शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

CoronaVirus News: ...तर आणि तरच राज्यातील कोरोनाची साखळी तुटेल; तज्ज्ञांनी दिला लाखमोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 14:54 IST

CoronaVirus Vaccination Maharashtra News: राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ; प्रशासनाची चिंता वाढली

मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं वाढ होत आहे. गेल्या वर्षात कोरोना संकटाची तीव्रता सर्वाधिक असताना जितक्या रुग्णांची संख्या नोंद झाली, त्याहीपेक्षा अधिक रुग्ण आता आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यासारखी परिस्थिती आहे. अनेक भागांमध्ये निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही कोरोनाची साखळी तुटलेली नाही. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य विषयक तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.संपूर्ण देशाचं लसीकरण करण्याची गरज नाही. त्याऐवजी लसीकरणाचा प्राधान्यक्रम निश्चित करायला हवा, असा सल्ला साळुंखे यांनी दिला आहे. आपण आजपासून ४५ वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण करण्यास सुरुवात केली. मात्र १८ वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण व्हायला हवं. गंभीर आजार असलेल्या १८ वर्षांवरील व्यक्तींना प्राधान्यानं लस द्यायला हवी. तरच राज्यातील कोरोनाची साखळी तुटेल, असा मोलाचा सल्ला साळुंखे यांनी दिला.अरे व्वा! गरोदर महिला अन् त्याच्या मुलांसाठी इफेक्टीव्ह ठरतेय कोरोनाची लस; संशोधनातून दावादेशाची लोकसंख्या १३५ कोटी, महाराष्ट्राची १२ कोटी, इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या लसीकरणाचं आव्हान असं म्हटलं गेलं. पण मुळात इतक्या मोठ्या लोकसंख्येचं लसीकरण करण्याची गरज नाही. कोरोना स्थिती हाताळण्यात, लसीकरणात महाराष्ट्राला स्वायत्तता द्यायला हवी, अशी गरज साळुंखेंनी व्यक्त केली. पुण्यात दररोज १ लाख लोकांचं लसीकरण व्हायला हवं. खासगी क्षेत्राची मदत घेतल्यास ते शक्य आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरात दररोज १ लाख लसीकरण व्हायला हवं, असं ते पुढे म्हणाले.आजपासून ४५ वर्षांवरील सर्वांना लस, थेट पुणे गाठून मिळविले २ लाख डोसगंभीर स्वरुपाचे आजार असलेल्या १८ वर्षांवरील व्यक्तींना लस देण्याची मागणी मी दीड महिन्यांपूर्वीच केली. आपली जीवनशैली पाहता अनेक तरुणांनादेखील गंभीर स्वरुपाचे आजार आहेत. पण त्यांना आपण लस देत नाही. यामागचा तर्क काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राला जास्त लसींचा पुरवठा केल्यास इतर राज्यांवर अन्याय होईल, हा युक्तिवाद साळुंखे यांनी खोडून काढला. इतर राज्यांमधील परिस्थिती महाराष्ट्रासारखी नाही. त्यामुळे महाराष्ट्राला प्राधान्य देण्याची गरज आहे. त्यातही संपूर्ण महाराष्ट्राऐवजी मुंबई, पुणे आणि रुग्ण संख्या अधिक असलेल्या शहरांना प्राधान्य द्यायला हवं, असं ते म्हणाले.आज कोरोनाची लस घेतली की उद्यापासून आपला कोरोनाचा बचाव होणार असं नाही. शरीरात अँटीबॉडीज तयार करण्यासाठी वेळ जावा लागतो. या गोष्टीचा विचार लसीकरण करताना करण्यात यावा, असं साळुंखे यांनी सांगितलं. सध्या मुंबई, पुण्यात दररोज कोरोनाच्या ६ हजार केसेस आढळत आहे. पण हे हिमनगाचं टोक आहे. आज आढळून आलेले ६ हजार जण गेल्या काही दिवसांत किमान १० लोकांच्या संपर्कात आले, असा आकडा धरला तरी मग संख्या ६० हजारांच्या घरात जाईल. आताची कोरोना लस जाण्यासाठी एप्रिलचा शेवट उजाडेल, असा अंदाज त्यांनी वर्तवला.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस