शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

Coronavirus: राज्यातील पाच जिल्ह्यांत कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण, मुंबईसह या जिल्ह्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 11:21 IST

Coronavirus: राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार सध्या ७ हजार ५५५ रुग्ण सक्रिय आहेत. त्यापैकी ६ हजार ५८६ रुग्ण, म्हणजेच ७९ टक्के मुंबई, पुणे, ठाणे, अहमदनगर व नाशिक या पाच जिल्ह्यांत आहेत. तर उरलेल्या ३० जिल्ह्यांमध्ये २१ टक्के सक्रिय रुग्ण आहेत. 

 मुंबई : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार सध्या ७ हजार ५५५ रुग्ण सक्रिय आहेत. त्यापैकी ६ हजार ५८६ रुग्ण, म्हणजेच ७९ टक्के मुंबई, पुणे, ठाणे, अहमदनगर व नाशिक या पाच जिल्ह्यांत आहेत. तर उरलेल्या ३० जिल्ह्यांमध्ये २१ टक्के सक्रिय रुग्ण आहेत. 

राज्यात सध्या ७ हजार ५५५ रुग्ण आहेत. त्यापैकी मुंबईत २,२५०, पुण्यात २,०७७, ठाण्यात १,०६०, नगरमध्ये ८०२ आणि नाशिकमध्ये ३९७ रुग्ण दाखल आहेत. रुग्ण सक्रियतेबाबत पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर मुंबई आहे. इतर पाच जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णसंख्या १०० ते २६३ च्या दरम्यान आहे. यामध्ये रायगड जिल्हा २६३, सोलापूर २२७, पालघर १९२, औरंगाबाद १२१ आणि कोल्हापूर ११० रुग्णांचा समावेश आहे.

राज्यात आतापर्यंत साडेसहा कोटी नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ६६ लाख ३४ हजार जण पॉझिटिव्ह आले आहेत. म्हणजेच आतापर्यंत झालेल्या चाचण्यांपैकी १० टक्के चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यापैकी ६४ लाख ८२ हजार जण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात जे सक्रिय रुग्ण आहेत, त्यामध्ये पुण्याचा वाटा २५ टक्के इतका आहे. पुण्यात २ हजार ७७ रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यापैकी पुणे महापालिकेत ८१३, पिंपरी- चिंचवडमध्ये ३५०, तर उरलेली रुग्णसंख्या ही ग्रामीण भागातील आहे. 

अकोला, बुलडाणा, हिंगोली, अमरावती, चंद्रपूर, परभणी, जालना, बीड, सांगली, रत्नागिरी, नागपूर येथील रुग्णसंख्या १३ ते ६२ दरम्यान आहे. तर गोंदिया, नंदुरबार, वाशिम, भंडारा, गडचिरोली, धुळे, जळगाव, नांदेड, यवतमाळ, वर्धा व उस्मानाबाद येथे सक्रिय रुग्ण १० च्या आत आहेत. 

राज्यात ७ हजार ५५५ रुग्ण उपचाराधीनnराज्यात ६७८ रुग्ण आणि ३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात ९४२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, एकूण ६४ लाख ८३ हजार ४३५ रुग्णांनी कोविडवर मात केली आहे. सध्या राज्यात ७ हजार ५५५ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. nराज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७१ टक्के आहे तर मृत्युदर २.१२ टक्के आहे. आजपर्यंत तपासलेल्या ६ कोटी ५५ लाख ११ हजार ३९४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १०.१३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६६ लाख ३५ हजार ६५८ झाली असून, मृतांचा आकडा १ लाख ४० हजार ९९७ झाला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या