शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: ...तर आणि तरच राज्यातील कोरोनाची साखळी तुटेल; तज्ज्ञांनी दिला लाखमोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 14:54 IST

CoronaVirus Vaccination Maharashtra News: राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ; प्रशासनाची चिंता वाढली

मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं वाढ होत आहे. गेल्या वर्षात कोरोना संकटाची तीव्रता सर्वाधिक असताना जितक्या रुग्णांची संख्या नोंद झाली, त्याहीपेक्षा अधिक रुग्ण आता आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यासारखी परिस्थिती आहे. अनेक भागांमध्ये निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही कोरोनाची साखळी तुटलेली नाही. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य विषयक तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.संपूर्ण देशाचं लसीकरण करण्याची गरज नाही. त्याऐवजी लसीकरणाचा प्राधान्यक्रम निश्चित करायला हवा, असा सल्ला साळुंखे यांनी दिला आहे. आपण आजपासून ४५ वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण करण्यास सुरुवात केली. मात्र १८ वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण व्हायला हवं. गंभीर आजार असलेल्या १८ वर्षांवरील व्यक्तींना प्राधान्यानं लस द्यायला हवी. तरच राज्यातील कोरोनाची साखळी तुटेल, असा मोलाचा सल्ला साळुंखे यांनी दिला.अरे व्वा! गरोदर महिला अन् त्याच्या मुलांसाठी इफेक्टीव्ह ठरतेय कोरोनाची लस; संशोधनातून दावादेशाची लोकसंख्या १३५ कोटी, महाराष्ट्राची १२ कोटी, इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या लसीकरणाचं आव्हान असं म्हटलं गेलं. पण मुळात इतक्या मोठ्या लोकसंख्येचं लसीकरण करण्याची गरज नाही. कोरोना स्थिती हाताळण्यात, लसीकरणात महाराष्ट्राला स्वायत्तता द्यायला हवी, अशी गरज साळुंखेंनी व्यक्त केली. पुण्यात दररोज १ लाख लोकांचं लसीकरण व्हायला हवं. खासगी क्षेत्राची मदत घेतल्यास ते शक्य आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरात दररोज १ लाख लसीकरण व्हायला हवं, असं ते पुढे म्हणाले.आजपासून ४५ वर्षांवरील सर्वांना लस, थेट पुणे गाठून मिळविले २ लाख डोसगंभीर स्वरुपाचे आजार असलेल्या १८ वर्षांवरील व्यक्तींना लस देण्याची मागणी मी दीड महिन्यांपूर्वीच केली. आपली जीवनशैली पाहता अनेक तरुणांनादेखील गंभीर स्वरुपाचे आजार आहेत. पण त्यांना आपण लस देत नाही. यामागचा तर्क काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राला जास्त लसींचा पुरवठा केल्यास इतर राज्यांवर अन्याय होईल, हा युक्तिवाद साळुंखे यांनी खोडून काढला. इतर राज्यांमधील परिस्थिती महाराष्ट्रासारखी नाही. त्यामुळे महाराष्ट्राला प्राधान्य देण्याची गरज आहे. त्यातही संपूर्ण महाराष्ट्राऐवजी मुंबई, पुणे आणि रुग्ण संख्या अधिक असलेल्या शहरांना प्राधान्य द्यायला हवं, असं ते म्हणाले.आज कोरोनाची लस घेतली की उद्यापासून आपला कोरोनाचा बचाव होणार असं नाही. शरीरात अँटीबॉडीज तयार करण्यासाठी वेळ जावा लागतो. या गोष्टीचा विचार लसीकरण करताना करण्यात यावा, असं साळुंखे यांनी सांगितलं. सध्या मुंबई, पुण्यात दररोज कोरोनाच्या ६ हजार केसेस आढळत आहे. पण हे हिमनगाचं टोक आहे. आज आढळून आलेले ६ हजार जण गेल्या काही दिवसांत किमान १० लोकांच्या संपर्कात आले, असा आकडा धरला तरी मग संख्या ६० हजारांच्या घरात जाईल. आताची कोरोना लस जाण्यासाठी एप्रिलचा शेवट उजाडेल, असा अंदाज त्यांनी वर्तवला.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस