शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

Coronavirus: 'राज्यात लॉकडाऊनची स्थिती येतेय, त्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार’, विजय वडेट्टीवार मोठं विधान  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 16:05 IST

Coronavirus in Maharashtra: राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊनच्या शक्यतेबाबत राज्य सरकारमधील मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सूचक संकेत दिले आहेत.

मुंबई - महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या दैनंदिन वाढ ही चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. दरदिवशी कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत जवळपास दुपटीने वाढ होऊ लागल्याने आरोग्य यंत्रणेसह राज्य सरकारची झोप उडाली आहे. काल राज्यात कोरोनाचे पाच हजारांहून अधिक रुग्ण सापडले, त्यामुळे आता राज्यात नुकत्याच सुरू झालेल्या शाळा बंद होणार का, मुंबईतील लोकलसेवेवर मर्यादा येणार का, लॉकडाऊन लागणार का, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊनच्या शक्यतेबाबत राज्य सरकारमधील मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सूचक संकेत दिले आहेत. राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊनची स्थिती निर्माण होत आहे. मात्र लॉकडाऊनबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.   

याबाबत विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील सध्याची कोरोनाची परिस्थिती विस्फोटक आहे. रुग्णवाढीचा आलेख वेगाने वाढत आहे. रुग्णदुप्पटीचा वेग एका दिवसावर आला आहे. रुग्णवाढीचा झपाटा पाहता जर आपण वेळीच निर्बंध घातले नाहीत तर राज्यात जानेवारी आणि एप्रिलमध्ये विस्फोटक परिस्थिती निर्माण होईल. तसेच ज्या वेगाने हा आजार पसरतोय ते पाहता आता नियम पाळण्याची जबाबदारी जनतेवर आहे. जर नियम पाळले गेले नाहीत तर लॉकडाऊनला पर्याय उरणार नाही. त्यामुळे निमय पाळायचेत की पाळू नये, हे लोकांनी ठरवावं. लोकल काही काळापूर्वीच सुरू केल्यात आणि रुग्णवाढ झाली. आता तिसरी लाट आली आहे. आता पुन्हा एकदा लोकल आणि शाळांबाबत निर्णय घेण्यात येईल तो सगळ्यांचा विचार करूनच. लॉकडाऊनची स्थिती आता येत आहे ते कधी करायचं याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील.

दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णसंख्येने गुरुवारी पाच हजारांचा आकडा पार केला, तर सक्रिय रुग्णसंख्याही १८,२१७ वर पोहोचली आहे. राज्यात ५,३६८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, २२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात दिवसभरात १,१९३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, एकूण ६५,०७,३३० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५५ टक्के, तर मृत्युदर २.१२ टक्के झाला आहे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,७०,७५४ झाली असून, मृतांचा आकडा १ लाख ४१ हजार ५१८ इतका आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारOmicron Variantओमायक्रॉन