शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
3
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
4
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
5
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
6
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
7
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
8
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
9
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण
10
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
11
'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं
12
गौरव मोरे ते स्पृहा जोशी; मराठमोळ्या या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
13
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
14
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
15
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
16
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
17
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
18
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
19
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
20
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस

coronavirus : नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे कोरोनाविरोधातील लढाई हरले तर जिंकणार कोण?

By बाळकृष्ण परब | Published: April 15, 2020 2:10 PM

उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी कोरोनाविरोधातील ही लढाई हरले तर काय होईल? याचा विचार कधी केलाय का?

ठळक मुद्देकोरोना विषाणूवरून आता राजकारण आणि आरोप प्रत्यारोपांनाही जोर आला आहेफेकन्यूज, अफवा पसरवल्या जात आहे. त्यातून आधीच असलेल्या संकटात नव्या समस्यांची भर पडत आहेउद्धव ठाकरे ही लढाई हरले तर राज्य हरेल आणि मोदी या लढाईत पराभूत झाले तर संपूर्ण राष्ट्र पराभूत होईल

- बाळकृष्ण परब एकीकडे राज्यात आणि देशभरामध्ये कोरोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस अधिकाधिक भयानक रूप घेत आहे. तर दुसरीकडे या कोरोना विषाणूवरून आता राजकारण आणि आरोप प्रत्यारोपांनाही जोर आला आहे. विशेषतः फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियावर  या आरो-प्रत्यारोपांनी अत्यंत हीन पातळी गाठली आहे. विशेषतः आपल्या महाराष्ट्रात नुकत्याच घडलेल्या काही राजकीय घडामोडींची पार्श्वभूमी ताजी असल्याने आरोप-प्रत्यारोपांची धार अधिकच तीव्र आहे. कोरोनाविरोधातील लढाईत आपला नेताच कसे कुशल नेतृत्व करतोय आणि विरोधी नेता कसा अपयशी ठरतोय, हे दाखवण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. यामध्ये सर्वच राजकीय पक्षांचे समर्थक आघाडीवर आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे समाजात विचारवंत आणि इतर जबाबदार क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीही आपल्या सोईप्रमाणे संबंधितांची तळी उचलत आहेत. त्यामुळे आधीच कोरोना विषाणूमुळे भौतिक जग दूषित झाले असताना सोशल मीडियावरचे वैचारिक जगही परस्पर द्वेषाने प्रदूषित झाले आहे. अशा परिस्थितीत आपण, आपले राज्य आणि अंतिमतः आपला देश कोरोनासारख्या महाभयंकर आपत्तीविरोधातील लढाई कशी काय जिंकणार, हा यक्षप्रश्नच आहे.

एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कठीण परिस्थितीत राज्याची धुरा समर्थपणे वाहत आहेत. तर मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारही कोरोनाविरोधात युद्धपातळीवर तयारी करून सज्ज झाले आहे. राज्य, देशास संपूर्ण जगावर आलेल्या या आपत्तीचा सामना करण्यासाठी आपण योग्य तो समन्वय राखून असल्याचे सांगत आहेत. मात्र या दोन्ही नेत्यांचे समर्थक मात्र एकमेकांचे सोशल मीडियावर परस्परांचे वाभाडे काढत आहेत. दावे, प्रतिदावे केले जात आहेत. प्रसंगी अनेक फेकन्यूज, अफवा पसरवल्या जात आहे. त्यातून आधीच असलेल्या संकटात नव्या समस्यांची भर पडत आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासकीय यंत्रणेवर ताण येतो तो वेगळाच.

दुर्दैवाने अशा आणीबाणीच्या प्रसंगी समाजातील विचारवंत आणि इतर जबाबदार क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी समाज प्रबोधनाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. मात्र या मंडळींपैकी अनेकजणही सध्या राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांप्रमाणे हिसाबकिताब चुकते करण्यात गुंतले आहेत. कोरोनाविरोधात सुरू असलेली ही लढाई उद्धव ठाकरे हरावेत, असे यापैकी काही जणांना वाटते. तर कोरोनाच्या या संकटाचा सामना करण्यात नरेंद्र मोदी अपयशी ठरावेत, असे अनेकांना मनोमन वाटतेय. 

पण उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी कोरोनाविरोधातील ही लढाई हरले तर काय होईल? याचा विचार तुम्ही केलाय का? उद्धव ठाकरे ही लढाई हरले तर राज्य हरेल आणि मोदी या लढाईत पराभूत झाले तर संपूर्ण राष्ट्र पराभूत होईल आणि या दोन्हींपैकी एकही गोष्ट आपल्याला अजिबात परवडणारी नाही. त्यामुळे किमान हे संकट असेपर्यंत तरी आपापसातील मतभेद विसरा आणि एक राज्य, एक राष्ट्र म्हणून या संकटाचा सामना करा!!!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी