शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

Coronavirus: धोका वाढला! राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा १ हजारांवर; दिवसभरात १५० रुग्ण आढळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 20:30 IST

दरम्यान, पुण्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज दिवसभरात ३ जणांचा मृत्यू झाला आहे

ठळक मुद्देराज्यात साथरोग कायदा 1897 लागू केला. गर्दीमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्यादिवसभरात मुंबईत ११६ रुग्ण आढळल्याने मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ६४२ पर्यंत पोहचली आहे

मुंबई – राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असून सरकारसाठी चिंतेचा विषय बनली आहे. राज्यात आतापर्यंत १०१८ कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली असून आज दिवसभरात राज्यात १५० रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे.

राज्यात मुंबईत सर्वाधिक रुग्णांची संख्या आहे. आज दिवसभरात मुंबईत ११६ रुग्ण आढळल्याने मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ६४२ पर्यंत पोहचली आहे. तर पुणे १८, अहमदनगर ३, बुलढाणा २, ठाणे – २, नागपूर ३, सातारा १, औरंगाबाद ३, रत्नागिरी १, सांगली १ अशाप्रकारे १५० नवीन रुग्ण आढळून आले आहेत तर आतापर्यंत राज्यात ६४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, पुण्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज दिवसभरात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांची संख्या १५९वर पोचली आहे. मंगळवारी शहरात नवे १७ रुग्ण आढळले असून सोमवारी ही संख्या ३७वर पोचली होती. त्यामुळे पुणेकरांनी आता अधिकाधिक काळजी घेण्याची गरज आहे. शहरात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शहारातील पूर्व भाग सील करण्यात आला आहे. उर्वरित शहरातही कडक नियम बनवण्यात आले असून कारणाशिवाय बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर थेट कायदेशीर कारवाई केली जात आहे.

त्याचसोबत कोरोना प्रादुर्भावामुळे होत असलेला संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यात तातडीने विविध उपाययोजना, अधिसुचना व आदेश काढण्यात आले.  या उपाययोजनांना मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात आली. 13 मार्च 2020 च्या अधिसुचनेनुसार राज्यात साथरोग कायदा 1897 लागू केला. उपाययोजनांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 13 मार्च रोजीच उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली. 14 मार्च 2020 रोजी महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अधिसूचना लागू झाली.  त्याअंतर्गत अलगीकरण व विलगीकरण याबाबतचे नियम ठरविण्यात आले. 

तसेच अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई, खाजगी रुणालयामध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करणे याबाबी या नियमावलीमध्ये आहेत. गर्दीमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. आपत्कालीन परिस्थितीत औषधे व यंत्रसामुग्री व उपकरणे खरेदी करण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्त तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान त्याचप्रमाणे संचालक, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये यांच्या स्तरावर समिती गठीत करून त्यांना काही अटी व शर्तीनुसार खरेदी करण्यास मुभा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसState Governmentराज्य सरकार