शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

CoronaVirus News : राज्यात केवळ पाच टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 04:43 IST

CoronaVirus News : राज्यात ३९ टक्के रुग्ण लक्षणविरहित आहेत. तर राज्यात ५० टक्के रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मात्र राज्यातील केवळ पाच टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याचे राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संचालनालयाच्या अहवालात म्हटले आहे. याशिवाय राज्यात ३९ टक्के रुग्ण लक्षणविरहित आहेत. तर राज्यात ५० टक्के रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.अहवालानुसार, राज्यातील एकूण रुग्णसंख्येपैकी केवळ एक टक्का रुग्ण गंभीर असून पाच टक्के रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. वैद्यकीय शिक्षण व संचालनालय विभागाच्या माध्यमातून राज्यातील कोरोनाच्या सांख्यिक माहितीचा विश्लेषणात्मक अहवाल तयार करण्यात येतो. या अहवालानुसार, राज्यात रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपैकी ८६ टक्के रुग्ण लक्षणविरहित, ११ टक्के रुग्णांना लक्षणे आहेत. तर ३ टक्के रुग्ण गंभीर अवस्थेत आहेत. राज्यात १ लाख ३२ हजार रुग्णसंख्येत ६२ टक्के पुरुष तर ३८ टक्के महिला आहेत. राज्यात कोरोनाचे सहा हजारांहून अधिक बळी गेले आहेत. या मृत्यू झालेल्यांमध्ये ६५ टक्के पुरुष व ३५ टक्के महिला आहेत.4500 बालकांना कोरोनासध्या राज्यात १ लाख ३० हजारांहून अधिक कोरोनाच्या रुग्णांची नोंद आहे. त्यापैकी, दहा वर्षांखालील 4525 बालकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. एकूण रुग्णसंख्येत या रुग्णांचे प्रमाण ३.५४ टक्के एवढे आहे. तर११ ते २० वयोगटांतील 8348मुला- मुलींनाही कोरोना झाला आहे. या रुग्णांचे प्रमाण ६.५३% इतके आहे.>प्रयोगशाळांची संख्या १०३राज्यात कोरोना चाचण्यांसाठी प्रयोग शाळांची संख्या १०३ एवढी झाली असून त्यामध्ये ६० शासकीय तर ४३ खासगी प्रयोगशाळा आहेत.२६ मे ते २० जून या कालावधीत प्रयोगशाळांच्या संख्येत ३० ने वाढ झाली असून प्रति दशलक्ष चाचण्यांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. असे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.>राज्यात सर्वाधिक रुग्ण३१ ते ४० वयोगट२५ हजारांहून अधिक२१ ते ३० वयोगट२४ हजार रुग्ण आहेत.४१ ते ५० वयोगट२३ हजार रुग्ण५१ ते ६० वयोगट२२ हजार रुग्ण आहेत.७१ ते ८० वयोगट५ हजार रुग्ण>७८१ रुग्णांची कोरोनावर मातजळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अगदीच झपाट्याने वाढत आहे तर दुसरीकडे रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण गेल्या दहा दिवसांत वाढ झाली आहे. दहा दिवसांत ७८१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे़सरासरी ७८ रुग्ण दररोज बरे होऊन घरी जात आहे़ सद्यस्थितीत सर्वच तालुक्यात उपचार घेणाऱ्यांपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक असून ही बाब जिल्ह्यासाठी दिलासा देणारी मानली जात आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस