शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

CoronaVirus: धोका वाढला! राज्यात दिवसभरात आढळले ४,८४१ रुग्ण; तर १९२ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 04:28 IST

राज्यातील रुग्णसंख्या १ लाख ४७ हजार ७४१ झाली असून, मृतांची संख्या ६,९३१ झाली आहे. सध्या राज्याचा मृत्यूदर ४.६९ टक्के असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.४२ टक्के आहे.

मुंबई : मागील काही दिवसांत राज्यात दिवसभरात ३ हजार रुग्णांचे निदान होत होते. मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सर्वत्र वर्दळ वाढल्याने रुग्ण निदानाची संख्या वाढू लागली. राज्यात गुरुवारी दिवसभरात ४ हजार ८४१ रुग्णांचे निदान झाले, तर १९२ मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत दिवसभरातील हे सर्वाधिक निदान आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णसंख्या १ लाख ४७ हजार ७४१ झाली असून, मृतांची संख्या ६,९३१ झाली आहे. सध्या राज्याचा मृत्यूदर ४.६९ टक्के असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.४२ टक्के आहे.राज्यात सध्या ६३ हजार ३४२ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. राज्यात दिवसभरात १९२ मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी १०९ मृत्यू मागील ४८ तासांतील आहेत. तर उर्वरित ८३ मृत्यू गेल्या कालावधीतील आहेत. या १०९ मृत्यूंमध्ये मुंबई ५८, ठाणे मनपा ३, नवी मुंबई १, भिवंडी निजामपूर १, मीरा भार्इंदर १, वसई विरार मनपा २, रायगड १, जळगाव ४, जळगाव मनपा १, पुणे १, पुणे मनपा १६, पिंपरी चिंचवड मनपा ४, सातारा १, औरंगाबाद १०, अकोला १, अकोला मनपा १, बुलडाणा १ आणि इतर राज्य/ देशातील २ मृत्यूंचा समावेश आहे.राज्यात दिवसभरात ३,६६१ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण ७७,४५३ जण ‘कोविड’मुक्त झाले आहेत. आजपर्यंत पाठविलेल्या ८ लाख ४८ हजार २६ नमुन्यांपैकी १७.४२ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ५६ हजार ४२८ रुग्ण लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ३३ हजार ९५२ संस्थात्मक क्वारंटाइनध्ये आहेत.वर्ध्यात सर्वांत कमी रुग्णराज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत असून, सर्वांत कमी रुग्ण वर्धा जिल्ह्यात असल्याचे दिसून आले आहे. वर्धा जिल्ह्यात केवळ १५ रुग्णांची नोंद असून अवघे तीन सक्रीय रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस