शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

coronavirus: राज्यातल्या निम्म्या चाचण्या केवळ मुंबई-पुण्यातच!, उर्वरित राज्याचे प्रमाण केवळ ३६ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 07:12 IST

देशातील एकूण चाचण्यांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक चाचण्या होत आहेत. बाधितांच्या आकड्यातही राज्य आघाडीवर आहे.

- राजानंद मोरेपुणे : राज्यात आतापर्यंत झालेल्या कोविड चाचण्यांपैकी जवळपास निम्म्या चाचण्या मुंबईपुणे जिल्ह्यातच झाल्या आहेत. राज्यात झालेल्या एकुण ११ लाख ५८ हजार चाचण्यांमध्ये या जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे ३१ व १८ टक्के चाचण्या झाल्या असून यात ठाणे जिल्हाही आघाडीवर आहे. हे तीन जिल्हे वगळल्यास राज्यातील उर्वरित चाचण्यांचे प्रमाण केवळ ३६ टक्के म्हणजे ४ लाखांच्या जवळपास आहे. या तीन जिल्ह्यांमध्येच सर्वाधिक संसर्ग असून हे प्रमाण ७६ टक्के एवढे आहे.

देशातील एकूण चाचण्यांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक चाचण्या होत आहेत. बाधितांच्या आकड्यातही राज्य आघाडीवर आहे. राज्यात गुरूवारपर्यंत ११ लाख ५८ हजार कोविड नमुने संकलित करण्यात आले आहेत. तर रुग्णांची संख्या २ लाख ३० हजार आहे. मुंबई व पुणे या दोन जिल्ह्यातच ५० टक्के चाचण्या झाल्या आहेत. या दोन शहरांमध्येच रुग्णसंख्याही ५० टक्क्यांहून अधिक आहे. ठाणे जिल्ह्यात पुण्यापेक्षा कमी म्हणजे सुमारे १ लाख ६६ हजार चाचण्या झाल्या असल्या तरी येथील रुग्णसंख्या  अधिक आहे. पुण्यात २ लाख १४ हजार चाचण्या झाल्या असून सुमारे ३३ हजार रुग्ण आहेत. मुंबईत सर्वाधिक ३ लाख ६० हजार चाचण्या झाल्या आहेत.उर्वरित महाराष्ट्रातील एकाही जिल्ह्यातील  चाचण्यांचा आकडा ५० हजारांच्या पुढे गेलेला नाही. एकूण ३६ पैकी १९ जिल्ह्यांमध्ये १० हजारांपेक्षा कमी चाचण्या झाल्या आहेत. सर्वात कमी १९६३ चाचण्या वाशीम जिल्ह्यातील असून तेथील रुग्णसंख्याही तुलनेत कमी आहे.राज्यात कोरोनाचा संसर्ग मुंबई, पुणे, ठाणे या शहरांपासूनच सुरू झाला. त्यामुळे सुरूवातीपासूनच तेथे चाचण्यांचे प्रमाण अधिक होते. लॉकडाऊनच्या काळात अन्य जिल्ह्यांत संसर्ग खूप कमी होता. त्यामुळे चाचण्या कमी झाल्या. अनलॉकमध्ये मोठ्या शहरांमधील संसर्गाचे प्रमाण वाढल्याने चाचण्याही वाढविण्यात आल्या. आता ग्रामीण भागातही संसर्ग वाढू लागल्याने चाचण्या वाढतील.- डॉ. प्रदीप आवटे,राज्य सर्वेक्षण अधिकारीलोकसंख्या २९ टक्के, चाचण्या ६३ टक्केराज्यात एकूण ११ कोटी २३ लाख लोकसंख्येच्या तुलनेत चाचण्यांचे प्रमाण केवळ १ टक्क्यांच्या जवळपास आहे. त्यात मुंबई, पुणे व ठाणे या तीन जिल्ह्यांची लोकसंख्या (२०११ च्या जनगणनेनुसार) तीन जिल्ह्यांंची लोकसंख्या ३ कोटी २८ लाख (२९ टक्के) आहे. एकूण चाचण्यांच्या तुलनेत तीन जिल्ह्यांतील चाचण्यांचे प्रमाण ६३ टक्के आहे. सुमारे ७० टक्के म्हणजे ७ कोटी ९५ लाख लोकसंख्येसाठी हे प्रमाण केवळ ३७ टक्के एवढेच आहे.राज्याची एकुण लोकसंख्या व चाचण्यांचे तुलनेत काही शहरांतील चाचण्यांचे प्रमाण (२०११ च्या जनगणनेनुसार)जिल्हे लोकसंख्या चाचण्यामुंबई १ कोटी २४ लाख ३,६०,२४९पुणे ९४ लाख २९ हजार २,१४,८०७ठाणे १ कोटी १० लाख १,६६,१४१नागपूर ४६ लाख ५३ हजार ४७,४१८कोल्हापूर ३८ लाख ७६ हजार ३३,८२५औरंगाबाद ३७ लाख ३१,६८६नाशिक ६१ लाख सात हजार ३४,३१४महाराष्ट्र ११ कोटी २३ लाख ११,५८,३०५

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईPuneपुणेthaneठाणे