शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

Coronavirus: दहावीचा शेवटचा पेपर होणार की नाही?; विद्यार्थी, पालकांची धाकधूक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 20:18 IST

21 दिवसांच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर पेपरवर अनिश्चिततेचे सावट

मुंबई: राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दहावीच्या परीक्षेतील शेवटचा भूगोलाचा पेपर शालेय शिक्षण विभागाकडून 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. 31 मार्चनंतर याबाबतीत निर्णय घेतला जाणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले असले तरी सोमवारी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर या पेपरवर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. या पार्श्वभूमीवर दहावीला असणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांची धाकधूक वाढली आहे. 

सुरुवातीला नववी आणि अकरावीच्या परीक्षा 15 एप्रिलनंतर घेण्यात येतील आणि भूगोलाच्या पेपरचा निर्णय 31 मार्चनंतर घेण्यात येईल असे शिक्षणमंत्र्यांकडून घोषित करण्यात आले होते. मात्र सोमवारी करण्यात आलेल्या देशभरातील लॉकडाऊनच्या घोषणेनंतर या परीक्षा होतील की नाही किंवा घ्याव्यात की नाही असा प्रश्न पालक, विद्यार्थी, शिक्षक साऱ्यांपुढे उभा राहिला आहे. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर सीईटी सेलकडून होणारी 13 ते 23 एप्रिल दरम्यान होणारी परीक्षादेखील पुढे ढकलण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपर होईल की नाही असा गोंधळ आणि चर्चा पालकांमध्ये रंगली आहे. 

राज्य शिक्षण मंडळाने ज्या विषयांची परीक्षा झाली आहे, त्याच विषयाचे गुण ग्राह्य धरीत निकाल लावावा, 40 गुणांसाठी पुन्हा विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये असे मत सह्याद्री, कांदिवली येथे राहणारे पालक मंगेश कळंबे यांनी व्यक्त केले. तर आता पेपर होईल की नाही याबाबत आम्हाला शंकाच आहे, मात्र आम्ही एका विषयाचाच अभ्यास किती दिवस करत राहायचा असा सवाल दहावीच्या सुमेध रहाटे याने उपस्थित केला. 

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या मूल्यांकनाच्या सरासरी गुणांवर त्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यावा असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. असाच निर्णय दहावीच्या भूगोलाच्या पेपरच्या बाबतीत घेता येईल का याची चाचपणी शिक्षण विभागाने करावी असा सूर पालकांमधून येत आहे. राज्यातील परिस्थिती गंभीर आहे. शिक्षण विभागाच्या बेजबाबदारपणामुळे आधीच पालक विद्यार्थ्यांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता हा उरलेला पेपर घ्यायचाच हा हट्ट करण्यात अर्थ नाहीच. या ऐवजी योग्य निर्णय घेऊन वेळीच पालक विद्यार्थ्यांना दिलासा कसा देता येईल याच्या उपाय योजनांकडे शिक्षण विभागाने आता तरी लक्ष द्यावे अशी प्रतिक्रिया हंसराज मोरारजी पब्लिक स्कुलचे शिक्षक उदय नरे यांनी दिली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसssc examदहावी