शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

CoronaVirus : निर्बंधातून स्वातंत्र्य, राज्यातील अनेक शहरे घेणार मोकळा श्वास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 09:54 IST

संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता कोरोनाचे नियम पाळूनच हे स्वातंत्र्य उपभोगावे, अन्यथा पुन्हा नाइलाजाने निर्बंध लावावे लागतील, असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.

मुंबई : आज १५ ऑगस्टपासून मुंबईसह राज्यातील अनेक शहरे कोरोनाच्या निर्बंधांतून स्वतंत्र होत मोकळा श्वास घेणार आहेत. लसीचे दोनही डोस घेतलेल्यांना मॉल्ससह गर्दीच्या ठिकाणी प्रवेश मिळणार आहे. हॉटेलिंगची मजाही चाखता येईल. दोन डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्यांसाठी मुंबईत लोकलदेखील खुली होत आहे. एकूणच निर्बंधामुळे स्लो ट्रॅकवर गेलेले आयुष्य यामुळे पुन्हा फास्ट ट्रॅकवर येत आहे. परंतु, संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता कोरोनाचे नियम पाळूनच हे स्वातंत्र्य उपभोगावे, अन्यथा पुन्हा नाइलाजाने निर्बंध लावावे लागतील, असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.

रविवारपासून दुकाने, मॉल, उपाहारगृहे रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. धार्मिक स्थळे, सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स बंद असतील. खासगी कार्यालयांना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये २४ तास सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. १५ ऑगस्टपासून सर्व मॉल्स खुले होणार असून, कोरोनाचे नियम पाळत येथे अधिकाधिक स्वच्छता राखली जाणार आहे. हॉटेल्सदेखील आता खवय्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले असून, अधिकाधिक स्वच्छता पाळण्यावर भर दिला जाणार आहे.लसीकरण पूर्ण झालेल्यांना बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल. अन्य प्रवाशांसाठी ७२ तास पूर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह किंवा १४ दिवस विलगीकरण आवश्यक राहील. 

जळगावात आढळले सर्वाधिक रुग्ण आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार सर्वात जास्त १३ रुग्ण जळगाव जिल्ह्यात आढळले आहेत. त्याखालोखाल रत्नागिरी १२, मुंबई ११, ठाणे, पुणे प्रत्येकी ६, पालघर आणि रायगड प्रत्येकी ३, नांदेड, गोंदिया प्रत्येकी २ आणि चंद्रपूर, अकोला, सिंधुदुर्ग, सांगली, नंदुरबार, औरंगाबाद, कोल्हापूर आणि बीडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

‘डेल्टा प्लस’चा धोका अजूनही कायम - निर्बंधातून सूट मिळाली असली तरी राज्यात कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ विषाणूने चिंता वाढविली आहे. शनिवारी पुणे शहरात पहिला रुग्ण आढळून आला. यामुळे राज्यातील एकूण ‘डेल्टा प्लस’ रुग्णांची संख्या ६६ झाली आहे. - पुण्यातील संबंधित ६२ वर्षीय रुग्णाचा अहवाल शनिवारी महापालिकेकडे आला असला तरी, त्याला विषाणूची बाधा एक महिन्यापूर्वीच झाली असून तो आता कोरोनामुक्त झाला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या २१ व्यक्तींची कोरोना तापसणी करण्यात आली असून, यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत़. 

मास्क मात्र अनिवार्य खुली अथवा बंदिस्त उपाहारगृहे आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. उपाहारगृहामध्ये प्रवेश करताना प्रतीक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य राहणार आहे. प्रसाधनगृहात उच्च क्षमतेचा एक्झॉस्ट फॅन असावा. शारीरिक अंतरानुसारच आसन व्यवस्था करण्यात येईल.भोजनासाठी ग्राहकांकडून शेवटची मागणी जास्तीत जास्त रात्री ९ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. मात्र पार्सल सेवा २४ तास सुरू ठेवण्याची मुभा आहे. शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांचे लसीच्या दोन मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झालेले असावेत. वातानुकूलित, विना वातानुकूलित जिम्नॅशिअम, योग सेंटर, सलून स्पा ५० टक्के क्षमतेने रात्री १० पर्यंत सुरू राहतील. मैदाने, उद्याने, चौपाट्या, समुद्रकिनारे स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार नियमित वेळेत सुरू राहतील.

- दोन डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्यांसाठी मुंबईत लोकल खुली होत आहे. निर्बंधामुळे स्लो ट्रॅकवर गेलेले आयुष्य पुन्हा फास्ट ट्रॅकवर येत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लस