शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

CoronaVirus: धोका वाढला! राज्यात दिवसभरात आढळले ४,८४१ रुग्ण; तर १९२ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 04:28 IST

राज्यातील रुग्णसंख्या १ लाख ४७ हजार ७४१ झाली असून, मृतांची संख्या ६,९३१ झाली आहे. सध्या राज्याचा मृत्यूदर ४.६९ टक्के असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.४२ टक्के आहे.

मुंबई : मागील काही दिवसांत राज्यात दिवसभरात ३ हजार रुग्णांचे निदान होत होते. मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सर्वत्र वर्दळ वाढल्याने रुग्ण निदानाची संख्या वाढू लागली. राज्यात गुरुवारी दिवसभरात ४ हजार ८४१ रुग्णांचे निदान झाले, तर १९२ मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत दिवसभरातील हे सर्वाधिक निदान आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णसंख्या १ लाख ४७ हजार ७४१ झाली असून, मृतांची संख्या ६,९३१ झाली आहे. सध्या राज्याचा मृत्यूदर ४.६९ टक्के असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.४२ टक्के आहे.राज्यात सध्या ६३ हजार ३४२ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. राज्यात दिवसभरात १९२ मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी १०९ मृत्यू मागील ४८ तासांतील आहेत. तर उर्वरित ८३ मृत्यू गेल्या कालावधीतील आहेत. या १०९ मृत्यूंमध्ये मुंबई ५८, ठाणे मनपा ३, नवी मुंबई १, भिवंडी निजामपूर १, मीरा भार्इंदर १, वसई विरार मनपा २, रायगड १, जळगाव ४, जळगाव मनपा १, पुणे १, पुणे मनपा १६, पिंपरी चिंचवड मनपा ४, सातारा १, औरंगाबाद १०, अकोला १, अकोला मनपा १, बुलडाणा १ आणि इतर राज्य/ देशातील २ मृत्यूंचा समावेश आहे.राज्यात दिवसभरात ३,६६१ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण ७७,४५३ जण ‘कोविड’मुक्त झाले आहेत. आजपर्यंत पाठविलेल्या ८ लाख ४८ हजार २६ नमुन्यांपैकी १७.४२ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ५६ हजार ४२८ रुग्ण लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ३३ हजार ९५२ संस्थात्मक क्वारंटाइनध्ये आहेत.वर्ध्यात सर्वांत कमी रुग्णराज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत असून, सर्वांत कमी रुग्ण वर्धा जिल्ह्यात असल्याचे दिसून आले आहे. वर्धा जिल्ह्यात केवळ १५ रुग्णांची नोंद असून अवघे तीन सक्रीय रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस