शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

CoronaVirus : कोरोना काळात यमराजांपर्यंत कसे पोहोचतायत लोक? आनंद महिंद्रांनी ट्विट करून सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 18:25 IST

आनंद महिंद्रा यांनी एक ट्विट करून मास्कची आवश्यकता सांगितली आहे. हे ट्विट गमतीशीर असले तरी सुंदर संदेश देत आहे आणि सध्या तर हा संदेश अत्यंत आवश्यक आहे. (Anand Mahindra)

मुंबई - जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोट्यवधी लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशात, जीव वाचविण्यासाठी औषधांबरोबरच मास्कदेखील उपयोगी ठरत आहे. मास्क लावून लोक स्वतःचा कोरोना संक्रमणापासून बचाव करू शकतात. मात्र, तरीही लोक मास्कचा वापर करताना दिसत नाहीत. अशाच काही बेजबाबदार लोकांना महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी एक ट्विट करून  सल्ला दिला आहे. (CoronaVirus: Anand Mahindra tell importance about mask in corona wave)

आनंद महिंद्रा यांनी एक ट्विट करून मास्कची आवश्यकता सांगितली आहे. हे ट्विट गमतीशीर असले तरी सुंदर संदेश देत आहे आणि सध्या तर हा संदेश अत्यंत आवश्यक आहे. तर बघूया नेमकं काय ट्विट केलंय आनंद महिंद्रा यांनी...

CoronaVirus : पुढचे तीन आठवडे निर्णायक, सर्व राज्यांनी सावध राहावं; केंद्राचे निर्देश

आनंद महिंद्रा यांनी हे ट्विट सोशल मिडियावरून घेतले आहे आणि आपल्या वॉलवर पोस्ट केले आहे. यात लिहिले आहे - यमराजांनी चित्रगुप्त यांना विचारले, ‘आपण पृथ्वीवर गेला होतात, काय झाले?’ त्यांनी उत्तर देताना सांगितले, ‘महाराज, लोकांनी मास्क लावलेले आहे. मी अनेकांना ओळखूच शकलो नाही. त्यामुळे ज्यांना मास्क लावले नव्हते, त्यांना घेऊन आलो आहे.’ या मेसेजचा विचार केल्यास, सध्या खरोखरच, अशी स्थिती बघायला मिळत आहे. खरोखरच, जे लोक मास्क वापरत नाहीत, ते स्वतःला आणि इतरांनाही मृत्यूच्या दाढेत ढकलत आहेत.

महिंद्रा यांच्या या ट्विटवर अनेकांच्या जबरदस्त प्रतिक्रियाही येत आहेत. वेळेचा विचार करता हा अत्यंत योग्य सल्ला आहे, असे लोक म्हणत आहेत. तसेच त्यांचा हा मेसेज शेअरही करत आहेत.

भारतात रशियन व्हॅक्सीन Sputnik V ला मंजुरी; जाणून घ्या, Covishield, Covaxinच्या तुलनेत किती आहे प्रभावी? महिंद्रा यांनी केलेले हे ट्विट आतापर्यंत सहाशेहून अधिक वेळा रीट्विटदेखील करण्यात आले आहे, तर हजारो वेळा लाइकदेखील करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAnand Mahindraआनंद महिंद्राTwitterट्विटर