शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

CoronaVirus News : केवळ ज्येष्ठ नव्हे; तरुणाईलाही कोरोना संसर्गाचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 07:07 IST

राज्यात सध्या २१ ते ३० वयोगटातील ४२,४५७ रुग्ण आहेत, तर ३१ ते ४० वयोगटातील ४७,८५८५ रुग्ण आहेत. एकूण रुग्णसंख्येत २१ ते ३० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण १७.८९ तर ३१ ते ४० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण २०.१७ आहे.

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या अडीच लाखांच्या टप्प्यावर आहे. दिवसागणिक राज्यातील स्थिती गंभीर होत असताना केवळ ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे म्हटले जात होते. मात्र राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाहता ९० हजारांहून अधिक तरुण कोरोना बाधित आहेत. त्यामुळे केवळ ज्येष्ठांनीच नव्हे तर तरुणांनीही अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.राज्यात सध्या २१ ते ३० वयोगटातील ४२,४५७ रुग्ण आहेत, तर ३१ ते ४० वयोगटातील ४७,८५८५ रुग्ण आहेत. एकूण रुग्णसंख्येत २१ ते ३० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण १७.८९ तर ३१ ते ४० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण २०.१७ आहे.तज्ज्ञांच्या मते, लॉकडाऊनच्या काळाच कामानिमित्त तरुणाईच सर्वाधिक बाहेर पडत आहेत. याच कारणांमुळे ते सर्वात जास्त कोरोनाच्या विळख्यात येत आहेत. मेडिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड ड्रग विभाग महाराष्ट्राच्या आकडेवारीनुसार, १४ एप्रिल म्हणजेच लॉकडाऊन १.० पर्यंत राज्यात ९२३ लोक पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर, ३१ मेपर्यंत कोरोनानेग्रस्त झालेल्या तरुणांच्या संख्येत वाढ होऊन ती २६,३२५ पर्यंत पोहोचली.याविषयी, संक्रमण रोगाचे तज्ज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव यांनी सांगितले की, कोरोनाच्या विळख्यात तरुणाई अडकण्याची प्रमुख दोन कारणे आहेत. कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण जास्त आहेत. तर, दुसरे मुख्य कारण म्हणजे अनेक तरुण लॉकडाऊनचे पालन करत नाहीत. कुटुंबातील इतर कोणी बाहेर पडू नये म्हणून तरुणच घराबाहेर पडत आहेत, यामुळे तरुणाईला होणाºया संसर्गात वाढ होताना दिसत आहे.निदान उशिरा झाल्याने वाढतो धोका!बºयाचदा ज्येष्ठ नागरिकांना वयोमानानुसार अतिजोखमीचे आजार उद्भवतात त्यामुळे त्यांच्या आरोग्याला अन्य आजारांचा अधिक धोका संभावतो. मात्र आता तरुणाईच्या बाबतीतही हीच स्थिती उद्भवली आहे. तरुण वयात मधुमेह, रक्तदाबाच्या तपासण्या न करणे व या समस्यांकडे दुर्लक्ष करणे तरुणाईसाठी घातक ठरत आहे.याविषयी, डॉ.ओम श्रीवास्तव यांनी सांगितले की, तरुणाईला जीवनशैलीशी निगडीत आजारांचा विळखा असतो. मात्र बºयाचदा या आजारांचे निदान होत नाही किंवा उशिराने निदान होते तोपर्यंत आरोग्याचा धोका वाढलेला असतो ही बाब लक्षात येत नाही.सध्याच्या काळात तरुणाईसह प्रत्येकाने जीवनशैली, पोषक आहार यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. शिवाय, घराबाहेर पडताना शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणेही बंधनकारक आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस