शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Coronavirus, Lockdown News: प्रतिबंधित क्षेत्र वगळून आजपासून राज्यात मद्यविक्री; राज ठाकरेंच्या सूचनेला सरकारचा प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 07:21 IST

मुंबई एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिका, मालेगाव महापालिका, पुणे महापालिका, पुणे पीएमआर क्षेत्र आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील दारूनिर्मिती कारखाने बंद राहतील.

मुंबई : राज्यातील समस्त मद्यप्रेमींसाठी गुड न्यूज आहे. मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश आणि मालेगावमधील प्रतिबंधित (कंटेनमेंट) क्षेत्र वगळता राज्यात सोमवारपासून दारू दुकाने सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. याबाबत प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी रविवारी पत्रकारांना सांगितले की, हॉटेल, रेस्टॉरंट, बीअर बार मात्र पूर्वीप्रमाणेच बंद राहतील.

दारूच्या दुकानांवर गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागेल. सोशल डिस्टन्सिंगबरोबर (सहा फुटांचे अंतर) एकावेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात असणार नाहीत, हे नियम पाळावे लागणार आहेत. रेड, आॅरेंज व ग्रीन या तिन्ही झोनमध्ये बाजारपेठा व मॉलमध्ये नसलेल्या, स्वतंत्र अशा दारूच्या दुकानांना परवानगी राहणार आहे. मात्र, कंटेनमेंट झोनमध्ये (प्रतिबंधित क्षेत्र) मद्यविक्रीस बंदी असेल. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच हा निर्णय घेण्यात आला आहे, असे गगराणी यांनी स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाउनची मुदत दोन आठवडे वाढवितानाच आॅरेंज आणि ग्रीन झोनमध्ये दारू विक्रीला परवानगी दिल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे रेड झोनमधील तळीरामांमध्ये काहीशी निराशा होती. त्यानंतर पुन्हा तिन्ही झोनमध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने काल रात्री दारू विक्रीची परवानगी दिली. मात्र, राज्य शासनाने त्याआधीच एक आदेश काढून रेड झोन आणि कंटेनमेंट झोनमध्ये दारू विक्रीला मनाई केली होती. अखेर रेड झोनमध्ये आणि पालिका क्षेत्रातही (कंटेनमेंट वगळता) दारू विक्रीला परवानगी देण्यात आली आहे.

उत्पादन शुल्क विभागाने रात्री एक परिपत्रक काढून दारू विक्रीची दुकाने सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सुरू राहतील, असे स्पष्ट केले. दारू दुकानात येणाऱ्या ग्राहकांचे थर्मल स्कॅनिंग केले जाईल. सर्दी, खोकला, ताप असलेल्या ग्राहकाला दुकानात प्रवेश दिला जाणार नाही.

मुंबई एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिका, मालेगाव महापालिका, पुणे महापालिका, पुणे पीएमआर क्षेत्र आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील दारूनिर्मिती कारखाने बंद राहतील. त्याव्यतिरिक्त असलेल्या शहरी भागातील औद्योगिक वसाहती व औद्योगिक टाउनशिपमधील दारू निर्मिती कारखाने सुरू राहतील. ग्रामीण भागातील दारू उत्पादक कारखाने सुरू राहतील. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात दारू विक्री सुरू करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी केली होती, तसेच अभिनेता ऋषी कपूर यांनी निधनाच्या काही दिवस आधी या मागणीचे टष्ट्वीट केले होते.दारू उत्पादनाचे कारखाने आणि विक्रीची दुकाने बंद असल्यामुळे १८ मार्चपासून ३ मेपर्यंत राज्य शासनाचा उत्पादन शुल्क व विक्री करापोटीचा ३ हजार कोटी रुपयांचा महसूल बुडाला. त्यात उत्पादन शुल्क १,७६८ कोटी रुपये इतके बुडाले, तर १,२३२ कोटी रुपये इतक्या विक्री करावर पाणी सोडावे लागले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस