शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
2
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
3
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
4
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
5
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
6
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
7
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
8
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
9
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
11
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
12
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
13
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
14
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
15
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
16
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
17
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
18
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
19
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
20
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!

coronavirus: निर्बंध शिथिल केले, तर मुंबईत कोरोना केसेस वाढण्याची भीती - मुख्यमंत्री ठाकरे  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 05:58 IST

महापौर बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आदी उपस्थित होते.

मुंबई : लॉकडाऊनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपत असून १८ तारखेपासून जर निर्बंध शिथिल करीत सर्व व्यवहार सुरळीत केले, तर मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या ५० हजारांवर जाईल, अशी भीती स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केली.महापौर बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आदी उपस्थित होते. तिसऱ्या टप्प्यानंतर राज्यातील लॉकडाऊन उठवता येईल का, यावर चर्चा झाली. काही मंत्र्यांनी त्याबद्दल अनुकुलता दर्शविली; मात्र कोणत्याही परिस्थितीत मुंबई, पुणे, औरंगाबाद, मालेगाव या भागात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन उठवू नये, यावर सर्वांचे एकमत होते. १७ मे नंतर केंद्र सरकार काय निर्णय घेते, हे पाहून राज्यात उर्वरित ठिकाणी लॉकडाऊनबाबात निर्णय घ्यावा, असे बैठकीत ठरले.वैद्यकीय यंत्रणा कोरोनाशी कशा रीतीने मुकाबला करीत आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था, परराज्यातील मजुरांचे त्यांच्या राज्यात ने आण करण्याची व्यवस्था, त्यातील येणाºया अडचणी याविषयी सविस्तर चर्चा झाली. राज्यात २० एप्रिलनंतर ग्रीन व आॅरेंज झोनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणून उद्योग- व्यवसायांना सुरु करण्यात आले आहेत.त्यानुसार ६५ हजार उद्योगांना परवानगी देण्यात आली असून ३५ हजार उद्योग सुरु झाले आहेत तसेच ९ लाख कामगार रुजू झाल्याचेही सांगण्यात आले.विजेचा वापर ५० टक्क्यांपर्यंतपश्चिम बंगालचा अपवाद वगळता इतर राज्यांमध्ये रेल्वेने परप्रांतीय मजूर पाठविणे सुरु आहे. उद्योग सुरू झाल्याने औद्योगिक घटकाकडून विजेचा वापर ५० टक्क्यांपर्यंत वाढला गेला आहे. तसेच परराज्यातील कामगार परत गेल्याने उद्योगांना कामगार पुरविण्यासाठी कामगार ब्युरो कार्यरत करण्यात आला आहे, अशी माहितीही देण्यात आली.लॉकडाऊनमुळे राज्यातील साखर उद्योगासंमोर आव्हान उभे ठाकले आहे. याबाबत आपण पंतप्रधानांना पत्र लिहून मार्ग काढण्याची विनंती केल्याची माहितीही शरद पवार यांनी दिली.लॉकडाऊन संपल्यानंतर १८ मेपासून सर्व व्यवहार सुरळीत केल्यास महाराष्टÑाची राजधानी मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ५० हजारांच्यावर जाण्याची भीती आहे. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईUddhav Thackerayउद्धव ठाकरे