शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus News: राज्याला कोरोनाचा दुहेरी धोका; रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, मृत्यूदरही देशाच्या तुलनेत अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 21:08 IST

CoronaVirus News: आज दिवसभरात ९ हजार ५१८ रुग्ण आढळले; २५८ जण मृत्यूमुखी

मुंबई - देशातील मृत्यूदर रविवारी पहिल्यांदाच २.५ टक्क्यांच्या खाली आला आहे. मृत्युदर हळूहळू कमी होत असून सध्या २.४९ टक्के आहे. जगातील सर्वात कमी मृत्यूचे प्रमाण असलेल्या देशांपैकी भारत एक आहे. मात्र चिंतेची बाब म्हणजे, राज्याचा मृत्यूदर देशाच्या तुलनेत अधिक आहे. राज्यात ३.८२ एवढा मृत्यूदर आहे. याखेरीज, राज्यात पहिल्यांदाच सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद झाली असून ही संख्या ९ हजार ५१८ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात २५८ मृत्यू झाले आहेत.

राज्यात ३ लाख १० हजार ४५५ कोरोना बाधितांची नोंद झाली असून बळींचा आकडा ११ हजार ८५४ वर पोहोचला आहे. सध्या राज्यात १ लाख २८ हजार ७३० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दिवसभरात ३ हजार ९०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत १ लाख ६९ हजार ५६९ जण कोविडमुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.६२ टक्के आहे. रविवारी नोंद झालेल्या २५८ मृत्यूंमध्ये मुंबई ६४, ठाणे ७, ठाणे मनपा १२, नवी मुंबई मनपा ८, कल्याण डोंबिवली मनपा २२, उल्हासनगर मनपा ४, भिवंडी निजामपूर मनपा ७, पालघर १, वसईविरार मनपा ११, रायगड ८, पनवेल मनपा ५, नाशिक १०, अहमदनगर १, अहमदनगर मनपा १, धुळे मनपा १, जळगाव १०, जळगाव मनपा १, नंदूरबार १, पुणे ५,पुणे मनपा २५, पिंपरी चिंचवड मनपा १५, सोलापूर १, सोलापूर मनपा १, सातारा ५, कोल्हापूर १, सांगली ४, सांगली मिरज कुपवाड मनपा २, रत्नागिरी २, औंरगाबाद ५, जालना १, परभणी मनपा १, लातूर २, लातूर मनपा २, उस्मानाबाद १, अकोला २, यवतमाळ १, वाशिम १, नागपूर १,  नागपूर मनपा ६ या रुग्णांचा समावेश आहे.

मुंबई दिवसभरात १ हजार ३८ रुग्ण आणि ६४ मृत्यू झाले आहेत. शहर उपनगरात एकूण रुग्णसंख्या १ लाख १ हजार ३८८ इतकी असून मृतांचा आकडा ५ हजार ७१४ झाला आहे. सध्या २३ हजार ६९७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १५ लाख ६४ हजार १२९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९.८५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७ लाख ५४ हजार ३७० व्यक्ती घरगुती अलगीकरणात तर ४५ हजार ८६४ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस