शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

Coronavirus: प्रदूषण घटल्याने वाढतोय गारांचा आकार; लॉकडाउनचा सकारात्मक परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 01:58 IST

राज्याच्या हवामानात सातत्याने बदल होत असून, हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता कायम आहे.

मुंबई : महाराष्ट्रात ठिकठिकाणी गारपीट होत असून, लॉकडाउनमुळे प्रदूषण कमी झाल्याने या गारांचा आकार पूर्वीपेक्षा वाढला आहे. परिणामी, येत्या काळात शेती व पूर नियंत्रणासाठी पूर्व नियोजन आवश्यक आहे, असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

राज्याच्या हवामानात सातत्याने बदल होत असून, हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता कायम आहे. दुसरीकडे लॉकडाउनमुळे बहुतेक व्यवहार बंद आहेत. त्यामुळे हवा प्रदूषित करणारे घटक उत्सर्जित होत नाहीत. परिणामी, मुंबईसह बहुतेक शहरांमधील हवेचा दर्जा समाधानकारक नोंदविण्यात येत आहे.हवामान तज्ज्ञांनी सांगितले की, भौगोलिक परिस्थितीनुसार, उत्तरोत्तर गारांच्या आकारात वाढ होण्याची शक्यता असून, विखुरलेल्या विस्तृत स्वरूपात अशी गारपीट होण्याची शक्यता आहे.

लॉकडाउनमुळे संपूर्ण आशिया खंडात हवामानात मोठे बदल होतील. महाराष्ट्रातदेखील अशीच स्थित्यंतरे व बदल होत असल्याचे निदर्शनास येत आहे. संपूर्ण देशभरात ही प्रक्रिया पाहण्यास मिळेल. अनेक घटनांच्या अभ्यासाने आपण हे निष्कर्ष अधिक बळकटपणे सिद्ध करू शकतो. मात्र, तर्कसंगत किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करता असे होऊ शकते हे स्पष्ट आहे. कारण आजघडीला लॉकडाउनमुळे देशासह राज्यभरातील औद्योगिक क्षेत्र बंद असल्याने प्रदूषण अत्यंत कमी झाले आहे. प्रदूषणातील जे धूलिकण असतात ते जेव्हा जास्त प्रमाणात असतात, त्या वेळी ढगनिर्मिती प्रक्रियेत मोठे अडथळे येतात. परिणामी, ढग विरून जाऊन लवकर नष्ट होतात. ढगांची संख्या, आकार व उंची कमी झाल्याने पाण्याच्या थेंबाचे आकार व प्रमाण, गारांचे प्रमाण व आकार किंवा पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे औद्योगिक क्रांतीनंतर पाऊस व मान्सूनचा पॅटर्न सातत्याने बदलत गेल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले.बीकेसी, चेंबूरची हवा सुधारलीलॉकडाउनमुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. परिणामी, मुंबई शहराच्या हवेतील प्रदूषणाच्या पातळीत १७ मार्चपासूनच घट झाल्याचे समोर आले आहे. लॉकडाउनमुळे हवा प्रदूषित करणारे घटक नियंत्रणात असल्याने मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी हवेची गुणवत्ता सुधारत आहे. बीकेसी, चेंबूर, माझगाव आणि चेंबूरसारख्या परिसरातील हवेची गुणवत्ता चांगली नोंदविण्यात येत आहे. यापूर्वी बीकेसी आणि चेंबूर येथील हवा सातत्याने खराब नोंदविण्यात आली होती. बिझनेस हब म्हणून ओळख असलेल्या बीकेसीने तर प्रदूषणाचा स्तर केव्हाच ओलांडला होता. मात्र, आता लॉकडाउनचा फायदा येथील प्रदूषण कमी करण्यासाठी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.आवळा, टोमॅटोएवढ्या गारामहाराष्ट्रात येत्या काळात गारांचा आकार वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात ज्या गारा पडत होत्या किंवा पडत आहेत त्याचा आकार साबुदाणा किंवा फार तर वाटण्याएवढा होता. मात्र, आता जेव्हा महाराष्ट्रात गारपीट होईल तेव्हा गारांचा आकार आवळ्याच्या आकाराचा किंवा कदाचित टोमॅटोएवढाही असू शकतो. अशा गारा पडण्याची शक्यता वातावरणातील तापमान, वाºयाचा उर्ध्वझोत व भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात असेच होईल, असे आपण म्हणू शकत नाही. यावर्षी मे ते जूनअखेर या काळात गारपीटसह जोरदार पूर्वमान्सूनची शक्यता आहे. त्यामुळे आपण विशेषत: शेतीची काळजी घेण्याची गरज आहे. - किरणकुमार जोहरे,हवामान तज्ज्ञ

टॅग्स :Rainपाऊसcorona virusकोरोना वायरस बातम्या