शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: ...तर आणि तरच राज्यातील कोरोनाची साखळी तुटेल; तज्ज्ञांनी दिला लाखमोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 14:54 IST

CoronaVirus Vaccination Maharashtra News: राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ; प्रशासनाची चिंता वाढली

मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं वाढ होत आहे. गेल्या वर्षात कोरोना संकटाची तीव्रता सर्वाधिक असताना जितक्या रुग्णांची संख्या नोंद झाली, त्याहीपेक्षा अधिक रुग्ण आता आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यासारखी परिस्थिती आहे. अनेक भागांमध्ये निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही कोरोनाची साखळी तुटलेली नाही. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य विषयक तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.संपूर्ण देशाचं लसीकरण करण्याची गरज नाही. त्याऐवजी लसीकरणाचा प्राधान्यक्रम निश्चित करायला हवा, असा सल्ला साळुंखे यांनी दिला आहे. आपण आजपासून ४५ वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण करण्यास सुरुवात केली. मात्र १८ वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण व्हायला हवं. गंभीर आजार असलेल्या १८ वर्षांवरील व्यक्तींना प्राधान्यानं लस द्यायला हवी. तरच राज्यातील कोरोनाची साखळी तुटेल, असा मोलाचा सल्ला साळुंखे यांनी दिला.अरे व्वा! गरोदर महिला अन् त्याच्या मुलांसाठी इफेक्टीव्ह ठरतेय कोरोनाची लस; संशोधनातून दावादेशाची लोकसंख्या १३५ कोटी, महाराष्ट्राची १२ कोटी, इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या लसीकरणाचं आव्हान असं म्हटलं गेलं. पण मुळात इतक्या मोठ्या लोकसंख्येचं लसीकरण करण्याची गरज नाही. कोरोना स्थिती हाताळण्यात, लसीकरणात महाराष्ट्राला स्वायत्तता द्यायला हवी, अशी गरज साळुंखेंनी व्यक्त केली. पुण्यात दररोज १ लाख लोकांचं लसीकरण व्हायला हवं. खासगी क्षेत्राची मदत घेतल्यास ते शक्य आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरात दररोज १ लाख लसीकरण व्हायला हवं, असं ते पुढे म्हणाले.आजपासून ४५ वर्षांवरील सर्वांना लस, थेट पुणे गाठून मिळविले २ लाख डोसगंभीर स्वरुपाचे आजार असलेल्या १८ वर्षांवरील व्यक्तींना लस देण्याची मागणी मी दीड महिन्यांपूर्वीच केली. आपली जीवनशैली पाहता अनेक तरुणांनादेखील गंभीर स्वरुपाचे आजार आहेत. पण त्यांना आपण लस देत नाही. यामागचा तर्क काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राला जास्त लसींचा पुरवठा केल्यास इतर राज्यांवर अन्याय होईल, हा युक्तिवाद साळुंखे यांनी खोडून काढला. इतर राज्यांमधील परिस्थिती महाराष्ट्रासारखी नाही. त्यामुळे महाराष्ट्राला प्राधान्य देण्याची गरज आहे. त्यातही संपूर्ण महाराष्ट्राऐवजी मुंबई, पुणे आणि रुग्ण संख्या अधिक असलेल्या शहरांना प्राधान्य द्यायला हवं, असं ते म्हणाले.आज कोरोनाची लस घेतली की उद्यापासून आपला कोरोनाचा बचाव होणार असं नाही. शरीरात अँटीबॉडीज तयार करण्यासाठी वेळ जावा लागतो. या गोष्टीचा विचार लसीकरण करताना करण्यात यावा, असं साळुंखे यांनी सांगितलं. सध्या मुंबई, पुण्यात दररोज कोरोनाच्या ६ हजार केसेस आढळत आहे. पण हे हिमनगाचं टोक आहे. आज आढळून आलेले ६ हजार जण गेल्या काही दिवसांत किमान १० लोकांच्या संपर्कात आले, असा आकडा धरला तरी मग संख्या ६० हजारांच्या घरात जाईल. आताची कोरोना लस जाण्यासाठी एप्रिलचा शेवट उजाडेल, असा अंदाज त्यांनी वर्तवला.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस