शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

CoronaVirus News : मुंबईकरांनो, सध्या गावी येऊ नका, आहे तेथेच थांबा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 06:46 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates :‘लॉकडाउन’च्या पहिल्या दोन टप्प्यांत चांगली शिस्त पाळली. हातावर पोट असणाऱ्यांनीही दीड महिना पोटाला चिमटा देऊन घर सोडले नाही.

जळगाव : मुंबई आणि पुण्यातून येत असलेल्यांमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने कोल्हापूर तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील नागरिक प्रचंड अस्वस्थ आहेत. दररोज शेकडोच्या संख्येने येणाऱ्या गाववाल्यांची वैद्यकीय तपासणी आणि अलगीकरण कक्षात त्यांची सोय करण्याचा ताण प्रशासनावरही वाढला आहे. शिवाय नव्या बाधितांमुळे समूह संसर्गाची भीती असल्याने ‘‘गाववाल्यांनो, सध्या तुम्ही गावाकडे येऊ नका’’, असे कळकळीचे आवाहन कोल्हापूर आणि कोकणवासीय करू लागले आहेत.‘लॉकडाउन’च्या पहिल्या दोन टप्प्यांत चांगली शिस्त पाळली. हातावर पोट असणाऱ्यांनीही दीड महिना पोटाला चिमटा देऊन घर सोडले नाही. रुग्ण कमी होतील, कोल्हापूर कोरोनामुक्त होईल आणि ठप्प झालेले व्यवहार पूर्ववत सुरू होतील, अशी अपेक्षा सामान्य माणसाला होती. मात्र, लॉकडाउन तीनमध्ये राज्य सरकारने प्रवासाची परवानगी देताच मुंबई, पुण्यासह राज्यभरातील गाववाले आपल्या गावाकडे परतू लागले आहेत. कोकण व कोल्हापूरमध्ये गावी येणाºयांमध्ये सर्वाधिक संख्या मुंबईकर आणि पुणेकरांची आहे.रत्नागिरीत १ लाख मुंबईकररत्नागिरी जिल्ह्यात सुमारे १ लाख, १० हजार मुंबईकर दाखल झाले आहेत. १० दिवसांमध्ये ८० रुग्ण वाढले असून, त्यापैकी ७५ मुंबईकर आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याची वाटचाल ग्रीन झोनकडे सुरू असताना येणाºया चाकरमान्यांमुळे पुन्हा बाधितांचा आकडा ८ वर गेला आहे.कोल्हापूर जिल्ह्यात मे महिन्यात ५ हजार गाड्याबाधित व्यक्ती गावात येऊ लागल्याने गावेच्या गावे लॉक करावी लागत आहेत. एक मेपासून कोल्हापूर जिल्ह्यात पाच हजार गाड्या मुंबई-पुणे येथून आल्या आहेत. वैद्यकीय पास घेऊन किमान २० हजार जण आले आहेत.जिल्ह्यात आढळलेल्या एकूण ३७ पैकी २२ कोरोनाबाधित मुंबईतून आलेले आहेत.जिल्ह्यात प्रादूर्भाव वाढू नये यासाठी पुणे, मुंबईहून येणाºया नागरिकांना जिल्हाधिकाºयांची परवानगी असल्याशिवाय जिल्ह्यात प्रवेश न देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. बाहेरून येणाºयांनी प्रशासनाला समजून घ्यावे व सहकार्य करावे.- सतेज पाटील,पालकमंत्री, कोल्हापूरमुंबईत कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असताना चाकरमान्यांना आता गावी आणणे योग्य नाही. रत्नागिरी जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांमध्ये मुंबईकरच अधिक आहेत. त्यामुळे मुंबईकरांना गावी आणणे थांबविणे गरजेचे आहे.- अ‍ॅड़ दीपक पटवर्धन,भाजप जिल्हाध्यक्ष, दक्षिण रत्नागिरी.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस