्या, प्राणायाम, योगा व श्वासाशी संबंधित आसने करा. हळद, जिरे, लसूण, धने यांचा वापर खाण्यात वाढवा. हर्बल टी ज्यात तुळशी, दालचिनी व आले आहे, ती वापरा. व्हिटामिन सी साठी आवळा, लिंबू, संत्रे रोज खा. आपल्या आजीकडून आपल्याला हे तिच्या बटव्यातून मिळालेले आहे तेच आता करायचे आहे असेही राजेश टोपे म्हणाले.भाजी बाजार : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागपुरात मनपा प्रशासनाने नागरिकांच्या सोयीसाठी मैदानात भाजीबाजाराची व्यवस्था केली. परंतु, ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या नियमांचे उल्लंघन करीत बाजारामध्ये प्रचंड गर्दी होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRajesh Topeराजेश टोपे