शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : हॉटेल, बारही बंद करा; सर्वपक्षीय नेत्यांनी केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 15:56 IST

कोरोना व्हायरसचा संसर्ग झपाट्याने पसरण्याची भिती असल्याने शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा अमलात आणला आहे.

मीरारोड - कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने शाळा, मॉल, सभागृह, चित्रपटगृह, व्यायामशाळा, तरण तलाव, सर्व प्रकारचे जाहीर कार्यक्रम आदी बंद केले असताना बार व हॉटेल मात्र सुरू ठेवल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. बार व हॉटेलांमध्ये मोठ्या प्रमाणात असणारी गर्दी पाहता त्यांना सुद्धा बंद केले गेले पाहिजे, अशी मागणी आता करण्यात येत आहे.

कोरोना व्हायरसचा संसर्ग झपाट्याने पसरण्याची भीती असल्याने शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा अमलात आणला आहे. खबरदारी म्हणून शासनाने शाळा, मॉल, सभागृह, चित्रपटगृह, व्यायामशाळा, तरण तलाव, सर्व प्रकारचे जाहीर कार्यक्रम आदींवर बंदी आणलेली आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे आणि खबरदारी घेणे अपरिहार्य असल्याने या बंदीबाबत फारशी कोणाची तक्रार वा नाराजी देखील नाही. निश्चितच यातून रोजगारीचा प्रश्न गंभीर बनणार आहे.

बार आणि हॉटेलांमध्ये देखील लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. तेथे तर लोक जवळ जवळ खेटून बसत असतात. त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची खबरदारी वा काळजी घेतली जात नाही. अशा बार व हॉटेलांमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या देखील मोठी असते. त्यामुळे बार व हॉटेलांमधून देखील कोरोनाचा संसर्ग पसरू शकत असल्याची भीती आहे.

शाळा, व्यायामशाळा, मॉल, सभागृह , चित्रपटगृह आदींना लागू केलेली बंदी बार व हॉटेलांना देखील लागू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या सरिता नाईक, कृष्णा गुप्ता सह भाजपाचे कमलाकर घरत, मनसेचे हेमंत सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोर्णिमा काटकर, शिवसेनेच्या वेदाली परळकर आदींनी केली आहे. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून पार्सल पद्धतीवर भर द्यावा, अशी सूचना देखील त्यांनी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाthaneठाणेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारhotelहॉटेल