शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

CoronaVirus भय इथले संपत नाही! आरोग्य सेवकांना अपुऱ्या सुरक्षेचे भय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 20:02 IST

जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातील कोरोना कक्षात काम कऱणाऱ्या परिचारिकांनी मिळून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांना लेखी निवेदन दिले आहे.

मुंबई - कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी व त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी फ्रंटलाइनवर डॉक्टरांसह अनेक आरोग्य सेवक काम करत आहेत. शासनाकडून वेळोवेळी या पॅरावैद्यकीय व चतुर्थ श्रेणी कामगारांना मास्क व पीपीई कीट पुरविल्याचे सांगितले जात आहे. मात्र शहर उपनगरातील पालिकेच्या विविध रुग्णालयांत काम करणाऱ्या आरोग्य सेवकांना कोणतेही सुरक्षा कवच नसल्याचे वारंवार समोर येत आहे. अहोरात्र कर्तव्य बजावताना सुरक्षेच्या अभावामुळे अजूनही आऱोग्यसेवकांच्या मनातील भय कायम असल्याची भावना आहे. त्यामुळे शासनाने या रुग्णालयीन आऱोग्य सेवकांना तातडीने सुरक्षा पुरवावी मागणी आहे.

जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातील कोरोना कक्षात काम कऱणाऱ्या परिचारिकांनी मिळून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांना लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात रुग्णालयाच्या कोरोना कक्षात येणाऱे रुग्ण दिवसागणिक वाढत आहे, मात्र असे असूनही परिचारिकांना मास्क, हँडग्लोव्ह्ज मिळत नसल्याची तक्रार केली आहे. उपचार करण्याची तयारी आहे, मात्र सुरक्षेसाठी त्वरित व्यवस्था करा अशी मागणी केली आहे. यापूर्वी कस्तुरबा रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी व अन्य कामगारांनी मिळून रुग्णालय प्रशासनाकविषयी नाराजी व्यक्त केली होती. याविषयी, म्युनिसिपल मजदूर युनियनचे सचिव प्रदीप नारकर यांनी सांगितले की, कोरोना विषाणू बाधित रुग्ण आणि संशयित रुग्ण यांना सेवा देणाऱ्या चतुर्थश्रेणी कामगार-सफाईगार, कक्ष परिचर आणि परिचारिका यांना रुग्णालय प्रशासनाकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचे म्युनिसिपल मजदूर युनियनचे सचिव प्रभाकर नारकर यांनी सांगितले. त्यांना पीपीई किट उपलब्ध होत नसल्यामुळे सेवा देणारे कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य सुरक्षा धोक्यात आले आहे.

रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरवत नसल्याचा फटका नायर रुग्णालयातील परिचारिका व कर्मचाऱ्यांना बसला आहे. नायर रुग्णालयात कोरोना रुग्णाचा बळी गेल्यानंतर प्रशासनाने हालचाल करुन परिचारिका व कर्मचाऱी असे मिळून १७ जणांना घरगुती अलगीकरण (होम क्वारंटाइन) केले आहे. हिंदुजा रुग्णालयात कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर जवळपास ८७ जणांना होम क्वारंटाइन केले होते. त्याचप्रमाणे, जसलोकच्या परिचारिकेलाही प्रवासाचा इतिहास नसताना कोरोनाची लागण झाली आहे. एकंदरित, कोरोनावर विजय मिळविण्याच्या प्रक्रियेतील डॉक्टरप्रमाणेच आऱोग्यसेवकही प्रमुख योद्धे आहेत. त्यामुळे त्यांना सुरक्षाकवच मिळणे हा त्यांचा हक्क आहे, तसे न झाल्यास कोरोनाची दहशत आणखी पसरण्याचा धोका आहे हे शासनाने ओळखले पाहिजे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस