शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

Coronavirus : हॉटेल, बारही बंद करा; सर्वपक्षीय नेत्यांनी केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 15:56 IST

कोरोना व्हायरसचा संसर्ग झपाट्याने पसरण्याची भिती असल्याने शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा अमलात आणला आहे.

मीरारोड - कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने शाळा, मॉल, सभागृह, चित्रपटगृह, व्यायामशाळा, तरण तलाव, सर्व प्रकारचे जाहीर कार्यक्रम आदी बंद केले असताना बार व हॉटेल मात्र सुरू ठेवल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. बार व हॉटेलांमध्ये मोठ्या प्रमाणात असणारी गर्दी पाहता त्यांना सुद्धा बंद केले गेले पाहिजे, अशी मागणी आता करण्यात येत आहे.

कोरोना व्हायरसचा संसर्ग झपाट्याने पसरण्याची भीती असल्याने शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा अमलात आणला आहे. खबरदारी म्हणून शासनाने शाळा, मॉल, सभागृह, चित्रपटगृह, व्यायामशाळा, तरण तलाव, सर्व प्रकारचे जाहीर कार्यक्रम आदींवर बंदी आणलेली आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे आणि खबरदारी घेणे अपरिहार्य असल्याने या बंदीबाबत फारशी कोणाची तक्रार वा नाराजी देखील नाही. निश्चितच यातून रोजगारीचा प्रश्न गंभीर बनणार आहे.

बार आणि हॉटेलांमध्ये देखील लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. तेथे तर लोक जवळ जवळ खेटून बसत असतात. त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची खबरदारी वा काळजी घेतली जात नाही. अशा बार व हॉटेलांमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या देखील मोठी असते. त्यामुळे बार व हॉटेलांमधून देखील कोरोनाचा संसर्ग पसरू शकत असल्याची भीती आहे.

शाळा, व्यायामशाळा, मॉल, सभागृह , चित्रपटगृह आदींना लागू केलेली बंदी बार व हॉटेलांना देखील लागू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या सरिता नाईक, कृष्णा गुप्ता सह भाजपाचे कमलाकर घरत, मनसेचे हेमंत सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोर्णिमा काटकर, शिवसेनेच्या वेदाली परळकर आदींनी केली आहे. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून पार्सल पद्धतीवर भर द्यावा, अशी सूचना देखील त्यांनी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाthaneठाणेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारhotelहॉटेल