शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: 'राज्यात लॉकडाऊनची स्थिती येतेय, त्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार’, विजय वडेट्टीवार मोठं विधान  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 16:05 IST

Coronavirus in Maharashtra: राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊनच्या शक्यतेबाबत राज्य सरकारमधील मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सूचक संकेत दिले आहेत.

मुंबई - महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या दैनंदिन वाढ ही चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. दरदिवशी कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत जवळपास दुपटीने वाढ होऊ लागल्याने आरोग्य यंत्रणेसह राज्य सरकारची झोप उडाली आहे. काल राज्यात कोरोनाचे पाच हजारांहून अधिक रुग्ण सापडले, त्यामुळे आता राज्यात नुकत्याच सुरू झालेल्या शाळा बंद होणार का, मुंबईतील लोकलसेवेवर मर्यादा येणार का, लॉकडाऊन लागणार का, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊनच्या शक्यतेबाबत राज्य सरकारमधील मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सूचक संकेत दिले आहेत. राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊनची स्थिती निर्माण होत आहे. मात्र लॉकडाऊनबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.   

याबाबत विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील सध्याची कोरोनाची परिस्थिती विस्फोटक आहे. रुग्णवाढीचा आलेख वेगाने वाढत आहे. रुग्णदुप्पटीचा वेग एका दिवसावर आला आहे. रुग्णवाढीचा झपाटा पाहता जर आपण वेळीच निर्बंध घातले नाहीत तर राज्यात जानेवारी आणि एप्रिलमध्ये विस्फोटक परिस्थिती निर्माण होईल. तसेच ज्या वेगाने हा आजार पसरतोय ते पाहता आता नियम पाळण्याची जबाबदारी जनतेवर आहे. जर नियम पाळले गेले नाहीत तर लॉकडाऊनला पर्याय उरणार नाही. त्यामुळे निमय पाळायचेत की पाळू नये, हे लोकांनी ठरवावं. लोकल काही काळापूर्वीच सुरू केल्यात आणि रुग्णवाढ झाली. आता तिसरी लाट आली आहे. आता पुन्हा एकदा लोकल आणि शाळांबाबत निर्णय घेण्यात येईल तो सगळ्यांचा विचार करूनच. लॉकडाऊनची स्थिती आता येत आहे ते कधी करायचं याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील.

दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णसंख्येने गुरुवारी पाच हजारांचा आकडा पार केला, तर सक्रिय रुग्णसंख्याही १८,२१७ वर पोहोचली आहे. राज्यात ५,३६८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, २२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात दिवसभरात १,१९३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, एकूण ६५,०७,३३० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५५ टक्के, तर मृत्युदर २.१२ टक्के झाला आहे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,७०,७५४ झाली असून, मृतांचा आकडा १ लाख ४१ हजार ५१८ इतका आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारOmicron Variantओमायक्रॉन