शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

CoronaVirus: राज्यात २४ तासांत ७७८ नवे रुग्ण; एकूण बाधितांचा आकडा ६,४२७ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 05:46 IST

बळी २८३ वर, मुंबईची रुग्णसंख्या ४ हजार २०५

मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती भीषण होतेय, लॉकडाउन असूनही राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतो आहे. राज्यात गुरुवारी दिवसभरात ७७८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, हे आतापर्यंतचे राज्यातील सर्वाधिक निदान आहे. त्यामुळे राज्यातील एकूण बाधितांची संख्या ६,४२७ झाली आहे. राज्य शासनासमोरचे कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचे आव्हान अधिक कठीण होत आहे. राज्यात गुरुवारी १४ मृत्यूंची नोंद झाली असून बळींचा आकडा २८३वर पोहोचला आहे. मुंबईत गुरुवारी ४८७ इतके रुग्णाचे निदान झाले असून, रुग्णसंख्या ४ हजार २०५ झाली आहे. मुंबईत गुरुवारी सहा जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या १६७ झाली आहे.राज्यात गुरुवारी सर्वाधिक कोरोना रुग्णांचे निदान झाले, यापूर्वीही १९ एप्रिल रोजी राज्यात एकाच दिवशी ५५२ कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. राज्यात गुरुवारी १४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, त्यात मुंबईतील सहा, पुणे येथील पाच, नवी मुंबई, नंदुरबार आणि धुळे मनपा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. १४ मृत्यूंपैकी आठ पुरुष, तर सहा महिला आहेत. गुरुवारी झालेल्या मृत्यूंमध्ये ६० व त्यावरील दोन रुग्ण आहेत. तर नऊ रुग्ण हे ४० ते ५९ वयोगटातील आहेत. तीन रुग्ण ४० वर्षांखालील आहेत. दोन रुग्णांबाबत अन्य आजारांची माहिती मिळू शकली नाही. उर्वरित १२ मृत्यूंपैकी सात रुग्णांमध्ये ५८ टक्के मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आहेत.पुणे विभागात १३५ रुग्णांची वाढविभागातील बाधितांची संख्या १ हजार ३१ झाली. बुधवारपेक्षा १३५ ने बाधित रुग्णसंख्या वाढली आहे. गुरुवारी दिवसभरात ४ जण मृत्युमुखी पडले. मृतांची एकूण संख्या ६५ झाली. १७२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. उपचार सुरू असलेले रुग्ण ७९४ आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण ६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १३ रुग्ण गंभीर आहेत.मालेगाव शंभरीपार; नव्या बाधितांची नोंदनाशिक : मालेगावात गुरुवारी (दि.२३) आणखी ५ पॉझिटिव्ह आढळल्याने रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली आहे. आतापर्यंत सुमारे ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यानंतर पॉझिटिव्ह रु ग्णांचे शतक पूर्ण करणारा मालेगाव पहिला तालुका ठरला आहे.विदर्भात १७१ रुग्णविदर्भातही रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. गुरुवारी यवतमाळ जिल्ह्यात एकाच दिवशी नऊ जण आढळले. या जिल्ह्यात आतापर्यंत २७ रुग्णांची नोंद झाली. विदर्भात ही संख्या १७१ वर पोहोचली. सात दिवस रुग्णांची नोंद होणाऱ्या नागपुरात गुरुवारी एकही बाधित रुग्ण आढळून आलेला नाही.वह्या पुस्तकांची तसेच पंखे व विजेची दुकाने उघडणारदेशातील काही राज्यांत लॉकडाउन उठल्यानंतर शाळा सुरू होण्याची शक्यता आणि वाढता उन्हाळा यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने वह्या-पुस्तकांची तसेच पंखे व काही विजेच्या उपकरणांची दुकाने सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली आहे.याशिवाय शेतीसाठी लागणारी उपकरणे, बियाणे, खते यांची दुकानेही सुरू होतील. यामुळे शालेय विद्यार्थी तसेच पालकांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे. शेतकऱ्यांनाही त्यांची कामे सुरु करता येतील.२६.९ लाख रुग्ण जगातजगात कोरोनाच्या आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या २६ लाख ७५ हजार ८७६ झाली असून, मृतांचा आकडाही १ लाख ८८ हजार ८०४ वर गेला आहे. या आजारातून ७ लाख ३९ हजार जण बरे झाले असून, इतरांवर उपचार सुरू आहेत. अमेरिका (४७,८०८), इटली (२५,०००), स्पेन (२२ हजार ) आणि फ्रान्स २१ हजार ) या देशांत कोरोनाच्या बळींची संख्या मोठी आहे.२३,०३९ रुग्ण देशात, ७२१ मृत्यूदेशात आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या २३ हजार ३९ झाली असून, त्यापैकी ५०१२ जण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र या आजाराने ७२१ जण मृत्युमुखीही पडले आहेत. सुमारे १६ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस