शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
9
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
10
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
11
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
12
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
13
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
14
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
15
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
16
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
17
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
18
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
19
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
20
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

CoronaVirus News: केंद्राकडून महाराष्ट्राला काय काय मिळालं?; फडणवीसांनी भलीमोठी यादीच वाचून दाखवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 17:08 IST

केंद्र सरकारकडून राज्याला मिळालेल्या मदतीचा तपशील देता फडणवीस यांचं राज्य सरकारला प्रत्युत्तर

मुंबई: कोरोना संकट काळात केंद्राकडून महाराष्ट्राला पुरेशी मदत मिळत नसल्याचे आरोप महाविकास आघाडी सरकारकडून वारंवार करण्यात येत आहेत. मोदी सरकारनं राज्याच्या वाट्याचा वस्तू आणि सेवा कर थकवल्याचा मुद्दाही राज्य सरकारनं अनेकदा उपस्थित केला आहे. राज्य सरकारच्या या आरोपांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीसह उत्तर दिलं. 'कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारनं २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. केंद्राकडून विविध मार्गांनी राज्याला मदत मिळाली. पण केंद्र सरकार मदतच करत नसल्याचा, महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातो. एकच आरोप वारंवार केल्यानंतर तो खरा वाटू लागतो. मात्र केंद्राकडून इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला जास्तच मिळालं आहे,' असं फडणवीस म्हणाले.'गरिब कल्याण पॅकेजच्या अंतर्गत गरिबांना अन्नधान्य देण्याचा निर्णय झाला. गहू, तांदूळ, डाळ केंद्राकडून देण्यात आली. स्थलांतरित मजुरांनादेखील केंद्राकडून अन्नधान्य देण्यात आलं. यावर एकूण ४ हजार ५९२ कोटी रुपयांचा खर्च झाला. पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून १ हजार ७२६ कोटी देण्यात आले. जनधन योजनेच्या अंतर्गत महिलांच्या खात्यात १ हजार ३०८ कोटी जमा झाले असून ६५० कोटी रुपये लवकरच जमा होतील. उज्ज्वला योजनेतून ७३ लाख १६ हजार सिलिंडर देण्यात आले असून त्यावर १ हजार ६२५ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. विधवा, परित्यक्त्या, ज्येष्ठ नागरिक, अपंग यांच्या खात्यात ११६ कोटी रुपये जमा झाले आहेत,' अशी आकडेवारी फडणवीस यांनी दिली. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांनाही सरकारनं भरीव मदत केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 'आतापर्यंत राज्यातून ६०० श्रमिक विशेष रेल्वे गाड्या सुटल्या आहेत. प्रत्येक रेल्वे गाडीवर केंद्रानं जवळपास ५० लाख रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे श्रमिक रेल्वे गाड्यांवर ३०० कोटींचा खर्च झाला  आहे. मजुरांच्या छावण्या, त्यांचं अन्नधान्य यासाठी केंद्रानंच एसडीआरएफच्या माध्यमातून १ हजार ६११ कोटी रुपये दिले. केंद्राकडून राज्याला १० लाख पीपीई किट्स आणि १६ लाख एन ९५ मास्क देण्यात आले. याशिवाय इतर वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी ४४८ कोटी दिले गेले,' अशी माहिती फडणवीस यांनी दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी