CoronaVirus : पुढचे तीन आठवडे निर्णायक, सर्व राज्यांनी सावध राहावं; केंद्राचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 04:57 PM2021-04-20T16:57:29+5:302021-04-20T17:03:01+5:30

आज मंगळवारी सायंकाळी 6 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने लस तयार करणाऱ्या कंपन्यांसोबत बाठक करणार. (CoronaVirus)

CoronaVirus Next three weeks are crucial, all states should be vigilant says Central Government government | CoronaVirus : पुढचे तीन आठवडे निर्णायक, सर्व राज्यांनी सावध राहावं; केंद्राचे निर्देश

CoronaVirus : पुढचे तीन आठवडे निर्णायक, सर्व राज्यांनी सावध राहावं; केंद्राचे निर्देश

Next

नवी दिल्ली - देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल आणि आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी उच्च स्थरिया बैठक घेतली. यात सर्व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव सहभागी झाले होते. यानंतर, कोरोनाविरोधातील लढाईत पुढील तीन आठवडे अत्यंत निर्णायक असतील, तसेच यादरम्यान प्रत्येकालाच अत्यंत सावध रहावे लागेल, असे डॉ. व्हीके पॉल यांनी म्हटले आहे. (The next three weeks are crucial, all states should be vigilant says Central Government government )

याशिवाय, त्यांनी सर्व राज्यांना, अॅडव्हान्समध्ये 3 आठवड्यांचे नियोजन करण्यास सांगितले आहे. तसेच गृह सचिव अजय कुमार भल्ला यांनी बाजारांमध्ये होत असलेली गर्दी कमी करण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सांगितले आहे.

Corona Vaccine: अमेरिका भारताला कोरोना लसीचा कच्चा माल देईना; कारणही सांगेना!, नेमका विचार काय?

PM मोदींची आज सायंकाळी 6 वाजता फार्मा कंपन्यांसोबत बैठक -
देशात कोरोनाचा कहर वाढत असतानाच, आज मंगळवारी सायंकाळी 6 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने लस तयार करणाऱ्या कंपन्यांशी बाठक करणार आहेत. यापूर्वी सोमवारी त्यांनी फार्मास्युटिकल इंडस्ट्रीतील प्रमुखांशी चर्चा केली होती. याच बरोबर पंतप्रधानांनी कोरोनाविरोधातील लढाईत औषध क्षेत्राच्या महत्वपूर्ण भूमिकेचेही कौतुकही केले.

भारत बनला फार्मेसी ऑफ वर्ल्ड - मोदी
मोदी म्हणाले, औषध उद्योगाच्या प्रयत्नांमुळेच, आज भारताला जगात फार्मेसी ऑफ वर्ल्ड म्हणून ओळखले जाते. आपण या महामारीच्या काळात जगातील 150 हून अधिक देशांना आवश्यक औषधी उपलब्ध करून दिली. 

भारतात रशियन व्हॅक्सीन Sputnik V ला मंजुरी; जाणून घ्या, Covishield, Covaxinच्या तुलनेत किती आहे प्रभावी?

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,59,170 नवे रुग्ण -
गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. देशातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. मंगळवारी (20 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 2,59,170 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 1,761 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,53,21,089 पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,80,530 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 20,31,977 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,31,08,582 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

CoronaVirus: आता इस्रायलमध्ये मास्क लावण्याची आवश्यकता नाही; असा आदेश देणारा जगातील पहिलाच देश!

Web Title: CoronaVirus Next three weeks are crucial, all states should be vigilant says Central Government government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.