शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

Coronavirus: मी जगलो माझे जगणे...; मृत्यूशय्येवर असताना 'त्यांनी' तरुणासाठी बेड नाकारला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 23:39 IST

८५ वर्षीय दाभाडकर यांना कोरोना संक्रमण झाले. ऑक्सिजन धोक्याच्या पातळीवर ५५ पर्यंत उतरले होते. अशात हॉस्पिटल आणि बेड मिळणे कठीण झाले होते.

ठळक मुद्दे२२ एप्रिल रोजी संध्याकाळी गांधीनगर येथील मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात त्यांना बेड मिळाला. खिडकीच्या बाहेर एक महिला स्वत:च्या नवऱ्याला बेड मिळावा व प्राण वाचविण्यासाठी धडपड करीत असल्याचे त्यांच्या नजरेत पडले.दुसऱ्या दिवशी २३ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता त्यांनी प्राण सोडला.

नागपूर : म्हणतात ना... स्वत:साठी जगला तो काय जगला, दुसऱ्यासाठी जगला तो चिरंजीव झाला. नियतीच्या आलेखात त्याच्या अमरत्वाची नोंद झाली. असाच प्रसंग नागपुरात काल-परवा अनुभवास आला. स्वत: मृत्यूशय्येवर असतानाही दुसऱ्याच्या जगण्याची चिंता असणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक नारायणराव दाभाडकर यांनी आपला बेड तरुणासाठी रिकामा केला आणि दुसऱ्याच दिवशी गतप्राण झाले.

८५ वर्षीय दाभाडकर यांना कोरोना संक्रमण झाले. ऑक्सिजन धोक्याच्या पातळीवर ५५ पर्यंत उतरले होते. अशात हॉस्पिटल आणि बेड मिळणे कठीण झाले होते. शिवाय, घरातील सगळीच मंडळी संक्रमित असल्याने अडथळ्यांचा पहाड होताच. अखेर २२ एप्रिल रोजी संध्याकाळी गांधीनगर येथील मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात त्यांना बेड मिळाला. ॲम्ब्युलन्समधून नारायणराव हॉस्पिटलला गेले. एक्स-रे काढल्यावर संक्रमण धोक्याच्या पातळीवर असल्याचे स्पष्ट झाले. अशा स्थितीत उपचार सुरू झाले आणि खिडकीजवळचा बेड त्यांना मिळाला. बेडवर येत नाही तोच, त्यांना खिडकीच्या बाहेर एक महिला स्वत:च्या नवऱ्याला बेड मिळावा व प्राण वाचविण्यासाठी धडपड करीत असल्याचे त्यांच्या नजरेत पडले. काही क्षण विचार केला आणि लागलीच जावयांना बोलावले. माझे वय ८५, माझ्या मागच्या सगळ्याच जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या आणि मी माझे जगणे जगलो आहे. आता जगण्याची गरज त्या पेशंटला आहे. तेव्हा हा बेड रिकामा करतो आणि घरी जाऊ या... असे ते उच्चारले. घरी फोन केला तर सगळेच अचंबितही झाले. डॉक्टरांपुढे नारायणरावांची ही भावना व्यक्त केली तेव्हा डॉक्टरांनी रुग्णाला वाऱ्यावर सोडू शकत नाही, असे स्पष्ट केले. मात्र, नारायणराव ऐकायला तयार नव्हते आणि मी बेड रिकामा करीत असल्याचे लिहून देत असल्याची घोषणा केली आणि लिहूनही दिले. ॲडमिट झाल्याच्या अवघ्या दोन तासात नारायणरावांनी बेड रिकामा केला. घरी परतले. दुसऱ्या दिवशी २३ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता त्यांनी प्राण सोडला. एखाद्या सिनेमातील साजेसा हा प्रसंग प्रत्यक्षात दाभाडकर कुटुंबात घडला. 

बाबा चिरंजीवी ठरलेबाबांनी घेतलेला हा निर्णय आम्हाला तणाव देणारा होता. मात्र, त्यांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीतून एक संस्कार दिला, याची जाणीव तत्क्षणी झाली आणि आम्ही त्यांच्या त्या निर्णयाचे स्वागत केले. खऱ्या अर्थाने बाबा चिरंजीवी ठरले. - आसावरी दाभाडकर कोठीवान

सध्याच्या स्थितीपुढे सगळ्याच यंत्रणा हतबल आहेत. नारायणराव यांना बेड मिळाला, उपचारही सुरू झाले होते. मात्र, त्यांना दिसलेल्या विदारक स्थितीत स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता बेड सोडला, ही या काळातील सर्वात मोठ्या औदार्याची वृत्ती आम्ही मानतो. नारायणराव जगू शकले नाही, ही खेदाची बाब. मात्र, आपल्या औदार्याने त्यांनी स्वतःचे नाव अमर केले. - डॉ. अजय हरदास, कोविड इंचार्ज, इंदिरा गांधी रुग्णालय, गांधी नगर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस