शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

Coronavirus Lockdown: लॉकडाऊन? नको रे बाबा! त्यापेक्षा नियम पाळू; गरिबांच्या पोटावर पाय कशाला देता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2021 06:09 IST

मिशन बिगिन अगेनमुळे सुरू झालेले दैनंदिन अर्थव्यवहार कोरोनाविषयात नियमांचे पालन करून कोणत्याही परिस्थितीत न थांबविता सुरू ठेवावेत, अशी मागणी विविध स्तरातून व्यक्त होत आहे. पूर्ण लॉकडाऊन केल्यास त्याचा थेट फटका हा हातावर पोट असलेल्या गरिबांना सर्वाधिक बसतो. त्यामुळे निर्बधांची कडक अंमलबजावणी करून कोरोना आटोक्यात आणावा, असा सूर लोकमतच्या पाहणीत दिसला.

लॉकडाऊन अजून जाहीर झालेला नाही, पण तो होईल या भीतीनेच अनेकांना आता कापरे भरले आहे. मागचा अनुभव गाठीशी असल्याने लॉकडाऊन नको त्यापेक्षा नियम पाळू, अशी पक्की मानसिकता पुणेकराची आहे. मागीलवर्षी मार्चच्या याच काळात लॉकडाऊन जाहीर झाला. तोही थेट २१ दिवसांचा. उद्योजकांपासून ते हातावरचे पोट असलेल्या गरीब कष्टकऱ्यापर्यंत सर्वांनाच झळा बसल्या. आता कोरोना रुग्ण वाढल्यावर पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाल्याने लोकांच्या पोटात गोळा आला आहे.

नियम पाळणार नाहीत त्यांना दंड करा पुण्यात ६ हजार लहान-मोठी रेस्टॉरंट आहेत. किमान ५ कर्मचारी धरले तरी ३ लाख गरीब कर्मचारी या लॉकडाऊनने बेरोजगार होतील. कर्जाचे ओझे घेऊन आम्ही कसातरी व्यवसाय करतो आहोत, तर पुन्हा बंद नको. आम्ही नियम पाळतोच, इतरांनी ते पाळायला हवे.  - गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट अँन्ड हॉटेलिअर्स असोसिएशन.

लॉकडाऊन हा उपाय नाही हे कधीतरी प्रशासनाच्या लक्षात यायला हवे. उद्योग बंद करायचे म्हणजे त्याचा परिणाम थेट अर्थकारणावर होतो. लॉकडाऊन केला तर कोरोना पळून जाणार आहे का?, याचे उत्तर नाही असताना कशासाठी हा प्रयत्न केला जात आहे. त्यापेक्षा कडक निर्बंध लागू करा. ते पुरेसे होईल.     - सुधीर मेहता, अध्यक्ष, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड अँग्रीकल्चर इंडस्ट्री

आर्थिक गाडा विस्कटू नये

नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहे. राज्यातील इतर काही जिल्ह्यातील परिस्थितीही बिघडत चालली आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन तर लागू होणार नाही ना, अशी भीती सगळ्यांच्याच मनात आहे. मागचा अनुभव लक्षात घेता कडक लॉकडाऊन नकोच, अशी एकूणच भूमिका व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची आहे. 

कोरोना नियंत्रणात यावा, असे सर्वांनाच वाटते. त्यासाठी लोकांना शिस्त लावा, सर्व यंत्रणा कामाला लावा, आणखी कडक उपाय करा, पण पुन्हा कडक लॉकडाऊन नको, असे विविध क्षेत्रातील मान्यवरांचे म्हणणे आहे. नागपुरात गेल्या सात दिवसांचे कडक निर्बंध व आता शिथीलतेसह निर्बंध सुरू असताना कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. यामागे, ‘ट्रेसिंग’ होत नसल्याचे कारण आहे. 

लहान व्यापारी आधीच डबघाईस आला. तो पुन्हा उभा राहत आहे. पुन्हा लॉकडाऊन लागला तर व्यापारी पूर्णपणेच संपतील.- प्रभाकर देशमुख, अध्यक्ष, नागपूर चिल्लर किराणा असोसिएशन.

ट्रिटमेंटवर हवा भरनागपुरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. ही चिंताजनक बाब आहे. यासाठी ट्रेसिंग व ट्रिटमेंटवर अधिक भर देण्याची गरज आहे.- डॉ. नितीन शिंदे, संसर्गजन्य आजार तज्ज्ञ

लॉकडाऊनमध्ये गरीब, मजूर, कष्टकरी लोकांचे मोठे हाल झाले. देशातील १२ कोटी लोकांचा राेजगार गेला. कोट्यवधी लोक देशोधडीला लागले. पुन्हा ती वेळ येऊ देऊ नका.- विलास भोंगाडे, असंघटित क्षेत्रातील कामगारांचे नेते.

 

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस