शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडून ‘कानउघडणी’; गरज नसताना गर्दी कराल तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 14:37 IST

आपल्याला जो वेळ मिळाला त्यानुसार आपण काळजी घेतली आहे, परराज्यातील काही मजूर गावाकडे जाण्यासाठी निघाले आहेत त्यांना विनंती आहे कुठेही जाऊ नका

मुंबई – कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. १४ एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापनं बंद आहेत. अशातच जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी वाढत असल्याचं चित्र राज्यात दिसत आहे. यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लोकांना गर्भीत इशारा दिला आहे.

राज्यातील जनतेशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्याला जो वेळ मिळाला त्यानुसार आपण काळजी घेतली आहे, परराज्यातील काही मजूर गावाकडे जाण्यासाठी निघाले आहेत त्यांना विनंती आहे कुठेही जाऊ नका, जिथे आहात तिथे राहा, तुमची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे. राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करतोय. काही रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये वर्दळ होत आहे त्याठिकाणी कृपा करुन गर्दी करु नका अन्यथा लोक ऐकणार नसतील तर सरकारला कठोर पावलं उचलावी लागतील असा इशारा त्यांनी दिला.

सरकार लोकांची मदत करत आहे तुम्हीही सरकारला सहकार्य करा, कोरोनाशी लढण्यासाठी वेगळं खातं उघडलं आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत वेगळा विभाग केला आहे. उदय कोटक यांनी १० कोटींची निधी जाहीर केली. अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर पुढे येऊन मदत करतायेत. सध्याच्या घडीला कोणताही देश मदतीसाठी पुढे येणार नाही त्यामुळे आपणच एकत्र मिळून संकटाला मात करणं गरजेचे आहे. ज्या देशांनी काळजी घेतली नाही त्यांची दुर्दैवी अवस्था आहे. पण संकट भयंकर असताना जीवाची बाजी लावून लढणाऱ्या डॉक्टरांचा अभिमान आहे. सर्व डॉक्टरांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मानाचा मुजरा करत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले.

तसेच डॉक्टरांशी बोलल्यानंतर माझं मनोधैर्य वाढतं. गेल्या काही दिवसांपासून अनेकांना जबरदस्तीने सुट्टी दिली आहे. मात्र डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी सुट्टी न घेता दिवसरात्र काम करतायेत. कोरोनाची चाचणी केंद्र वाढवण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.कोरोनाची लागण झालेल्यांपैकी अनेकांना उपचार देऊन बरं करण्यात आलं आहे ही दिलासादायक बाब आहे पण न्यूमोनियाची साथ वाढण्याची भीती आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी डोळ्यात तेल घालून काम करणं गरजेचे आहे. कोणतीही लक्षण आढळली तर तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

दरम्यान, बाहेरुन आलेले जे लोक आहेत त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन केलं पाहिजे, कुटुंबाने योग्य ती काळजी घेतली पाहिजे, सध्याचा काळ बिकट आहे, याच काळात गुणाकाराने कोरोनाची संख्या वाढते, तेव्हाच आपल्याला वजाबाकी करायची आहे. आपल्याकडे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा नाही, २४ तास दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी दिली आहे. तुम्ही घरात राहा, घराबाहेरची लढाई तुमचं सरकार पार पाडेल, पोलिसांशी हुज्जत घालू नये. घरात कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवा, काहीही मनोरंजनाचे खेळ खेळा पण बाहेर पडू नका. लॉकडाऊन होऊन ८ दिवस निघून गेले पुढचे काही दिवस असेच जातील या काळाची नोंद जगाच्या इतिहासात होणार आहे. अशा परिस्थितीत आपल्याला हे युद्ध जिंकायचं आहे असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेला केले आहे.

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस