शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

CoronaVirus News : धक्कादायक! राज्यात २४ तासांत ३,२१४ नवे रुग्ण सापडले, मृत्यूदर ४.६९ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 05:36 IST

CoronaVirus News : राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५०.०९ टक्के झाले असून मृत्यूदर ४.६९ टक्के आहे. सध्या राज्यात ६२ हजार ८३३ सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबई : राज्यात मंगळवारी दिवसभरात ३ हजार २१४ रुग्णांचे निदान झाले तर ७५ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील रुग्णसंख्या १ लाख ३९ हजार १० झाली असून मृतांचा आकडा ६ हजार ५३१ वर पोहोचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५०.०९ टक्के झाले असून मृत्यूदर ४.६९ टक्के आहे. सध्या राज्यात ६२ हजार ८३३ सक्रिय रुग्ण आहेत.राज्यात मंगळवारी २४८ मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी ७५ मृत्यू मागील ४८ तासांत झाले आहेत, तर उर्वरित १७३ मृत्यू मागील काळातील आहेत. १७३ या मृत्यूंमध्ये मुंबईतील ६५, सोलापूर ४२, औरंगाबाद १५, ठाणे १३, नाशिक १८, जळगाव ७, अमरावती १, बुलडाणा १, कल्याण-डोंबिवली २, मालेगाव १, मीरा-भार्इंदर ३, पिंपरी-चिंचवड १, रत्नागिरी २, सांगली १, सातारा १ यांचा समावेश आहे. तर मागील ४८ तासांत ७५ मृतांमध्ये मुंबई ४२, भिवंडी मनपा १, धुळे मनपा १, पुणे १, पुणे मनपा ८, पिंपरी-चिंचवड मनपा २, सोलापूर मनपा १, सातारा १, सांगली १, रत्नागिरी ४, औरंगाबाद ८, अकोला १, अमरावती मनपा १, यवतमाळ १ आणि बुलडाणा २ या रुग्णांचा समावेश आहे.सध्या मुंबईत ६८ हजार ४१० कोरोना रुग्ण असून ३ हजार ८४४ जणांचे मृत्यू झाले आहेत. ३४ हजार ५७६ जण कोविडमुक्त झाले आहेत, तर २९ हजार ९८२ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात मंगळवारी दिवसभरात १ हजार ९२५ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ६९,६३१ जण कोविडमुक्त झाले.

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस