शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
4
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
5
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
6
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
7
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
9
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
10
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
11
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
12
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
13
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
14
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
15
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
16
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
17
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
18
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
19
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
20
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण

CoronaVirus News : मुंबईकरांनो, सध्या गावी येऊ नका, आहे तेथेच थांबा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 06:46 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates :‘लॉकडाउन’च्या पहिल्या दोन टप्प्यांत चांगली शिस्त पाळली. हातावर पोट असणाऱ्यांनीही दीड महिना पोटाला चिमटा देऊन घर सोडले नाही.

जळगाव : मुंबई आणि पुण्यातून येत असलेल्यांमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने कोल्हापूर तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील नागरिक प्रचंड अस्वस्थ आहेत. दररोज शेकडोच्या संख्येने येणाऱ्या गाववाल्यांची वैद्यकीय तपासणी आणि अलगीकरण कक्षात त्यांची सोय करण्याचा ताण प्रशासनावरही वाढला आहे. शिवाय नव्या बाधितांमुळे समूह संसर्गाची भीती असल्याने ‘‘गाववाल्यांनो, सध्या तुम्ही गावाकडे येऊ नका’’, असे कळकळीचे आवाहन कोल्हापूर आणि कोकणवासीय करू लागले आहेत.‘लॉकडाउन’च्या पहिल्या दोन टप्प्यांत चांगली शिस्त पाळली. हातावर पोट असणाऱ्यांनीही दीड महिना पोटाला चिमटा देऊन घर सोडले नाही. रुग्ण कमी होतील, कोल्हापूर कोरोनामुक्त होईल आणि ठप्प झालेले व्यवहार पूर्ववत सुरू होतील, अशी अपेक्षा सामान्य माणसाला होती. मात्र, लॉकडाउन तीनमध्ये राज्य सरकारने प्रवासाची परवानगी देताच मुंबई, पुण्यासह राज्यभरातील गाववाले आपल्या गावाकडे परतू लागले आहेत. कोकण व कोल्हापूरमध्ये गावी येणाºयांमध्ये सर्वाधिक संख्या मुंबईकर आणि पुणेकरांची आहे.रत्नागिरीत १ लाख मुंबईकररत्नागिरी जिल्ह्यात सुमारे १ लाख, १० हजार मुंबईकर दाखल झाले आहेत. १० दिवसांमध्ये ८० रुग्ण वाढले असून, त्यापैकी ७५ मुंबईकर आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याची वाटचाल ग्रीन झोनकडे सुरू असताना येणाºया चाकरमान्यांमुळे पुन्हा बाधितांचा आकडा ८ वर गेला आहे.कोल्हापूर जिल्ह्यात मे महिन्यात ५ हजार गाड्याबाधित व्यक्ती गावात येऊ लागल्याने गावेच्या गावे लॉक करावी लागत आहेत. एक मेपासून कोल्हापूर जिल्ह्यात पाच हजार गाड्या मुंबई-पुणे येथून आल्या आहेत. वैद्यकीय पास घेऊन किमान २० हजार जण आले आहेत.जिल्ह्यात आढळलेल्या एकूण ३७ पैकी २२ कोरोनाबाधित मुंबईतून आलेले आहेत.जिल्ह्यात प्रादूर्भाव वाढू नये यासाठी पुणे, मुंबईहून येणाºया नागरिकांना जिल्हाधिकाºयांची परवानगी असल्याशिवाय जिल्ह्यात प्रवेश न देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. बाहेरून येणाºयांनी प्रशासनाला समजून घ्यावे व सहकार्य करावे.- सतेज पाटील,पालकमंत्री, कोल्हापूरमुंबईत कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असताना चाकरमान्यांना आता गावी आणणे योग्य नाही. रत्नागिरी जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांमध्ये मुंबईकरच अधिक आहेत. त्यामुळे मुंबईकरांना गावी आणणे थांबविणे गरजेचे आहे.- अ‍ॅड़ दीपक पटवर्धन,भाजप जिल्हाध्यक्ष, दक्षिण रत्नागिरी.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस