शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

CoronaVirus News: धोका वाढला! १५ जिल्ह्यांमधील कोरोना परिस्थितीनं चिंतेत भर; निर्बंध वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 22:36 IST

CoronaVirus News: देशात आढळून येणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण फक्त ९० जिल्ह्यांमध्ये

नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. सध्या देशातील बऱ्याच राज्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे बाजारपेठा, दुकानं, पर्यटनस्थळांवर गर्दी दिसू लागली आहे. त्यामुळे काही भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं पत्रकार परिषदेच्या माध्यमातून याबद्दलची माहिती दिली. 

देशाचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट २.२५ टक्क्यांवर आला आहे. देशातील परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचं यातून अधोरेखित झालं आहे. मात्र महाराष्ट्र, केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याशिवाय ईशान्येकडील राज्यांमधील स्थिती बिघडल चालली आहे. देशात सध्या आढळून येत असलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण ९० जिल्ह्यांमध्ये आहेत. त्यामुळे ९० जिल्ह्यांमधील स्थिती बिकट असल्याचं समोर आलं आहे.

देशात सध्या आढळून येणाऱ्या एकूण रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण केवळ ९० जिल्ह्यांमधले आहेत. यात महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यानंतर केरळ (१४), तमिळनाडू (१२), ओदिशा (१०), आंध्र प्रदेश (१०), कर्नाटक (१०), आसाम (६), पश्चिम बंगाल (४), मेघालय (२), मणीपूर (२), त्रिपुरा (१), गोवा (१), मिझोरम (१), पुद्दुचेरी (१), अरुणाचल प्रदेश (१) या राज्यांचा क्रमांक लागतो.

देशातील ६६ जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १० टकक्यांहून अधिक आहेत. यातील सर्वाधिक जिल्हे अरुणाचल प्रदेशात आहे. अरुणाचल प्रदेशातील १० जिल्ह्यांमधील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांहून अधिक आहे. त्यानंतर राजस्थान (१०), मणिपूर (९), केरळ (८), मेघालय (६), आसाम (४), त्रिपुरा (३), ओदिशा (३) यांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील २ जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांहून जास्त आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या