शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

Coronavirus: धोका वाढला! राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा १ हजारांवर; दिवसभरात १५० रुग्ण आढळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 20:30 IST

दरम्यान, पुण्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज दिवसभरात ३ जणांचा मृत्यू झाला आहे

ठळक मुद्देराज्यात साथरोग कायदा 1897 लागू केला. गर्दीमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्यादिवसभरात मुंबईत ११६ रुग्ण आढळल्याने मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ६४२ पर्यंत पोहचली आहे

मुंबई – राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असून सरकारसाठी चिंतेचा विषय बनली आहे. राज्यात आतापर्यंत १०१८ कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली असून आज दिवसभरात राज्यात १५० रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे.

राज्यात मुंबईत सर्वाधिक रुग्णांची संख्या आहे. आज दिवसभरात मुंबईत ११६ रुग्ण आढळल्याने मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ६४२ पर्यंत पोहचली आहे. तर पुणे १८, अहमदनगर ३, बुलढाणा २, ठाणे – २, नागपूर ३, सातारा १, औरंगाबाद ३, रत्नागिरी १, सांगली १ अशाप्रकारे १५० नवीन रुग्ण आढळून आले आहेत तर आतापर्यंत राज्यात ६४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, पुण्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज दिवसभरात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांची संख्या १५९वर पोचली आहे. मंगळवारी शहरात नवे १७ रुग्ण आढळले असून सोमवारी ही संख्या ३७वर पोचली होती. त्यामुळे पुणेकरांनी आता अधिकाधिक काळजी घेण्याची गरज आहे. शहरात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शहारातील पूर्व भाग सील करण्यात आला आहे. उर्वरित शहरातही कडक नियम बनवण्यात आले असून कारणाशिवाय बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर थेट कायदेशीर कारवाई केली जात आहे.

त्याचसोबत कोरोना प्रादुर्भावामुळे होत असलेला संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यात तातडीने विविध उपाययोजना, अधिसुचना व आदेश काढण्यात आले.  या उपाययोजनांना मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात आली. 13 मार्च 2020 च्या अधिसुचनेनुसार राज्यात साथरोग कायदा 1897 लागू केला. उपाययोजनांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 13 मार्च रोजीच उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली. 14 मार्च 2020 रोजी महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अधिसूचना लागू झाली.  त्याअंतर्गत अलगीकरण व विलगीकरण याबाबतचे नियम ठरविण्यात आले. 

तसेच अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई, खाजगी रुणालयामध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करणे याबाबी या नियमावलीमध्ये आहेत. गर्दीमुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. आपत्कालीन परिस्थितीत औषधे व यंत्रसामुग्री व उपकरणे खरेदी करण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्त तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान त्याचप्रमाणे संचालक, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये यांच्या स्तरावर समिती गठीत करून त्यांना काही अटी व शर्तीनुसार खरेदी करण्यास मुभा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसState Governmentराज्य सरकार