शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: धोका वाढला! राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा १ हजारांवर; दिवसभरात १५० रुग्ण आढळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 20:30 IST

दरम्यान, पुण्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज दिवसभरात ३ जणांचा मृत्यू झाला आहे

ठळक मुद्देराज्यात साथरोग कायदा 1897 लागू केला. गर्दीमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्यादिवसभरात मुंबईत ११६ रुग्ण आढळल्याने मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ६४२ पर्यंत पोहचली आहे

मुंबई – राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असून सरकारसाठी चिंतेचा विषय बनली आहे. राज्यात आतापर्यंत १०१८ कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली असून आज दिवसभरात राज्यात १५० रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे.

राज्यात मुंबईत सर्वाधिक रुग्णांची संख्या आहे. आज दिवसभरात मुंबईत ११६ रुग्ण आढळल्याने मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ६४२ पर्यंत पोहचली आहे. तर पुणे १८, अहमदनगर ३, बुलढाणा २, ठाणे – २, नागपूर ३, सातारा १, औरंगाबाद ३, रत्नागिरी १, सांगली १ अशाप्रकारे १५० नवीन रुग्ण आढळून आले आहेत तर आतापर्यंत राज्यात ६४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, पुण्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज दिवसभरात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांची संख्या १५९वर पोचली आहे. मंगळवारी शहरात नवे १७ रुग्ण आढळले असून सोमवारी ही संख्या ३७वर पोचली होती. त्यामुळे पुणेकरांनी आता अधिकाधिक काळजी घेण्याची गरज आहे. शहरात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शहारातील पूर्व भाग सील करण्यात आला आहे. उर्वरित शहरातही कडक नियम बनवण्यात आले असून कारणाशिवाय बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर थेट कायदेशीर कारवाई केली जात आहे.

त्याचसोबत कोरोना प्रादुर्भावामुळे होत असलेला संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यात तातडीने विविध उपाययोजना, अधिसुचना व आदेश काढण्यात आले.  या उपाययोजनांना मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात आली. 13 मार्च 2020 च्या अधिसुचनेनुसार राज्यात साथरोग कायदा 1897 लागू केला. उपाययोजनांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 13 मार्च रोजीच उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली. 14 मार्च 2020 रोजी महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अधिसूचना लागू झाली.  त्याअंतर्गत अलगीकरण व विलगीकरण याबाबतचे नियम ठरविण्यात आले. 

तसेच अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई, खाजगी रुणालयामध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करणे याबाबी या नियमावलीमध्ये आहेत. गर्दीमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. आपत्कालीन परिस्थितीत औषधे व यंत्रसामुग्री व उपकरणे खरेदी करण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्त तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान त्याचप्रमाणे संचालक, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये यांच्या स्तरावर समिती गठीत करून त्यांना काही अटी व शर्तीनुसार खरेदी करण्यास मुभा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसState Governmentराज्य सरकार