शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

CoronaVirus News : केवळ ज्येष्ठ नव्हे; तरुणाईलाही कोरोना संसर्गाचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 07:07 IST

राज्यात सध्या २१ ते ३० वयोगटातील ४२,४५७ रुग्ण आहेत, तर ३१ ते ४० वयोगटातील ४७,८५८५ रुग्ण आहेत. एकूण रुग्णसंख्येत २१ ते ३० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण १७.८९ तर ३१ ते ४० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण २०.१७ आहे.

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या अडीच लाखांच्या टप्प्यावर आहे. दिवसागणिक राज्यातील स्थिती गंभीर होत असताना केवळ ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे म्हटले जात होते. मात्र राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाहता ९० हजारांहून अधिक तरुण कोरोना बाधित आहेत. त्यामुळे केवळ ज्येष्ठांनीच नव्हे तर तरुणांनीही अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.राज्यात सध्या २१ ते ३० वयोगटातील ४२,४५७ रुग्ण आहेत, तर ३१ ते ४० वयोगटातील ४७,८५८५ रुग्ण आहेत. एकूण रुग्णसंख्येत २१ ते ३० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण १७.८९ तर ३१ ते ४० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण २०.१७ आहे.तज्ज्ञांच्या मते, लॉकडाऊनच्या काळाच कामानिमित्त तरुणाईच सर्वाधिक बाहेर पडत आहेत. याच कारणांमुळे ते सर्वात जास्त कोरोनाच्या विळख्यात येत आहेत. मेडिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड ड्रग विभाग महाराष्ट्राच्या आकडेवारीनुसार, १४ एप्रिल म्हणजेच लॉकडाऊन १.० पर्यंत राज्यात ९२३ लोक पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर, ३१ मेपर्यंत कोरोनानेग्रस्त झालेल्या तरुणांच्या संख्येत वाढ होऊन ती २६,३२५ पर्यंत पोहोचली.याविषयी, संक्रमण रोगाचे तज्ज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव यांनी सांगितले की, कोरोनाच्या विळख्यात तरुणाई अडकण्याची प्रमुख दोन कारणे आहेत. कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण जास्त आहेत. तर, दुसरे मुख्य कारण म्हणजे अनेक तरुण लॉकडाऊनचे पालन करत नाहीत. कुटुंबातील इतर कोणी बाहेर पडू नये म्हणून तरुणच घराबाहेर पडत आहेत, यामुळे तरुणाईला होणाºया संसर्गात वाढ होताना दिसत आहे.निदान उशिरा झाल्याने वाढतो धोका!बºयाचदा ज्येष्ठ नागरिकांना वयोमानानुसार अतिजोखमीचे आजार उद्भवतात त्यामुळे त्यांच्या आरोग्याला अन्य आजारांचा अधिक धोका संभावतो. मात्र आता तरुणाईच्या बाबतीतही हीच स्थिती उद्भवली आहे. तरुण वयात मधुमेह, रक्तदाबाच्या तपासण्या न करणे व या समस्यांकडे दुर्लक्ष करणे तरुणाईसाठी घातक ठरत आहे.याविषयी, डॉ.ओम श्रीवास्तव यांनी सांगितले की, तरुणाईला जीवनशैलीशी निगडीत आजारांचा विळखा असतो. मात्र बºयाचदा या आजारांचे निदान होत नाही किंवा उशिराने निदान होते तोपर्यंत आरोग्याचा धोका वाढलेला असतो ही बाब लक्षात येत नाही.सध्याच्या काळात तरुणाईसह प्रत्येकाने जीवनशैली, पोषक आहार यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. शिवाय, घराबाहेर पडताना शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणेही बंधनकारक आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस