शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

Coronavirus: दहावीचा शेवटचा पेपर होणार की नाही?; विद्यार्थी, पालकांची धाकधूक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 20:18 IST

21 दिवसांच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर पेपरवर अनिश्चिततेचे सावट

मुंबई: राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दहावीच्या परीक्षेतील शेवटचा भूगोलाचा पेपर शालेय शिक्षण विभागाकडून 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. 31 मार्चनंतर याबाबतीत निर्णय घेतला जाणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले असले तरी सोमवारी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर या पेपरवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. या पार्श्वभूमीवर दहावीला असणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांची धाकधूक वाढली आहे. 

सुरुवातीला नववी आणि अकरावीच्या परीक्षा 15 एप्रिलनंतर घेण्यात येतील आणि भूगोलाच्या पेपरचा निर्णय 31 मार्चनंतर घेण्यात येईल असे शिक्षणमंत्र्यांकडून घोषित करण्यात आले होते. मात्र सोमवारी करण्यात आलेल्या देशभरातील लॉकडाऊनच्या घोषणेनंतर या परीक्षा होतील की नाही किंवा घ्याव्यात की नाही असा प्रश्न पालक, विद्यार्थी, शिक्षक साऱ्यांपुढे उभा राहिला आहे. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर सीईटी सेलकडून होणारी 13 ते 23 एप्रिल दरम्यान होणारी परीक्षादेखील पुढे ढकलण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपर होईल की नाही असा गोंधळ आणि चर्चा पालकांमध्ये रंगली आहे. 

राज्य शिक्षण मंडळाने ज्या विषयांची परीक्षा झाली आहे, त्याच विषयाचे गुण ग्राह्य धरीत निकाल लावावा, 40 गुणांसाठी पुन्हा विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये असे मत सह्याद्री, कांदिवली येथे राहणारे पालक मंगेश कळंबे यांनी व्यक्त केले. तर आता पेपर होईल की नाही याबाबत आम्हाला शंकाच आहे, मात्र आम्ही एका विषयाचाच अभ्यास किती दिवस करत राहायचा असा सवाल दहावीच्या सुमेध रहाटे याने उपस्थित केला. 

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या मूल्यांकनाच्या सरासरी गुणांवर त्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यावा असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. असाच निर्णय दहावीच्या भूगोलाच्या पेपरच्या बाबतीत घेता येईल का याची चाचपणी शिक्षण विभागाने करावी असा सूर पालकांमधून येत आहे. राज्यातील परिस्थिती गंभीर आहे. शिक्षण विभागाच्या बेजबाबदारपणामुळे आधीच पालक विद्यार्थ्यांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता हा उरलेला पेपर घ्यायचाच हा हट्ट करण्यात अर्थ नाहीच. या ऐवजी योग्य निर्णय घेऊन वेळीच पालक विद्यार्थ्यांना दिलासा कसा देता येईल याच्या उपाय योजनांकडे शिक्षण विभागाने आता तरी लक्ष द्यावे अशी प्रतिक्रिया हंसराज मोरारजी पब्लिक स्कुलचे शिक्षक उदय नरे यांनी दिली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसssc examदहावी