शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

CoronaVirus News : राज्यात केवळ पाच टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 04:43 IST

CoronaVirus News : राज्यात ३९ टक्के रुग्ण लक्षणविरहित आहेत. तर राज्यात ५० टक्के रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मात्र राज्यातील केवळ पाच टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याचे राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संचालनालयाच्या अहवालात म्हटले आहे. याशिवाय राज्यात ३९ टक्के रुग्ण लक्षणविरहित आहेत. तर राज्यात ५० टक्के रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.अहवालानुसार, राज्यातील एकूण रुग्णसंख्येपैकी केवळ एक टक्का रुग्ण गंभीर असून पाच टक्के रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. वैद्यकीय शिक्षण व संचालनालय विभागाच्या माध्यमातून राज्यातील कोरोनाच्या सांख्यिक माहितीचा विश्लेषणात्मक अहवाल तयार करण्यात येतो. या अहवालानुसार, राज्यात रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपैकी ८६ टक्के रुग्ण लक्षणविरहित, ११ टक्के रुग्णांना लक्षणे आहेत. तर ३ टक्के रुग्ण गंभीर अवस्थेत आहेत. राज्यात १ लाख ३२ हजार रुग्णसंख्येत ६२ टक्के पुरुष तर ३८ टक्के महिला आहेत. राज्यात कोरोनाचे सहा हजारांहून अधिक बळी गेले आहेत. या मृत्यू झालेल्यांमध्ये ६५ टक्के पुरुष व ३५ टक्के महिला आहेत.4500 बालकांना कोरोनासध्या राज्यात १ लाख ३० हजारांहून अधिक कोरोनाच्या रुग्णांची नोंद आहे. त्यापैकी, दहा वर्षांखालील 4525 बालकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. एकूण रुग्णसंख्येत या रुग्णांचे प्रमाण ३.५४ टक्के एवढे आहे. तर११ ते २० वयोगटांतील 8348मुला- मुलींनाही कोरोना झाला आहे. या रुग्णांचे प्रमाण ६.५३% इतके आहे.>प्रयोगशाळांची संख्या १०३राज्यात कोरोना चाचण्यांसाठी प्रयोग शाळांची संख्या १०३ एवढी झाली असून त्यामध्ये ६० शासकीय तर ४३ खासगी प्रयोगशाळा आहेत.२६ मे ते २० जून या कालावधीत प्रयोगशाळांच्या संख्येत ३० ने वाढ झाली असून प्रति दशलक्ष चाचण्यांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. असे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.>राज्यात सर्वाधिक रुग्ण३१ ते ४० वयोगट२५ हजारांहून अधिक२१ ते ३० वयोगट२४ हजार रुग्ण आहेत.४१ ते ५० वयोगट२३ हजार रुग्ण५१ ते ६० वयोगट२२ हजार रुग्ण आहेत.७१ ते ८० वयोगट५ हजार रुग्ण>७८१ रुग्णांची कोरोनावर मातजळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अगदीच झपाट्याने वाढत आहे तर दुसरीकडे रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण गेल्या दहा दिवसांत वाढ झाली आहे. दहा दिवसांत ७८१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे़सरासरी ७८ रुग्ण दररोज बरे होऊन घरी जात आहे़ सद्यस्थितीत सर्वच तालुक्यात उपचार घेणाऱ्यांपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक असून ही बाब जिल्ह्यासाठी दिलासा देणारी मानली जात आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस