शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Live updates: नांदेड, बीडमध्ये लॉकडाऊन तर परभणीत संचारबंदी; मराठवाड्यात कडक उपाययोजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 03:57 IST

कोरोना साखळी तोडण्याचे आव्हान

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने फैलावत असून मराठवाड्यात रुग्णसंख्या कमालीची वाढली आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत प्रशासनाने कठोर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मराठवाड्यातील नांदेड, बीड आणि परभणी या जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. औरंगाबादमध्ये अंशत: संचारबंदी असून शनिवार आणि रविवारी मात्र कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.       

नांदेडात २५ मार्चपासून लॉकडाऊन नांदेड जिल्ह्यात  दररोज साधारणत: हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळत असून सरासरी दहा जणांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात २५ मार्च ते ४ एप्रिल यादरम्यान लॉकडाऊन लावण्यात आला आहे. याआधी दुकाने सायंकाळी ७ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर ही वेळ सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात आली होती. मात्र आता परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने किराणा दुकाने दुपारी १२ वाजेपर्यंतच उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. इतर सर्व व्यवहार मात्र बंदच राहणार आहेत. 

बीड जिल्ह्यात १० दिवस लॉकडाऊनबीड जिल्ह्यात २५ मार्चच्या रात्री बारा वाजेपासून ते ४ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात संपूर्णपणे लॉकडाऊन असेल. या काळात शासकीय कार्यालये वगळता इतर सर्व खासगी कार्यालये बंद राहतील. बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यासाठी किंवा येण्यासाठी अँटिजेन टेस्ट किंवा आरटीपीसीआर बंधनकारक असेल, अशा सूचना जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जारी केल्या आहेत. 

या दहा दिवसात जिल्ह्यातील क्रीडा संकुल, जिम, स्विमिंग पूल, उपाहारगृह, हॉटेल, रेस्टॉरंट, बार बंद राहतील. शाळा महाविद्यालय, प्रशिक्षण संस्था, शिकवण्या बंद असतील. सार्वजनिक, खासगी वाहने, दुचाकी, चारचाकी वाहने बंद असतील. सर्व प्रकारची बांधकामे, चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंद राहतील. मंगल कार्यालय, हॉल, स्वागत समारंभ, सर्व धार्मिक स्थळे, सार्वजनिक प्रार्थनास्थळ, खासगी कार्यालये बंद असतील.

परभणी जिल्ह्यात १ एप्रिलपर्यंत संचारबंदी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता परभणी जिल्ह्यातही कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्ह्यात १ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. बुधवारी सायंकाळी ७ वाजेपासून संचारबंदी सुरू झाली असून, १ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदीचा अंमल राहणार आहे. संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवांना सूट दिली असून, या सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. 

मराठवाड्यातील स्थितीनांदेड - २५ मार्च ते ४ एप्रिल कडक लॉकडाऊन बीड - २६ मार्च ते ४ एप्रिल कडक लॉकडाऊन परभणी - २४ मार्च ते १ एप्रिल संचारबंदी, अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद.   औरंगाबाद - रात्रीची संचारबंदी रात्री ८ ते सकाळी ६, शनिवार व रविवार कडकडीत बंद लातूर - रात्रीची संचारबंदी रात्री ८ ते पहाटे ५  जालना - सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत बाजारपेठ खुली ठेवण्यास परवानगी.  उस्मानाबाद - रात्रीची संचारबंदी सायंकाळी ७ ते पहाटे ५. प्रत्येक रविवारी जनता कर्फ्यू हिंगोली - रात्रीची संचारबंदी सायंकाळी ७ ते पहाटे ५

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस