शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : मुंबईकरांनो, सध्या गावी येऊ नका, आहे तेथेच थांबा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 06:46 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates :‘लॉकडाउन’च्या पहिल्या दोन टप्प्यांत चांगली शिस्त पाळली. हातावर पोट असणाऱ्यांनीही दीड महिना पोटाला चिमटा देऊन घर सोडले नाही.

जळगाव : मुंबई आणि पुण्यातून येत असलेल्यांमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने कोल्हापूर तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील नागरिक प्रचंड अस्वस्थ आहेत. दररोज शेकडोच्या संख्येने येणाऱ्या गाववाल्यांची वैद्यकीय तपासणी आणि अलगीकरण कक्षात त्यांची सोय करण्याचा ताण प्रशासनावरही वाढला आहे. शिवाय नव्या बाधितांमुळे समूह संसर्गाची भीती असल्याने ‘‘गाववाल्यांनो, सध्या तुम्ही गावाकडे येऊ नका’’, असे कळकळीचे आवाहन कोल्हापूर आणि कोकणवासीय करू लागले आहेत.‘लॉकडाउन’च्या पहिल्या दोन टप्प्यांत चांगली शिस्त पाळली. हातावर पोट असणाऱ्यांनीही दीड महिना पोटाला चिमटा देऊन घर सोडले नाही. रुग्ण कमी होतील, कोल्हापूर कोरोनामुक्त होईल आणि ठप्प झालेले व्यवहार पूर्ववत सुरू होतील, अशी अपेक्षा सामान्य माणसाला होती. मात्र, लॉकडाउन तीनमध्ये राज्य सरकारने प्रवासाची परवानगी देताच मुंबई, पुण्यासह राज्यभरातील गाववाले आपल्या गावाकडे परतू लागले आहेत. कोकण व कोल्हापूरमध्ये गावी येणाºयांमध्ये सर्वाधिक संख्या मुंबईकर आणि पुणेकरांची आहे.रत्नागिरीत १ लाख मुंबईकररत्नागिरी जिल्ह्यात सुमारे १ लाख, १० हजार मुंबईकर दाखल झाले आहेत. १० दिवसांमध्ये ८० रुग्ण वाढले असून, त्यापैकी ७५ मुंबईकर आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याची वाटचाल ग्रीन झोनकडे सुरू असताना येणाºया चाकरमान्यांमुळे पुन्हा बाधितांचा आकडा ८ वर गेला आहे.कोल्हापूर जिल्ह्यात मे महिन्यात ५ हजार गाड्याबाधित व्यक्ती गावात येऊ लागल्याने गावेच्या गावे लॉक करावी लागत आहेत. एक मेपासून कोल्हापूर जिल्ह्यात पाच हजार गाड्या मुंबई-पुणे येथून आल्या आहेत. वैद्यकीय पास घेऊन किमान २० हजार जण आले आहेत.जिल्ह्यात आढळलेल्या एकूण ३७ पैकी २२ कोरोनाबाधित मुंबईतून आलेले आहेत.जिल्ह्यात प्रादूर्भाव वाढू नये यासाठी पुणे, मुंबईहून येणाºया नागरिकांना जिल्हाधिकाºयांची परवानगी असल्याशिवाय जिल्ह्यात प्रवेश न देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. बाहेरून येणाºयांनी प्रशासनाला समजून घ्यावे व सहकार्य करावे.- सतेज पाटील,पालकमंत्री, कोल्हापूरमुंबईत कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असताना चाकरमान्यांना आता गावी आणणे योग्य नाही. रत्नागिरी जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांमध्ये मुंबईकरच अधिक आहेत. त्यामुळे मुंबईकरांना गावी आणणे थांबविणे गरजेचे आहे.- अ‍ॅड़ दीपक पटवर्धन,भाजप जिल्हाध्यक्ष, दक्षिण रत्नागिरी.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस