शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

CoornavIrus News: ...अन् जयंत पाटलांनी भागाकार करत फडणवीसांनी दिलेल्या आकडेवारीचा 'सिलिंडर' फोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 19:11 IST

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आकडेवारीला जयंत पाटील यांच्याकडून आकडेवारीनं प्रत्युत्तर

मुंबई: कोरोना संकटात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना महाविकास आघाडीनं जोरदार प्रत्युत्तर दिलं. शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी पत्रकरार परिषदेच्या माध्यमातून फडणवीस आणि मोदी सरकारचा समाचार घेतला.जबाबदार विरोधी पक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस आणि भाजपा संकट काळात सरकारच्या बाजूनं उभी राहील, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून यंत्रणेचं आणि त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी केली. मजुरांसाठी सोडण्यात येणाऱ्या तिकिटाचा खर्च मुख्यमंत्री निधीतून केला जात आहे. मुख्यमंत्री निधीला फडणवीस यांच्या भाजपानं एका पैशाची मदत केलेली नाही. त्याऐवजी ते पीएम केअर्सला मदत करण्याचं आवाहन करत होते. त्यामुळे भाजपा महाराष्ट्राचा शत्रू आहे की मित्र असा प्रश्न निर्माण होतो. फडणवीस आणि भाजपाच्या नेत्यांनी केलेली ही कृती महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात राहील, असं पाटील म्हणाले.देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आकडेवारीचा जयंत पाटील यांनी खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी उज्ज्वला योजनेतून देण्यात आलेल्या मदतीचा संदर्भ दिला. या योजनेतून ७३ लाख १६ हजार सिलिंडर दिले. त्यावर १ हजार ६२५ कोटी रुपये केंद्रानं खर्च केले, असं फडणवीस यांनी सांगितलं. या रकमेला सिलिंडरच्या संख्येनं भागलं, तर एका सिलिंडरची किंमत २ हजार २२६ रुपये होते. एका सिलिंडरची किंमत इतकी आहे का? मग केंद्राकडून दिलं जाणारं अनुदान कुठे गेलं?, असे सवाल पाटील यांनी विचारले. उत्तर भारतीय मजूर त्यांच्या गावी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व व्यवहार पूर्वपदावर वेळ लागेल, असं देवेंद्र फडणवीस काल बोलून गेले. फडणवीस यांचं विधान म्हणजे महाराष्ट्रातील तरुणांना कमी लेखण्याचा प्रयत्न आहे. राज्यातल्या तरुणांमध्ये आवश्यक कौशल्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्किल इंडिया योजना आणली होती. त्याचा पाच वर्षात काहीच उपयोग झाला नाही? स्थानिक तरुणांमध्ये स्किल नाही, असं फडणवीस यांना म्हणायचं आहे का? मोदींच्या स्किल इंडियावर त्यांना भरवसा नाही का?, असे प्रश्न पाटील यांनी उपस्थित केले."फडणवीस, एका ट्रेनसाठी ५० लाखांचा खर्च कसा आणि कुठून येतो?; जरा आम्हालाही सांगा"फडणवीस, तुम्हाला मोदींवर भरवसा नाय का? जयंत पाटलांचा माजी मुख्यमंत्र्यांना चिमटाविरोधकांकडून सरकारला बदनाम करायचं काम; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल"काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्येही राहुल गांधींचं ऐकत नाही"

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJayant Patilजयंत पाटीलAnil Parabअनिल परबBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात