शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus कोरोनाचे बुमरँग चीनवरच उलटणार; जगासाठी भारत 'बाजीगर' ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 07:35 IST

पद्मश्री मिलिंद कांबळे यांचा अंदाज. पायाभूत सुविधांवर लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे.

पुणे : कोरोनामुळे चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या अनेक वस्तूंचा पुरवठा थांबला असून, संपूर्ण बाजारसाखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे पुढील काळात अनेक देश व कंपन्यादेखील आपले एका देशावर असलेले अवलंबित्व कमी करण्यासाठी सक्षम पर्याय शोधतील. याचाच फायदा घेत भारत हा युरोप, अमेरिकेला विविध वस्तूंचा पुरवठा करणारा देश म्हणून पुढे येईल. त्या दृष्टीने आवश्यक पायाभूत सुविधांच्या उभारणीवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजचे (डिक्की) अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मांडले.

कोरोनामुळे जगभर पुरवठासाखळी खंडीत झाल्याने अनेक उद्योगधंदे ठप्प पडले आहेत. अमेरिका, युरोप आणि भारतासह अनेक कंपन्यांनी चीनमध्ये गुंतवणूक केली आहे. स्टील, इलेक्ट्रॉनिक, मोटार, रिटेल, रसायन, औषध आणि औषधाचा कच्चा माल, घरगुती वापराच्या वस्तू, लेदर उत्पादनांचा त्यात समावेश आहे. इलेक्ट्रॉनिक, रसायन, चामडे अशा वस्तूंची मोठ्या प्रमाणावर भारतात आयात होते. ही ठप्प झाली आहे. त्यामुळे एका लेदर कंपनीने मुंबईतील एका लघु-मध्यम कंपनीला प्राधान्यक्रमाचा विक्रेत्याची पसंती देत अवघ्या २० दिवसांत नोंदणीची प्रक्रिया पार पाडली.

कोरोनामुळे चीनविषयी अढी निर्माण झाल्याचा फायदा भारताला होऊ शकतो. चीनमधून ज्या वस्तू व सेवांचा पुरवठा युरोप व अमेरिकन उपखंडात होतो त्यातील कोणत्या गोष्टी आपण करू शकतो, हे पाहून सरकारने धोरण आखले पाहिजे. कोरोनामुळे भारतालादेखील हे वर्ष मंदीचेच राहील. पुढील आर्थिक वर्षापासून त्यात सुधारणा होईल, अशी आशा कांबळे यांनी व्यक्त केली.

खेळत्या भांडवलासाठी नेमके आदेश हवेतरिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने काही सवलती जाहीर केल्या आहेत. त्यात कर्ज हप्त्यांना ३ महिने स्थगिती दिली आहे. उद्योगांना या काळात खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते. असे भांडवल देण्याची जबाबदारी मात्र बँकांवर सोपविली आहे. त्याबाबत स्पष्ट निर्देश देण्याची गरज आहे. खेळते भांडवल देण्याची मर्यादा २० टक्क्यांवरून ४० टक्के करावे, लघु उद्योगांना व्याजदरातही २ ऐवजी ५ टक्के सूट द्यावी, वीज दरात सवलत द्यावी, अशा मागण्याही कांबळे यांनी केल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतchinaचीनbusinessव्यवसाय